शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

५० किलोपेक्षा जास्त गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:27 IST

नेरूळ पोलिसांनी गांजा विक्रीच्या अड्ड्यावर गुरुवारी छापा टाकून वर्षातील सर्वात मोठा साठा जप्त केला आहे. ५० ते १०० किलोच्या दरम्यान गांजा सापडला असून एक वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

नवी मुंबई : नेरूळ पोलिसांनी गांजा विक्रीच्या अड्ड्यावर गुरुवारी छापा टाकून वर्षातील सर्वात मोठा साठा जप्त केला आहे. ५० ते १०० किलोच्या दरम्यान गांजा सापडला असून एक वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी अमली पदार्थमुक्त नवी मुंबई मोहीम राबविण्यास सुरवात केली आहे. याचाच भाग म्हणून जून २०१६ मध्ये स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी पथकाची स्थापना केली आहे. याशिवाय सर्व पोलीस स्टेशनला अमली पदार्थांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाचे काम चांगले चालले असून पोलीस स्टेशनअंतर्गत कारवाईला गती येत नव्हती. नेरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत व त्यांच्या पथकाने परिसरामध्ये गांजा विक्रीसाठी येणार असून त्याचा साठा करून ठेवला असल्याची माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे गुरुवारी सापळा रचून पोलिसांनी त्या अड्ड्यावर छापा टाकला आहे. पोलिसांना गांजाचा सर्वात मोठा साठा सापडला आहे. रात्री उशिरापर्यंत गांजाची मोजणी सुरू केली होती. सायंकाळी सहापर्यंत ५० किलोपेक्षा जास्त गाजा सापडल्याचे स्पष्ट झाले होते. पूर्ण वजन १०० किलोपर्यंत किंवा त्याहीपेक्षा जास्त भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या कारवाईविषयी पूर्णपणे गुप्तता बाळगली असून या गुन्ह्यातील सर्व आरोपींना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नक्की किती गांजा जप्त केला व किती जणांना अटक केली याविषयी अधिकृत माहिती पोलिसांनी दिलेली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर पत्रकार परिषदेमध्येच याविषयी माहिती देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.नवी मुंबईमध्ये आतापर्यंत तळोजामध्ये सर्वात जास्त ५ किलो गांजा हस्तगत करण्यात आला होता. जून २०१६ मध्ये ती कारवाई झाली होती. यानंतर आॅगस्टमध्ये तळोजामध्येच ८ किलो गांजा सापडला होता. सीबीडीमध्ये १ किलो, उरणमध्ये ३ किलो ६०० ग्रॅम, कोपरखैरणेमध्ये १ किलो ८०० ग्रॅम व दोन दिवसांपूर्वी एपीएमसीमधून २ किलो गांजा जप्त केला आहे. परंतु यापेक्षाही नेरूळमध्ये केलेली कारवाई मोठी असून पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होऊ लागले आहे.