शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तरुण मतदारांना हवे केजरीवालांसारखे नेतृत्व

By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST

आसाममधील तरुण मतदार येत्या विधानसभा निवडणुकीत चांगल्या बदलाची अपेक्षा करीत असून आपल्या राज्यासाठी त्यांना सर्वंकष विकास आणि सर्व धर्मांच्या कल्याणासाठी काम करणारे

तेलपूर (आसाम) : आसाममधील तरुण मतदार येत्या विधानसभा निवडणुकीत चांगल्या बदलाची अपेक्षा करीत असून आपल्या राज्यासाठी त्यांना सर्वंकष विकास आणि सर्व धर्मांच्या कल्याणासाठी काम करणारे शेजारील त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारखे नेतृत्व हवे आहे. राज्यातील युवा मतदार आणि प्रामुख्याने प्रथमच मतदानाचा अधिकार बजावण्यास आतुर असलेल्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. तेजपूर विद्यापीठात शिकणारी उद्दीपना गोस्वामी म्हणाली, आम्हाला बदल हवा आहे हे निश्चित; परंतु तो चांगला असावा. भाजप अशा बदलाचा दावा करीत असला तरी अलीकडच्या काळातील काही घटनांमुळे चिंता वाढली आहे. आसाममध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रवेश, प्रादेशिकवादावर राष्ट्रवाद थोपणे आणि सांप्रदायिक भेदभाव निर्माण होण्याच्या भीतीमुळे विद्यार्थी सतर्क झाले आहेत, असाही दावा तिने केला, तर भाजपचा प्रचार केवळ तरुण गोगोर्इंविरुद्ध असून आपल्या योजना काय आहेत हे मात्र या पक्षाने स्पष्ट केले नसल्याचे मत सुकन्या मजुमदारने मांडले. दरांग महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या हिमांका फुकन याने सांगितले की, भाजप सत्तेत आल्यास धोका निर्माण होऊ शकतो; पण आम्ही हा धोका पत्करण्यास तयार आहोत, कारण आम्हाला बदल पाहिजे आहे. फुकनची वर्गमैत्रीण मयुरी बोरा ही मात्र त्याच्या मताशी सहमत नाही. काँग्रेसच्या तीन वर्षांच्या शासनकाळात आसाममध्ये काहीच विकास झाला नाही असे म्हणणे चुकीचे आहे; पण बदलत्या काळासोबत लोकांना गतिमान विकास अपेक्षित आहे, असे ती म्हणाली.