शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

भिवंडी दंगल प्रकरणातील १७ जणांची निर्दोष मुक्तता

By admin | Updated: September 11, 2016 02:25 IST

राज्यातील अनेक भागात पोलिसांना मारहाणीचे प्रकार घडत असतांनाच दहा वर्षांपूर्वी भिवंडीत पोलीस चौकी पाडून टाकण्याच्या वादातून उसळलेल्या कोटरगेट दंगल प्रकरणातून १७ आरोपींची सबळ

ठाणे : राज्यातील अनेक भागात पोलिसांना मारहाणीचे प्रकार घडत असतांनाच दहा वर्षांपूर्वी भिवंडीत पोलीस चौकी पाडून टाकण्याच्या वादातून उसळलेल्या कोटरगेट दंगल प्रकरणातून १७ आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एस. भैसारे यांनी अलीकडेच दिले आहेत. प्रक्षुब्ध जमावाने दोन पोलिसांची निर्घृण हत्या केली होती.दंगलीत सहभाग असलेल्या या १७ जणांविरुध्द वेगवेगळ्या १४ कृ त्यांकरीता गुन्हे दाखल केले होते. यामध्ये अन्सारी अक्र म सोहेल, अन्सारी वसीम सोहेल, मोहमद रईस सल्लूउद्दीन अन्सारी, सुफीयान जमील कुरेशी, मोहमद आलम सौदागर अली अन्सारी, हसन अस्मान कुरेशी, जाफर इक्बाल अब्दुल जलील अन्सारी, सलीम शाह मोहमद मोमीन, अकील अब्दुल समद खान, नियाज अहमद रईस अहमद अन्सारी, मोहमद सलीम शफीक शेख, रिझवान अब्दुल सलीम उर्फ अलीम शेख, तौफीक अहमद समुद्दीन अन्सारी, आसीफ अब्दुल कलाम शेख, इक्बाल अहमद कुटूबूद्दीन अन्सारी, मोहमद अकील मोहमद शकील शेख, मोहमद शकील मोहमद शफीक शेख यांचा समावेश होता. मात्र सरकारी पक्षाला ते सिध्द करण्यात कमालीचे अपयश आल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने नोंदविला आहे. यामुळे दंगलीसारख्या अंत्यत गंभीर घटनेतही पुरावे गोळा करण्यात सरकारी पक्षाकडून कशी हगयग होते, याचे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. रात्रीच्या वेळेस गस्त घालणाऱ्या रमेश जगताप आणि बी. एस. गांगुर्डे या दोन पोलिसांवर सशस्त्र जमावाने हल्ला करुन त्यांची भर रस्त्यात हत्या केली. त्यानंतर या दोघांचे मृतदेह जाळून टाकण्यात आले होते. या दोघांच्या निर्घृण हत्येसंदर्भातील निकाल लागलेला नाही. मात्र ज्या पोलीस ठाण्याच्या उभारणीला विरोध करताना दंगल झाली त्यामधील आरोपी निर्दोष मुक्त झाले. अतिरिक्त सरकारी वकील दिलीप भाईराम यांनी न्यायालयात सांगितले की, ज्या ठिकाणी पोलीस स्थानक उभारण्याचे काम सुरु होते, तेथे शकील रझा यांच्या नेतृत्वाखाली रझा अकादमीचे कार्यकर्ते जमा झाले व त्यांनी दगडफेक करुन हे काम बंद पाडले.(प्रतिनिधी)