शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

योग्य दिशेने चालताय, राहुल गांधींकडून योगींचं कौतुक

By admin | Updated: April 5, 2017 13:53 IST

योगी आदित्यनाथ सरकारने उत्तर प्रदेशात शेतक-यांची कर्जमाफी करण्याचा घेतलेला निर्णय योग्य दिशेने उचलण्यात आलेलं पाऊल असल्याचं कौतुक राहुल गांधींनी केलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - योगी आदित्यनाथ सरकारने उत्तर प्रदेशात शेतक-यांची कर्जमाफी करण्याचा घेतलेला निर्णय पक्षपाती असल्याची टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. तर दुसरीकडे हे योग्य दिशेने उचलण्यात आलेलं पाऊल असल्याचं म्हणत कौतुकही केलं आहे. राहुल गांधी यांनी सलग ट्विट करत योगी आदित्यनाथ सरकारच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. यावेळी राहुल गांधी यांनी संपुर्ण देशाचा विचार करत इतर राज्यांमधीलही शेतक-यांचा विचार केला जावा, त्यांच्यासोबत दुजाभाव करु नये अशी मागणी केली आहे. 
 
"शेतक-यांसाठी हा पक्षपाती दिलासा आहे. मात्र योग्य दिशेने उचलण्यात आलेलं पाऊल आहे. शेतक-याचं कर्जमाफ केलं जावं यासाठी काँग्रेसने नेहमीच पाठिंबा दिला आहे. भाजपाने हा निर्णय घेतला याचा आनंद आहे, मात्र याचं राजकारण केलं जाऊ नये. देशभरातील शेतकरी त्रस्त असून भाजपाने इतर राज्यांसोबत दुजाभाव करु नये", असं राहुल गांधी ट्विटरच्या माध्यमातून बोलले आहेत.
 
उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, योगी आदित्यनाथ सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांची १ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेऊन आश्वासनाची पूर्तता केली. यूपीतील ८६ लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असून, त्यासाठी ३0 हजार ७२९ कोटी रुपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे.
 
शपथ घेतल्यानंतर लगेचच राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्याची परंपरा योगी आदित्यनाथांनी मोडली. मात्र उशिरा घेण्यात आलेल्या बैठकीतही निवडणुकीत दिलेलं आश्वासन त्यांनी पाळलं. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा सत्तेत आल्यानंतर पहिल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफी करण्याचं आश्वासन शेतक-यांना दिलं होतं.