शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पदपथ, रस्त्यांवर वर्षाला ३०० कोटींचा खर्च

By admin | Updated: March 5, 2017 03:02 IST

रस्ते, पदपथ, गटारांची दुरुस्ती व निर्मिती करण्यावर महापालिकेने पाच वर्षांत तब्बल १५५० कोटी रुपये खर्च केले आहेत. प्रत्येक वर्षी सरासरी ३०० कोटींचा खर्च होत आहे. एवढा प्रचंड

- नामदेव मोरे, नवी मुंबई

रस्ते, पदपथ, गटारांची दुरुस्ती व निर्मिती करण्यावर महापालिकेने पाच वर्षांत तब्बल १५५० कोटी रुपये खर्च केले आहेत. प्रत्येक वर्षी सरासरी ३०० कोटींचा खर्च होत आहे. एवढा प्रचंड खर्च होऊनही रस्ते चालण्यासाठी उपलब्ध नाहीत. महत्त्वाच्या सर्व पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले असून त्यांना हटविण्यात पालिकेला अपयश आले आहे. रस्ते व पदपथावरील सर्व फेरीवाल्यांना हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नवी मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत. न्यायालयानेच आदेश दिल्यामुळे आता महापालिका रस्ते, पदपथ व मोक्याच्या ठिकाणी बसविलेल्या फेरीवाल्यांना हटविणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वास्तविक शहरवासीयांच्या सुविधेसाठी चांगले रस्ते व पदपथ तयार करण्याचे काम अभियांत्रिकी विभागाकडून केले जात आहे. इतर शहरांच्या तुलनेमध्ये नवी मुंबईमधील पदपथांची स्थिती चांगली आहे; पण यानंतरही त्यांचा वापर नागरिकांना करता येत नाही. कारण, बहुतांश ठिकाणी रोडवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. कोपरखैरणेमधील गुलाब सन्स डेरी ते सेक्टर १५मध्ये जाणाऱ्या रोडवर दोन्ही बाजूला फेरीवाले बसलेले असतात. नेरुळ रेल्वेस्टेशनच्या बाहेरही रोडवर व दुभाजकावरही फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. सानपाडा रेल्वेस्टेशनच्या बाहेर व मॅफ्को मार्केटजवळही पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. शहरात सर्वच विभागांमध्ये हीच स्थिती आहे. ज्या ठिकाणी अतिक्रमण नाही तेथे गटारांवर झाकणेच नसल्याने पदपथावरून चालता येत नाही. गटारांची स्थितीही तशीच आहे. पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी तयार केलेल्या गटारांमध्ये बारमाही पाणी असते. अनेक हॉटेल व इतर ठिकाणचे सांडपाणी गटारात सोडले जात आहे. पदपथांची देखभाल, दुरुस्ती करण्यासाठी प्रत्येक वर्षी १०० कोटींपेक्षा जास्त खर्च होत आहे. नवीन रस्ते व पदपथ बांधण्यासाठीही १०० ते ११५ कोटी रुपये खर्च होत आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये रस्ते व पदपथ तयार करण्यासाठी व नवीन बांधण्यासाठी २५ ते १०० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. नाल्यांची दुरुस्ती करण्यावरही मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पामध्ये सर्वाधिक खर्च रस्ते, पदपथ व गटारांवर खर्च होत आहे. सरासरी प्रत्येकी वर्षी ३०० कोटींपेक्षा जास्त खर्च होत आहेत; पण एवढा खर्च करूनही नागरिकांना पदपथावरून चालता येत नाही. रोडवरही अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्याच्यांवर कारवाई करण्यास पालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. उच्च न्यायालयाने फेरीवाल्यांना हटविण्याचे आदेश दिले आहेत. विभाग कार्यालयाचा वरदहस्तशहरातील फेरीवाल्यांना विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांचेच अभय असल्याचे अनेक वेळा स्पष्ट झाले आहे. ज्या विभागात कारवाई करणार त्या विभागामध्ये कारवाईपूर्वीच फेरीवाल्यांना फोन करून कारवाई होणार असल्याचा निरोप सांगितला जातो. कारवाई सातत्याने करण्याचे आदेश असतील, तर थोडे दिवस व्यवसाय बंद ठेवण्याचेही सांगितले जात आहे. पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांमुळेच फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे.लोकप्रतिनिधींचाही हातशहरात काही ठिकाणी फेरीवाल्यांना राजकीय नेत्यांचे अभय मिळत आहे. फेरीवाल्यांना जागावाटप करून देण्यापासून त्यांच्या अडचणी सोडविण्याचे कामही अनेक जण करत आहेत. फेरीवाल्यांकडून वसुली करणाऱ्यांचेही प्रमाण वाढत असून राजकीय व प्रशासकीय वरदहस्त असल्यामुळेच पदपथ व रोडवरील अतिक्रमण हटविणे अशक्य होत आहे.