शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

यंदाची दिवाळी वीर जवानांना समर्पित - पंतप्रधान

By admin | Updated: October 30, 2016 12:41 IST

देशवासीयांच्या सुरक्षेसाठी बहादूर जवान आपले सर्वस्व पणाला लावत आहेत.असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी यावर्षीची दिवाळी जवानांना समर्पित केली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - "देशात दिवाळी साजरी होत असताना सीमेवर तणावाचे वातावरण आहे. देशवासीयांच्या सुरक्षेसाठी बहादूर जवान आपले सर्वस्व पणाला लावत आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी या बहादूर जवानांना समर्पित करू," असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी यावर्षीची दिवाळी जवानांना समर्पित केली. 
देशात सुरू असलेल्या दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी नियंत्रण रेषेवर देशाच्या संरक्षणासाठी  प्राणाची बाजी लावून देशाची सुरक्षा करत असलेल्या जवानांचा विशेष उल्लेख केला. "आपले जवान देशाच्या सुरक्षेसाठी अनेक कष्ट झेलत आहेत. आम्ही दिवाळी साजरी करत असताना देशाच्या संरक्षणासाठी कुणी हिमालयाच्या शिखरावर, तर कुणी वाळवंटात उभा राहून पहारा देत आहे. देशवासीयांच्या शुभेच्छांमुळे सैनिकांचे सामर्थ्य वाढते. त्यामुळे यंदाची दिवाळी आपण जवानांना समर्पित करूया," असे पंतप्रधान म्हणाले. 
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिवाळी हा अंध:काराकडून  प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा सण असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. "विविधतेने नटलेल्या आपल्या देशात वर्षभर कुठले ना कुठले सण साजरे होत असतात. सध्या दिवाळी सुरू आहे. आपला प्रत्येक सण कुठला ना कुठला संदेश देतो. तसा दिवाळी हा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची शिकवण देणारा सण आहे. दिवाळीसाठी आपण  घरात स्वच्छता करतो. पण आता केवळ घरापुरतेच मर्यादित न राहता या स्वच्छतेची व्यापकता वाढवण्याची आवश्यकता आहे," असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केले. 
दिवाळी हा आता जागतिक सण बनत असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. "जगभरात दिवाळी साजरी होत आहे. अमेरिकेत दिवाळीनिमित्त पोस्टाचे तिकीट प्रसिद्ध झाले आहे. ब्रिटनमध्ये दिवाळी  साजरी केली जात नाही असे कुठलेही  शहर नसेल. कॅनडा, सिंगापूरच्या प्रमुखांनीही दिवाळी साजरी करतानाचे आपले फोटो प्रसिद्ध केले आहेत. एकूणच  दिवाळी हा सण आता जगासाठी अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा प्रेरणास्त्रोत बनत आहे," असे पंतप्रधांनांनी सांगितले.
यावेळी पंतप्रधानांनी देशातील अनेक राज्ये आता उघड्यावर होणाऱ्या शौचापासून मुक्त होणाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सांगितले. तसेच गावातील 57 कुटुंबाना शौचालय बांधण्यास मदत करणारा आयटीबीपीचा जवान विकास ठाकूर याचे कौतुक केले.  21व्या शतकातही गावात वीज नसणे योग्य नाही. यासाठी प्रत्येक गावात वीज पोहोचवण्याची योजना राबवली जात आहे. ती योग्य दिशेने पुढे जात असल्याचेही पंतप्रधान  म्हणाले. 
देशवासीयांना दिलेल्या संदेशादरम्यान पंतप्रधानांनी सरदार पटेल आणि  इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच एकतेसाठी झटणाऱ्या जयंतीदिनीच  1984 साली हजारो शिखांची हत्या झाल्याचाही उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला.