शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक - लढाऊ विमानांचा ताफा दशकभरातील नीचांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2016 17:25 IST

भारतीय नौदलाकडे सध्या लढाऊ विमानांच्या अवघ्या 32 तुकड्या असून ही संख्या एका दशकातील नीचांकी आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - भारतीय नौदलाकडे सध्या लढाऊ विमानांच्या अवघ्या 32 तुकड्या असून ही संख्या एका दशकातील नीचांकी आहे. एका तुकडीत किंवा स्क्वाड्रनमध्ये सुमारे 20 लढाऊ विमानं असतात. भारतीय सैन्याला देशाच्या सीमांच्य़ा रक्षणासाठी 42 तुकड्यांची गरज असताना अवघ्या 32 तुकड्या तैनात असल्यामुळे परिस्थिती चिंताजनक असल्याचे दिसत आहे.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानावर घातली असून लढाऊ विमानांच्या कमतरतेपोटी होत असलेल्या समस्येची चर्चा केली आहे. रशियन बनावटीच्या मिग 21 च्या तीन तुकड्या कालबाह्य झाल्यामुळे मोडीत काढल्यानंतर सध्या भारतीय हवाई दलाकडे शिल्लक असलेल्या लढाऊ विमानांच्या तुकड्यांची संख्या 32 वर आली आहे.
 
 
पाकिस्तान व चीनला लागून असलेल्या पश्चिम व उत्तरेच्या सीमांच्या रक्षणासाठी भारताला 42 स्क्वाड्रन्सची गरज आहे. त्यातही 2020 पर्यंत सध्या ताफ्यात असलेल्या आणखी 14 तुकड्या निकामी होणार आहेत. ही कमतरता भरून काढण्यासाठी केंद्र सरकार फ्रेंच बनावटीची राफेल आणि भारतीय बनावटीची तेजस ही लढाऊ विमाने भरती करण्याच्या तयारीत आहेत, परंतु अद्याप त्यास यश आलेले नाही. 
बहारीन मधल्या एअर शोमध्ये तेजस प्रदर्शित करण्यात आले, परंतु त्यास अद्याप वापरण्यायोग्य अशी अंतिम मंजुरी मिळालेली नाही. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमानाच्या सज्जतेसाठी प्रयत्न करत आहे.