शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

योग्य दिशेने चालताय, राहुल गांधींकडून योगींचं कौतुक

By admin | Updated: April 5, 2017 13:53 IST

योगी आदित्यनाथ सरकारने उत्तर प्रदेशात शेतक-यांची कर्जमाफी करण्याचा घेतलेला निर्णय योग्य दिशेने उचलण्यात आलेलं पाऊल असल्याचं कौतुक राहुल गांधींनी केलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - योगी आदित्यनाथ सरकारने उत्तर प्रदेशात शेतक-यांची कर्जमाफी करण्याचा घेतलेला निर्णय पक्षपाती असल्याची टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. तर दुसरीकडे हे योग्य दिशेने उचलण्यात आलेलं पाऊल असल्याचं म्हणत कौतुकही केलं आहे. राहुल गांधी यांनी सलग ट्विट करत योगी आदित्यनाथ सरकारच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. यावेळी राहुल गांधी यांनी संपुर्ण देशाचा विचार करत इतर राज्यांमधीलही शेतक-यांचा विचार केला जावा, त्यांच्यासोबत दुजाभाव करु नये अशी मागणी केली आहे. 
 
"शेतक-यांसाठी हा पक्षपाती दिलासा आहे. मात्र योग्य दिशेने उचलण्यात आलेलं पाऊल आहे. शेतक-याचं कर्जमाफ केलं जावं यासाठी काँग्रेसने नेहमीच पाठिंबा दिला आहे. भाजपाने हा निर्णय घेतला याचा आनंद आहे, मात्र याचं राजकारण केलं जाऊ नये. देशभरातील शेतकरी त्रस्त असून भाजपाने इतर राज्यांसोबत दुजाभाव करु नये", असं राहुल गांधी ट्विटरच्या माध्यमातून बोलले आहेत.
 
उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, योगी आदित्यनाथ सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांची १ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेऊन आश्वासनाची पूर्तता केली. यूपीतील ८६ लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असून, त्यासाठी ३0 हजार ७२९ कोटी रुपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे.
 
शपथ घेतल्यानंतर लगेचच राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्याची परंपरा योगी आदित्यनाथांनी मोडली. मात्र उशिरा घेण्यात आलेल्या बैठकीतही निवडणुकीत दिलेलं आश्वासन त्यांनी पाळलं. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा सत्तेत आल्यानंतर पहिल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफी करण्याचं आश्वासन शेतक-यांना दिलं होतं.