शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

यंदाचे बजेट कृषिप्रधान , उत्पादन वाढीसाठी विशेष योजनांवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 03:31 IST

वाढलेल्या उत्पादनामुळे एकीकडे डाळींचे घटलेले दर, तर दुसरीकडे अन्य पिकांचे घटलेले उत्पादन, देशभरात शेतकºयांमध्ये असलेला असंतोष, या सर्वांवर मात्रा म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पात

नवी दिल्ली/मुंबई : वाढलेल्या उत्पादनामुळे एकीकडे डाळींचे घटलेले दर, तर दुसरीकडे अन्य पिकांचे घटलेले उत्पादन, देशभरात शेतकºयांमध्ये असलेला असंतोष, या सर्वांवर मात्रा म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला प्राधान्य मिळण्याची दाट शक्यता आहे. स्वत: वित्तमंत्री अरुण जेटली यांनीही तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.सन २०१५ मध्ये डाळींच्या दरांनी सर्वसामान्यांचे हाल केले व सरकारचीझोप उडविली होती. यामुळे मोदीसरकारने डाळींचे उत्पादन वाढविण्यासाठी विशेष योजना आखून २०१६-१७च्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावर मोठा भर दिला. त्या वर्षीच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठीची तरतूद तब्बल ३६.९९ टक्क्यांनी वाढली. मात्र, हीच तरतूद २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात फक्त ६.१४ टक्क्यांनी वाढविण्यात आली. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पहिल्या वर्षी कृषीसाठीच्या तरतुदीत १.१४ व २०१५-१६ मध्ये ९.९५ टक्केच वाढ करण्यात आली. मात्र, देशाची सद्य:स्थिती पाहता शेतकºयांमध्ये राज्याराज्यांत सरकारविरुद्ध असंतोष आहे. त्यात महत्त्वाच्या राज्यांमधील निवडणुका समोर आहेत.लोकसभा निवडणुकी आधीचा हा अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. अशा वेळी मागील तीन वर्षांतील बॅकलॉग या अर्थसंकल्पात भरून काढण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, हे नक्की. मागील तीन वर्षात सरकारने प्रामुख्याने विकासाची व्याख्या ही औद्योगिकीकरणाशी निगडित केली होती. मात्र, विकासाचे लाभ शेतकºयांपर्यंत पोहोचल्याखेरीज जीडीपी अशक्य असल्याचे आता स्वत: अर्थमंत्रीही मानत आहेत.वायदे बाजारावर भरधान्यामध्ये सर्वाधिक मागणी देशात डाळींना असते. २०१५ च्या गोंधळानंतर केलेल्या उपाययोजनांमुळे २०१६ मध्ये डाळींचे भरघोस उत्पादन देशांत झाले. आता यंदाच्या खरिप हंगामातही डाळींचे उत्पादन समाधानकारक आहे. अन्य धान्यांची स्थिती फार चांगली नसली, तरी कोठारे डाळींनी भरली आहेत.याचा थेट परिणाम शेतमालाच्या दरावर झाला. शेतकºयांना आज हमी भावही मिळेनासा झाला आहे. यासाठीच शेतमालाला अधिकाधिक वायदे बाजारात (आॅप्शन ट्रेडिंग) आणले जात आहे. वायदे बाजारात शेतमालाला चांगल्या भावाची हमी आहे.ही सर्व स्थिती पाहता यंदा शेतीशी निगडित वायदे बाजारासाठी विशेष योजना सरकार आणण्याची दाट शक्यता आहे. ‘येत्या काळात याचे आॅप्शन ट्रेडिंगचे फायदे शेतकºयांना मिळतील,’ असे मत स्वत: अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले आहे. सीआयआयनेही वायदे बाजाराला व्यवहार करातून मुक्त करण्याची मागणी याच पार्श्वभूमीवर केली आहे.कृषी क्षेत्र ही प्राथमिकता‘कृषी क्षेत्र ही सरकारची प्राथमिकता आहे. जोपर्यंतआर्थिक वृद्धीचा लाभ कृषी क्षेत्रापर्यंतस्पष्ट दिसत नाही, तोपर्यंत आर्थिकवृद्धी ही समर्थनीय ठरणार नाही.आर्थिक वृद्धीचा लाभ शेतकºयांना मिळावा, ही सरकारची प्राथमिकता आहे,’ असे प्रतिपादन करीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही हा अर्थसंकल्प कृषी केंद्रित असेल, असे संकेत नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना दिले आहेत.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८