शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

शहरातील ३१५ इमारती धोकादायक

By admin | Updated: June 15, 2017 03:19 IST

महापालिकेतर्फे शहरातील तीन वर्षांतील ३१५ धोकादायक इमारतींची यादी घोषित करण्यात आली आहे. त्यामध्ये यंदाच्या १४३ नव्या इमारतींचा समावेश असून

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिकेतर्फे शहरातील तीन वर्षांतील ३१५ धोकादायक इमारतींची यादी घोषित करण्यात आली आहे. त्यामध्ये यंदाच्या १४३ नव्या इमारतींचा समावेश असून, सीबीडीतील पोलीस वसाहत, वाशी प्लाझा यासह जय जवान इमारतींचाही त्यात उल्लेख आहे. त्यापैकी १२१ इमारतींमध्ये रहिवाशांचे वास्तव्य असून त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.प्रतिवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेतर्फे शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. त्यानुसार यंदाही धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, २०१७/१८ च्या यादीमध्ये १४३ इमारतींचा समावेश आहे, तर मागील तीन वर्षांत पालिकेने एकूण ३१५ धोकादायक इमारती घोषित केल्या आहेत. पडझड झाल्याने राहण्यास धोकादायक असलेल्या या इमारती पावसाळ्यात राहण्यायोग्य नसल्याने त्या तत्काळ खाली करण्याच्या सूचनाही पालिकेतर्फे करण्यात येतात. त्यानंतरही अनेक शासकीय अथवा खासगी धोकादायक इमारतींचा रहिवासी वापर होत आहे. यंदा प्रसिध्द केलेल्या धोकादायक इमारतींमध्ये अशा १२१ इमारतींचा समावेश आहे. घणसोली वगळता शहरातील इतर सातही नोडमध्ये अशा धोकादायक इमारती आहेत. त्यापैकी सर्वाधिक इमारती वाशी विभागातील आहेत. बी टाईप, राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाची (ईएसआयसी) वसाहत, एकता व अष्टभुजा अपार्टमेंट, दत्तगुरु नगर , विद्युत वितरण कर्मचारी वसाहत येथील या इमारती आहेत. त्यापैकी राज्य कामगार विमा योजनेच्या कामगारांच्या वसाहतीमधील चार इमारती गतवर्षी देखील धोकादायक घोषित करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र त्याठिकाणी अद्यापही कामगारांची पर्यायी सोय न झाल्याने जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. यंदा मात्र त्या चार इमारती वगळून उर्वरित नऊ इमारतींचा त्यात समावेश करण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण ईएसआयसी वसाहतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या कामगारांच्या पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.प्रतिवर्षी धोकादायक घोषित केल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये सिडको निर्मित इमारतींचा सर्वाधिक समावेश असतो. वाशीतील बी टाईप, कोपरखैरणेतील चंद्रलोक सोसायटी, नेरुळमधील एन एल टाईप याठिकाणी सतत पडझड सुरु असते. इमारती मोडकळीस काढाव्यात अशा सूचना प्रतिवर्षी पालिकेकडून केल्या जातात. परंतु पुनर्बांधणीसाठी गरजेचा असलेला एफएसआयचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्यामुळे त्याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष होत आहे. २०१५ साली पालिकेतर्फे ७४ धोकादायक इमारतींची यादी घोषित करण्यात आली होती. गतवर्षी त्यात वाढ होवून ९८ इमारतींची यादी प्रसिध्द करण्यात आलेली. यंदा मात्र धोकादायक इमारतींची ही संख्या १४३ पर्यंत पोचली आहे. यानुसार तीन वर्षांत घोषित झालेल्या एकूण ३१५ इमारतींपैकी २७४ इमारतींचा अद्यापही रहिवासी अथवा वाणिज्य वापर होत आहे. त्यापैकी काही इमारतींचे नव्याने स्ट्रक्चर आॅडिट करून त्या राहण्यायोग्य असल्याचे दाखवले जात आहे.धोकादायक इमारतींचा रहिवासी वापरपालिकेतर्फे धोकादायक घोषित केल्यानंतरही अनेक इमारतींचा रहिवासी वापर होत आहे, तर इमारत धोकादायक घोषित केल्यानंतर पालिकेचेही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे त्याठिकाणी भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. यामुळे धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.दुरुस्तीबाबत अनास्थाशहरातील धोकादायक इमारतींचा आकडा प्रतिवर्षी वाढतच चालला आहे. धोकादायक घोषित केल्यानंतर सदर इमारतींच्या पुनर्बांधणी अथवा दुरुस्ती होत आहे का हे पडताळणारी यंत्रणाच नाही. त्यामुळे सदर इमारतींमध्ये वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांवर मृत्यूची टांगती तलवार निर्माण झालेली आहे.यादीबाबत साशंकतासध्या नवी मुंबईत इमारतींच्या पुनर्वसनाचे वारे जोरात वाहत आहे. परंतु इमारतींच्या पुनर्बांधणीकरिता त्या धोकादायक स्थितीत असणे आवश्यक आहे. यामुळे विकासकांची मर्जी राखत काही चांगल्या स्थितीतल्या इमारतींचा देखील धोकादायक इमारतींच्या यादीत समावेश झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.