शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

घणसोली गावातील मंदिरात १६८ तास अखंड हरिनाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 23:18 IST

११७ वर्षांची परंपरा । ग्रामस्थांनी निर्माण केला ऐक्याचा आदर्श

नवी मुंबई : स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या घणसोलीमधील ग्रामस्थांनी दहीहंडी उत्सवाची ११७ वर्षांची परंपरा जपली आहे. हनुमान मंदिरामध्ये सलग १६८ तास भजन सादर करण्यात आले. ग्रामस्थांनी जुनी परंपरा जपून सर्वांसमोर ऐक्याचा नवीन आदर्श घालून दिला आहे.

स्वातंत्र्य लढ्यामध्ये घणसोलीमधील स्वातंत्र्यसैनिकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या परिसरात सरोजिनी नायडू, दत्ताजी ताम्हणे व इतर अनेक स्वातंत्र्यसेनानींनी हजेरी लावली होती. नवी मुंबई महापालिकेची निर्मिती झाल्यानंतरही ग्रामस्थांनी गावातील जुन्या परंपरा व उत्सव सुरूच ठेवले असून त्यामध्ये गोकुळ अष्टमी महोत्सवाचाही समावेश आहे. १६ आॅगस्टला गावातील हनुमान मंदिरामध्ये अखंड हरिनामाला सुरुवात झाली. सलग १६८ तास मंदिरामध्ये भजन करण्यात आले.

गावातील कौलआळी, कोळीआळी, म्हात्रेआळी, चिंचआळी, नवघरआळी, पाटीलआळी या सहा प्रमुख आळीमधील नागरिक नियोजन करून २४ तास भजन म्हणत असतात. शुक्रवारी मध्यरात्री हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. पाटीलआळीच्या महिला भजनमंडळाने मंदिरामध्ये श्रीकृष्णजन्माचे पाळणागीत सादर केले. शानिवारी मानाची हंडी म्हात्रेआळीच्या मनीष म्हात्रे यांनी फोडली. गावामध्ये उंच दहीहंडी उभारण्यात येत नाही. १५ फुटांपर्यंतच हंडी उभारली जाते.

टाळ, मृदुंगाच्या गजरात सलग सात दिवस २४ तास भजन सादर करण्याची परंपरा देशात फक्त घणसोलीमध्ये सुरू आहे. ११७ वर्षे अखंडपणे ही परंपरा सुरू ठेवण्यात आली असून हा एक विक्रम समजला जात असुन ग्रामस्थांनी ऐक्याचा आदर्श कायम ठेवला आहे.घरामध्ये सुरू झाला उत्सवघणसोलीमधील शिनवार कमळ्या पाटील यांच्या घरामध्ये १९०२ मध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली. १९०६ पर्यंत त्यांच्याच घरात हा उत्सव सुरू होता. त्यानंतर ग्रामस्थांनी गावच्या मंदिरात तो उत्सव सुरू करून ती परंपरा कायम ठेवली आहे. शिनवार पाटील यांच्या चौथ्या पिढीतील भानुदास पाटील यांची मानाची दहीहंडी यावर्षी म्हात्रेआळी बाळगोपाळांनी फोडली.