शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

यंदाची दिवाळी वीर जवानांना समर्पित - पंतप्रधान

By admin | Updated: October 30, 2016 12:41 IST

देशवासीयांच्या सुरक्षेसाठी बहादूर जवान आपले सर्वस्व पणाला लावत आहेत.असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी यावर्षीची दिवाळी जवानांना समर्पित केली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - "देशात दिवाळी साजरी होत असताना सीमेवर तणावाचे वातावरण आहे. देशवासीयांच्या सुरक्षेसाठी बहादूर जवान आपले सर्वस्व पणाला लावत आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी या बहादूर जवानांना समर्पित करू," असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी यावर्षीची दिवाळी जवानांना समर्पित केली. 
देशात सुरू असलेल्या दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी नियंत्रण रेषेवर देशाच्या संरक्षणासाठी  प्राणाची बाजी लावून देशाची सुरक्षा करत असलेल्या जवानांचा विशेष उल्लेख केला. "आपले जवान देशाच्या सुरक्षेसाठी अनेक कष्ट झेलत आहेत. आम्ही दिवाळी साजरी करत असताना देशाच्या संरक्षणासाठी कुणी हिमालयाच्या शिखरावर, तर कुणी वाळवंटात उभा राहून पहारा देत आहे. देशवासीयांच्या शुभेच्छांमुळे सैनिकांचे सामर्थ्य वाढते. त्यामुळे यंदाची दिवाळी आपण जवानांना समर्पित करूया," असे पंतप्रधान म्हणाले. 
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिवाळी हा अंध:काराकडून  प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा सण असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. "विविधतेने नटलेल्या आपल्या देशात वर्षभर कुठले ना कुठले सण साजरे होत असतात. सध्या दिवाळी सुरू आहे. आपला प्रत्येक सण कुठला ना कुठला संदेश देतो. तसा दिवाळी हा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची शिकवण देणारा सण आहे. दिवाळीसाठी आपण  घरात स्वच्छता करतो. पण आता केवळ घरापुरतेच मर्यादित न राहता या स्वच्छतेची व्यापकता वाढवण्याची आवश्यकता आहे," असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केले. 
दिवाळी हा आता जागतिक सण बनत असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. "जगभरात दिवाळी साजरी होत आहे. अमेरिकेत दिवाळीनिमित्त पोस्टाचे तिकीट प्रसिद्ध झाले आहे. ब्रिटनमध्ये दिवाळी  साजरी केली जात नाही असे कुठलेही  शहर नसेल. कॅनडा, सिंगापूरच्या प्रमुखांनीही दिवाळी साजरी करतानाचे आपले फोटो प्रसिद्ध केले आहेत. एकूणच  दिवाळी हा सण आता जगासाठी अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा प्रेरणास्त्रोत बनत आहे," असे पंतप्रधांनांनी सांगितले.
यावेळी पंतप्रधानांनी देशातील अनेक राज्ये आता उघड्यावर होणाऱ्या शौचापासून मुक्त होणाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सांगितले. तसेच गावातील 57 कुटुंबाना शौचालय बांधण्यास मदत करणारा आयटीबीपीचा जवान विकास ठाकूर याचे कौतुक केले.  21व्या शतकातही गावात वीज नसणे योग्य नाही. यासाठी प्रत्येक गावात वीज पोहोचवण्याची योजना राबवली जात आहे. ती योग्य दिशेने पुढे जात असल्याचेही पंतप्रधान  म्हणाले. 
देशवासीयांना दिलेल्या संदेशादरम्यान पंतप्रधानांनी सरदार पटेल आणि  इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच एकतेसाठी झटणाऱ्या जयंतीदिनीच  1984 साली हजारो शिखांची हत्या झाल्याचाही उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला.