शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

तरुण मतदारांना हवे केजरीवालांसारखे नेतृत्व

By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST

आसाममधील तरुण मतदार येत्या विधानसभा निवडणुकीत चांगल्या बदलाची अपेक्षा करीत असून आपल्या राज्यासाठी त्यांना सर्वंकष विकास आणि सर्व धर्मांच्या कल्याणासाठी काम करणारे

तेलपूर (आसाम) : आसाममधील तरुण मतदार येत्या विधानसभा निवडणुकीत चांगल्या बदलाची अपेक्षा करीत असून आपल्या राज्यासाठी त्यांना सर्वंकष विकास आणि सर्व धर्मांच्या कल्याणासाठी काम करणारे शेजारील त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारखे नेतृत्व हवे आहे. राज्यातील युवा मतदार आणि प्रामुख्याने प्रथमच मतदानाचा अधिकार बजावण्यास आतुर असलेल्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. तेजपूर विद्यापीठात शिकणारी उद्दीपना गोस्वामी म्हणाली, आम्हाला बदल हवा आहे हे निश्चित; परंतु तो चांगला असावा. भाजप अशा बदलाचा दावा करीत असला तरी अलीकडच्या काळातील काही घटनांमुळे चिंता वाढली आहे. आसाममध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रवेश, प्रादेशिकवादावर राष्ट्रवाद थोपणे आणि सांप्रदायिक भेदभाव निर्माण होण्याच्या भीतीमुळे विद्यार्थी सतर्क झाले आहेत, असाही दावा तिने केला, तर भाजपचा प्रचार केवळ तरुण गोगोर्इंविरुद्ध असून आपल्या योजना काय आहेत हे मात्र या पक्षाने स्पष्ट केले नसल्याचे मत सुकन्या मजुमदारने मांडले. दरांग महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या हिमांका फुकन याने सांगितले की, भाजप सत्तेत आल्यास धोका निर्माण होऊ शकतो; पण आम्ही हा धोका पत्करण्यास तयार आहोत, कारण आम्हाला बदल पाहिजे आहे. फुकनची वर्गमैत्रीण मयुरी बोरा ही मात्र त्याच्या मताशी सहमत नाही. काँग्रेसच्या तीन वर्षांच्या शासनकाळात आसाममध्ये काहीच विकास झाला नाही असे म्हणणे चुकीचे आहे; पण बदलत्या काळासोबत लोकांना गतिमान विकास अपेक्षित आहे, असे ती म्हणाली.