शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भिवंडी दंगल प्रकरणातील १७ जणांची निर्दोष मुक्तता

By admin | Updated: September 11, 2016 02:25 IST

राज्यातील अनेक भागात पोलिसांना मारहाणीचे प्रकार घडत असतांनाच दहा वर्षांपूर्वी भिवंडीत पोलीस चौकी पाडून टाकण्याच्या वादातून उसळलेल्या कोटरगेट दंगल प्रकरणातून १७ आरोपींची सबळ

ठाणे : राज्यातील अनेक भागात पोलिसांना मारहाणीचे प्रकार घडत असतांनाच दहा वर्षांपूर्वी भिवंडीत पोलीस चौकी पाडून टाकण्याच्या वादातून उसळलेल्या कोटरगेट दंगल प्रकरणातून १७ आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एस. भैसारे यांनी अलीकडेच दिले आहेत. प्रक्षुब्ध जमावाने दोन पोलिसांची निर्घृण हत्या केली होती.दंगलीत सहभाग असलेल्या या १७ जणांविरुध्द वेगवेगळ्या १४ कृ त्यांकरीता गुन्हे दाखल केले होते. यामध्ये अन्सारी अक्र म सोहेल, अन्सारी वसीम सोहेल, मोहमद रईस सल्लूउद्दीन अन्सारी, सुफीयान जमील कुरेशी, मोहमद आलम सौदागर अली अन्सारी, हसन अस्मान कुरेशी, जाफर इक्बाल अब्दुल जलील अन्सारी, सलीम शाह मोहमद मोमीन, अकील अब्दुल समद खान, नियाज अहमद रईस अहमद अन्सारी, मोहमद सलीम शफीक शेख, रिझवान अब्दुल सलीम उर्फ अलीम शेख, तौफीक अहमद समुद्दीन अन्सारी, आसीफ अब्दुल कलाम शेख, इक्बाल अहमद कुटूबूद्दीन अन्सारी, मोहमद अकील मोहमद शकील शेख, मोहमद शकील मोहमद शफीक शेख यांचा समावेश होता. मात्र सरकारी पक्षाला ते सिध्द करण्यात कमालीचे अपयश आल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने नोंदविला आहे. यामुळे दंगलीसारख्या अंत्यत गंभीर घटनेतही पुरावे गोळा करण्यात सरकारी पक्षाकडून कशी हगयग होते, याचे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. रात्रीच्या वेळेस गस्त घालणाऱ्या रमेश जगताप आणि बी. एस. गांगुर्डे या दोन पोलिसांवर सशस्त्र जमावाने हल्ला करुन त्यांची भर रस्त्यात हत्या केली. त्यानंतर या दोघांचे मृतदेह जाळून टाकण्यात आले होते. या दोघांच्या निर्घृण हत्येसंदर्भातील निकाल लागलेला नाही. मात्र ज्या पोलीस ठाण्याच्या उभारणीला विरोध करताना दंगल झाली त्यामधील आरोपी निर्दोष मुक्त झाले. अतिरिक्त सरकारी वकील दिलीप भाईराम यांनी न्यायालयात सांगितले की, ज्या ठिकाणी पोलीस स्थानक उभारण्याचे काम सुरु होते, तेथे शकील रझा यांच्या नेतृत्वाखाली रझा अकादमीचे कार्यकर्ते जमा झाले व त्यांनी दगडफेक करुन हे काम बंद पाडले.(प्रतिनिधी)