शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

यंदाची दिवाळी वीर जवानांना समर्पित - पंतप्रधान

By admin | Updated: October 30, 2016 12:41 IST

देशवासीयांच्या सुरक्षेसाठी बहादूर जवान आपले सर्वस्व पणाला लावत आहेत.असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी यावर्षीची दिवाळी जवानांना समर्पित केली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - "देशात दिवाळी साजरी होत असताना सीमेवर तणावाचे वातावरण आहे. देशवासीयांच्या सुरक्षेसाठी बहादूर जवान आपले सर्वस्व पणाला लावत आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी या बहादूर जवानांना समर्पित करू," असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी यावर्षीची दिवाळी जवानांना समर्पित केली. 
देशात सुरू असलेल्या दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी नियंत्रण रेषेवर देशाच्या संरक्षणासाठी  प्राणाची बाजी लावून देशाची सुरक्षा करत असलेल्या जवानांचा विशेष उल्लेख केला. "आपले जवान देशाच्या सुरक्षेसाठी अनेक कष्ट झेलत आहेत. आम्ही दिवाळी साजरी करत असताना देशाच्या संरक्षणासाठी कुणी हिमालयाच्या शिखरावर, तर कुणी वाळवंटात उभा राहून पहारा देत आहे. देशवासीयांच्या शुभेच्छांमुळे सैनिकांचे सामर्थ्य वाढते. त्यामुळे यंदाची दिवाळी आपण जवानांना समर्पित करूया," असे पंतप्रधान म्हणाले. 
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिवाळी हा अंध:काराकडून  प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा सण असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. "विविधतेने नटलेल्या आपल्या देशात वर्षभर कुठले ना कुठले सण साजरे होत असतात. सध्या दिवाळी सुरू आहे. आपला प्रत्येक सण कुठला ना कुठला संदेश देतो. तसा दिवाळी हा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची शिकवण देणारा सण आहे. दिवाळीसाठी आपण  घरात स्वच्छता करतो. पण आता केवळ घरापुरतेच मर्यादित न राहता या स्वच्छतेची व्यापकता वाढवण्याची आवश्यकता आहे," असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केले. 
दिवाळी हा आता जागतिक सण बनत असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. "जगभरात दिवाळी साजरी होत आहे. अमेरिकेत दिवाळीनिमित्त पोस्टाचे तिकीट प्रसिद्ध झाले आहे. ब्रिटनमध्ये दिवाळी  साजरी केली जात नाही असे कुठलेही  शहर नसेल. कॅनडा, सिंगापूरच्या प्रमुखांनीही दिवाळी साजरी करतानाचे आपले फोटो प्रसिद्ध केले आहेत. एकूणच  दिवाळी हा सण आता जगासाठी अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा प्रेरणास्त्रोत बनत आहे," असे पंतप्रधांनांनी सांगितले.
यावेळी पंतप्रधानांनी देशातील अनेक राज्ये आता उघड्यावर होणाऱ्या शौचापासून मुक्त होणाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सांगितले. तसेच गावातील 57 कुटुंबाना शौचालय बांधण्यास मदत करणारा आयटीबीपीचा जवान विकास ठाकूर याचे कौतुक केले.  21व्या शतकातही गावात वीज नसणे योग्य नाही. यासाठी प्रत्येक गावात वीज पोहोचवण्याची योजना राबवली जात आहे. ती योग्य दिशेने पुढे जात असल्याचेही पंतप्रधान  म्हणाले. 
देशवासीयांना दिलेल्या संदेशादरम्यान पंतप्रधानांनी सरदार पटेल आणि  इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच एकतेसाठी झटणाऱ्या जयंतीदिनीच  1984 साली हजारो शिखांची हत्या झाल्याचाही उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला.