शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

लोकायुक्तांकडे २५६ कु टुंबांची तक्रार

By admin | Updated: August 30, 2016 03:06 IST

सन १९७० च्या अधिसूचनेने न्हावा शेवा बंदर प्रकल्पासाठी संपादित केली तेव्हापासून लोकसेवकांकडून आम्हास विनाकारण त्रास देण्यात येत आहे.

जयंत धुळप,  अलिबागसन १९७० च्या अधिसूचनेने न्हावा शेवा बंदर प्रकल्पासाठी संपादित केली तेव्हापासून लोकसेवकांकडून आम्हास विनाकारण त्रास देण्यात येत आहे. तो थांबविण्यात यावा या प्रमुख मागणीकरिता उरणमधील हनुमान कोळीवाडा परिसरातील त्रस्त २५६ कुटुंबांच्या वतीने मनोहर काशिनाथ कोळी यांनी तब्बल ३९ पुराव्यांच्या दस्तावेजांसह लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. त्याची सुनावणी लवकरच होईल, अशी माहिती मनोहर कोळी यांनी दिली आहे.तक्रारीमध्ये नमूद लोकसेवकांमध्ये पनवेल उपविभागीय अधिकारी, रायगड जिल्हाधिकारी, कोकण विभागीय महसूल आयुक्त, न्हावा शेवा बंदर प्रकल्प पुनर्वसन समिती अध्यक्ष, प्रधान सचिव महसूल व वनविभाग (पुनर्वसन), प्रधान सचिव नगर विकास विभाग (१), मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य या सहा जणांचा समावेश आहे.रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील शेवाकोळीवाडा गावचे अनादी काळापासून आम्ही मूळचे रहिवासी आहोत. त्या गावात चरितार्थासाठी पिढ्यान्पिढ्या चालत आलेली हक्काची साधन संपदा होती. ती साधन संपदा (गावठाण वगळून) या लोकसेवकांनी सन १९७० च्या अधिसूचनेने न्हावा शेवा बंदर प्रकल्पासाठी संपादित केली आहे. त्यानंतर न्हावा शेवा बंदर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कारणासाठी शेवाकोळीवाडा गावठाण कोकण विभागीय महसूल आयुक्तांच्या सन १९८४ च्या अधिसूचनेने संपादित केली आहे.पनवेल उपविभागीय अधिकाऱ्यांनी शेवा कोळीवाडा गावाला ५१ हेक्टर मंजूर जमिनीपैकी १२ हेक्टर जमिनीत सन १९८३ ला स्थलांतर करुन घेतल्यानंतर १७ मार्च १९९० व १७ फेब्रुवारी १९९० रोजी महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट) नियम १९७१ च्या रुल ३० अन्वये ७.१२ हेक्टर मूळ गावठाणाच्या बदल्यात नवीन गावठाणात २१.९० हेक्टर (नवीन शेवा गावाला मौ.बोकडवीरा येथील १५.७५ हेक्टर व हनुमानकोळीवाडा गावाला मौ.बोरीपाखाली येथील ६.१५ हेक्टर ) जमीन विकसित देखील करुन दिलेली आहे,अशी बनावट आज्ञापत्रे केलेली आहेत,असे या तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी जिल्हा प्रशासन व शासनाकडून भूमिका मांडली जाईल. सध्या हे प्रकरण अलिबाग उप विभागीय महसूल अधिकारी व प्रभारी जिल्हा पुनर्वसन अधिकारी सर्जेराव सोनवणे यांच्याकडे असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन विभागाचे तहसीलदार मिलिंद गांगुर्डे यांनी दिली आहे.