शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

एपीएमसीत १,०२७ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 00:39 IST

दंड वसूल : फळ मार्केटमध्ये सर्वाधिक नियमांचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत १,०२७ जणांवर कारवाई करून, त्यांच्याकडून १ लाख ३२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. भाजीपाला, फळ व धान्य मार्केटमध्ये नियमांचे सर्वाधिक उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

एपीएमसी मार्केटमध्येही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. येथील पाच मार्केटमध्ये जवळपास एक लाख नागरिकांचा प्रतिदिन वावर असतो. मुंबई, नवी मुंबईमधील किरकोळ व्यापारी येथे खरेदीसाठी येत असतात. कोरोनामुळे मार्केटमधील अनेक प्रतिथयश व्यापाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. यामुळे बाजारसमितीने सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. प्रवेशद्वारावर तापमान व आॅक्सिजन तपासणीची सोय केली आहे. मार्केटमध्ये वेळोवेळी औषध फवारणी केली जात आहे. वाहनांचेही निर्जंतुकीकरण केले जात आहे. सद्यस्थितीमध्ये पाचही मार्केट पहिल्याप्रमाणे सुरू आहेत. मार्केटमध्ये सुरक्षेसाठी सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे, मास्कचा वापर करावा, असे आवाहन केले आहे, परंतु यानंतरही अनेक कामगार, व्यापारी व ग्राहकही मास्कचा वापर करत नाहीत. नियम तोडणाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना सचिव अनिल चव्हाण यांनी दिल्या आहेत.

सुरक्षा विभागाच्या वतीने नियमित कारवाई केली जात आहे. यानंतरही अद्याप अनेक जण मास्कचा वापर करत नसल्याचे निदर्शनास आले असून, प्रशासनाकडून कारवाईचे प्रमाण वाढविण्याची मागणी होत आहे.