शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

योग्य दिशेने चालताय, राहुल गांधींकडून योगींचं कौतुक

By admin | Updated: April 5, 2017 13:53 IST

योगी आदित्यनाथ सरकारने उत्तर प्रदेशात शेतक-यांची कर्जमाफी करण्याचा घेतलेला निर्णय योग्य दिशेने उचलण्यात आलेलं पाऊल असल्याचं कौतुक राहुल गांधींनी केलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - योगी आदित्यनाथ सरकारने उत्तर प्रदेशात शेतक-यांची कर्जमाफी करण्याचा घेतलेला निर्णय पक्षपाती असल्याची टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. तर दुसरीकडे हे योग्य दिशेने उचलण्यात आलेलं पाऊल असल्याचं म्हणत कौतुकही केलं आहे. राहुल गांधी यांनी सलग ट्विट करत योगी आदित्यनाथ सरकारच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. यावेळी राहुल गांधी यांनी संपुर्ण देशाचा विचार करत इतर राज्यांमधीलही शेतक-यांचा विचार केला जावा, त्यांच्यासोबत दुजाभाव करु नये अशी मागणी केली आहे. 
 
"शेतक-यांसाठी हा पक्षपाती दिलासा आहे. मात्र योग्य दिशेने उचलण्यात आलेलं पाऊल आहे. शेतक-याचं कर्जमाफ केलं जावं यासाठी काँग्रेसने नेहमीच पाठिंबा दिला आहे. भाजपाने हा निर्णय घेतला याचा आनंद आहे, मात्र याचं राजकारण केलं जाऊ नये. देशभरातील शेतकरी त्रस्त असून भाजपाने इतर राज्यांसोबत दुजाभाव करु नये", असं राहुल गांधी ट्विटरच्या माध्यमातून बोलले आहेत.
 
उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, योगी आदित्यनाथ सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांची १ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेऊन आश्वासनाची पूर्तता केली. यूपीतील ८६ लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असून, त्यासाठी ३0 हजार ७२९ कोटी रुपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे.
 
शपथ घेतल्यानंतर लगेचच राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्याची परंपरा योगी आदित्यनाथांनी मोडली. मात्र उशिरा घेण्यात आलेल्या बैठकीतही निवडणुकीत दिलेलं आश्वासन त्यांनी पाळलं. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा सत्तेत आल्यानंतर पहिल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफी करण्याचं आश्वासन शेतक-यांना दिलं होतं.