शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

झेब्रा क्रॉसिंगचा रंग उडाल्याने अपघात

By admin | Updated: November 14, 2016 04:32 IST

पामबिच मार्गासह शहरातील मुख्य रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंग अदृश्य झाले आहेत. यामुळे सिग्नल लागल्यानंतर नेमके थांबायचे कुठे याबाबत

नवी मुंबई : पामबिच मार्गासह शहरातील मुख्य रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंग अदृश्य झाले आहेत. यामुळे सिग्नल लागल्यानंतर नेमके थांबायचे कुठे याबाबत चालकांमध्ये संभ्रम होत आहेत. परिणामी, अपघातांच्या घटना घडत असून चालकांचे वाहतूक पोलिसांसोबत वादाचे प्रकारही वाढत आहेत. अपघात टाळण्यासाठी सर्वच चौक व ज्याठिकाणी पादचारी रस्ता ओलांडतात, अशा ठिकाणी सिग्नल कार्यरत आहेत. अशा सर्वच ठिकाणी सिग्नल लागल्यानंतर वाहनांना थांबण्यासाठी व पादचाऱ्यांना चालण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग तयार केले जातात. काही ठिकाणी केवळ पांढऱ्या रंगाचे पट्टे मारून वाहनांना थांबण्यासाठी मर्यादा निश्चित करून दिली जात असते; परंतु सद्यस्थितीला शहरातील मुख्य तसेच विभाग अंतर्गतच्या रस्त्यांवरील हे पांढरे पट्टे तसेच झेब्रा क्रॉसिंग अदृश्य झाले आहेत. त्यांचा रंगच उडालेला असल्यामुळे अगदी दिवसाही हे पट्टे चालकांच्या नजरेस पडत नाहीत. त्यामध्ये पामबिच मार्गाचाही समावेश आहे. सिग्नलच्या ठिकाणचे पांढरे पट्टेच दिसेनासे झाल्यामुळे त्याठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी पामबिच मार्गावर एनआरआय येथे याच कारणामुळे एक अपघात झाला. त्यामध्ये एक महिला थोडक्यात मृत्यूच्या दाढेतून बचावली; परंतु दोन्ही अपघातग्रस्त वाहनचालकांनी पोलिसांसमक्ष एकमेकांविरुद्ध तक्रार नसल्याचे सांगून प्रकरण मिटवले. मात्र, शहरात बहुतांश ठिकाणी रोज अशा प्रकारच्या घटना झेब्रा क्रॉसिंगचा रंग उडाल्याने घडत आहेत. त्याकडे पालिका व वाहतूक पोलीस या दोन्ही प्रशासनांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.रस्त्याचे दुभाजक तसेच झेब्रा क्रॉसिंगची रंगरंगोटी पालिकेमार्फत केली जाते. त्यानुसार रंग उडालेल्या झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी रंगकाम करण्याचे पालिकेला कळवले असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगितले जात आहे. मात्र, पावसाळ्याच्या कारणावरून लांबणीवर गेलेल्या या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. परिणामी, सिग्नलच्या ठिकाणी वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. यामुळे वाहनचालक व वाहतूक पोलीस यांच्यात वादाचे प्रकारही घडत आहेत. पांढरा पट्टा नसल्यामुळे सिग्नल लागल्यावर नेमके थांबायचे कुठे हे कळत नसल्याचे चालकांकडून पोलिसांना सांगितले जात आहे, तर नकळत अथवा जाणिवपूर्वक काहीसे पुढे येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. वाशीतील शिवाजी चौक व कोपरखैरणेतील रा. फ. नाईक चौकात याच कारणामुळे वाहतूककोंडीही होत आहे. त्याठिकाणी सिग्नल ओलांडून पुढे येऊन थांबणाऱ्या वाहनांना आवरताना वाहतूक पोलिसांचीही दमछाक होत आहे. (प्रतिनिधी)