शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

दररोज ४०० किलो द्राक्षांची होतेय विक्री

By admin | Updated: March 10, 2016 01:56 IST

शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा आणि ग्राहकांनाही कमी दरात उत्कृष्ट दर्जाचा माल मिळावा, यासाठी सरकारने शेतकऱ्यांना त्यांचा माल

जान्हवी मोर्ये,  डोंबिवलीशेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा आणि ग्राहकांनाही कमी दरात उत्कृष्ट दर्जाचा माल मिळावा, यासाठी सरकारने शेतकऱ्यांना त्यांचा माल कृषी उत्पन्न बाजार समितीऐवजी थेट खुल्या बाजारात विकण्यास मुभा दिली आहे. पुण्यातील नारायण गावाचे शेतकरी रामचंद्र चव्हाण याच संधीचा फायदा घेत आहेत. ते डोंबिवलीत दिवसभरात त्यांच्या शेतातील ४०० किलो द्राक्षे विकतात. ग्राहकांनाही वाजवी किमतीत द्राक्षे मिळत असल्याने तेही समाधानी आहेत.चव्हाण यांनी सात एकर शेतात द्राक्षाचे पीक घेतले आहे. ही द्राक्षे ते थेट डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेतील बाजारात २० दिवसांपासून विकत आहेत. ‘शेतकरी तुमच्या दारात’ या संकल्पने अंतर्गत ते पूर्वेत गणेश मंदिर परिसरात आणि पश्चिमेत सिंडीकेट बँकेजवळ टेम्पोतून द्राक्षाची विक्री करत आहेत. या टेम्पोवर द्राक्ष विक्रीसाठी त्यांनी चार कामगार ठेवले आहेत. त्यापैकी मालविक्री करणारे विनोद डोंगरे यांनी सांगितले की, ‘दररोज आमच्याकडील चारशे किलो द्राक्षे संपतात. बाजारात जास्त दराने द्राक्षे विकली जातात. कोणी ८० रुपये तर कोणी दर्जानुसार १२० प्रति किलोने द्राक्षे विकतात. आम्ही ६० रुपये किलो दराने द्राक्षे विकतो. बाजारातील द्राक्षे पावडर टाकून पिकवली जातात. आम्ही नैसर्गिकरित्या पिकवलेली द्राक्षे विकतो. या द्राक्षांमुळे त्यांच्या आरोग्याला कोणतीही हानी पोहोचत नाही. शिवाय त्यांचे २० रुपयेही वाचतात.’