शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बाजार समितीमधील बेशिस्त कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 23:38 IST

विशेष पथकाची नियुक्ती : पूर्णवेळ कार्यालयात नसणाऱ्यांचे होणार सर्वेक्षण

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बेशिस्त कर्मचाºयांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. उशिरा कामावर येणाºया व लवकार निघून जाणाºयांसह कार्यालयीन वेळेत बाहेर जाणाºयांवर लक्ष ठेवण्यासाठी समिती नियुक्त केली आहे. जे अधिकारी व कर्मचारी बेशिस्तपणे वागताना दिसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ अशी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. त्याचपद्धतीने राज्यात अधिकारी व कर्मचाºयांना सर्वाधिक वेतन देणारी संस्था म्हणूनही राज्यभर ओळख आहे. वेतन चांगले असले तरी काही अधिकारी व कर्मचारी दिलेले काम वेळेत व योग्यपद्धतीने करत नाहीत. कामचुकारपणा करणाºयांचे प्रमाण वाढत होते. सकाळी दहा ते पावणेसहा ही कार्यालयाची वेळ आहे. गेट व इतर ठिकाणच्या कर्मचाºयांना तीन पाळ्यांमध्ये जबाबदारी विभागून देण्यात आली आहे. अनेक कर्मचारी उशीरा कामावर येतात. लवकर घरी निघून जातात. कामावर आल्यानंतरही ते कामाच्या जागेवर दिसत नाहीत. मार्केटमध्ये अनावश्यकपणे फिरताना दिसत असतात. काहीजण स्वत:ची वैयक्तीक कामे करण्यासाठी निघून जातात. मागील काही महिन्यामध्ये हा बेशीस्तपणा वाढला आहे. याविषयी सचिव व प्रशासकांकडेही तक्रारी करण्यात आल्या होत्या. याची गंभीर दखल सचिव अनिल चव्हाण यांनी घेतली आहे. बेशीस्तपणा करणाºयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन सदस्यांचे पथक नियुक्त केली आहे.

ई नाम योजनेचे उपसचिव सुनिल सिंगतकर व प्र.उपसचिव आस्थापनाचे के आर पवार या दोघांचा या पथकामध्ये समावेश आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत नियुक्त केलेल्या जागेवर आहेत का हे या पथकाने पहावयाचे आहे. यासाठी अचानकपणे विविध विभागामध्ये जावून पाहणी करण्याच्या सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत. जे अधिकारी व कर्मचारी त्यांना नियुक्त केलेल्या जागेवर आढळणार नाही. हालचाल रजिस्टरमध्ये ते कोठे गेले याची नोंद नसेल तर त्याविषयी अहवाल मुख्यालयास पाठविण्याचे आदेशही त्यांना देण्यात आले आहेत.दबाव आणण्यास सुरुवातबेशीस्तपणावर लक्ष ठेवण्यासाठी सचिवांनी दोन अधिकाºयांचे पथक तयार केले आहे. या पथकाने काही कर्मचाºयांना उशीरा येणारे व लवकर जाणारे काही कर्मचारी निदर्शनास आले. त्यांच्याविषयी वरिष्ठांना कळविल्याचा राग आल्याने काहींनी अधिकाºयांची हुज्जत घालून दबाव आणल्याची चर्चा मार्केटमध्ये होती. अशाप्रकारेनियम सर्वांसाठी सारखे असावेबाजारसमितीमध्ये काही अधिकारी व कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात. कार्यालयीन वेळेव्यतिरिक्तही जादा काम करत असल्याचे पहावयास मिळते. काही कर्मचारी मात्र कामापेक्षा टाईमपास करतात. उशीरा यायचे व सह्या करून वैयक्तीक कामासाठी निघून जाण्याचे प्रकार वाढत आहेत. कार्यायलीने वेळेत अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचे पहावयास मिळते. बेशिस्तपणा करणाºयांवर निष्पक्षपणे कारवाई करण्यात यावी. कोणालाही सूट देवू नये असे मागणीही केली जात आहे. कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी प्रतिक्रिया काही दक्ष कर्मचाºयांनी व्यक्त केली आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती आवारामध्ये पाच मार्केट आहेत. काही अधिकारी व कर्मचारी उशीरा कामावर येतात व लवकर निघून जातात अशा तक्रारी येऊ लागल्या होत्या. बेशीस्तपणा कमी होवून कामकाज गतीने व्हावे यासाठी दोन अधिकाºयांचे पथक नियुक्त केले आहे. कर्मचारी बेशीस्तपणे वागत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.- अनिल चव्हाण, सचीवमुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती