शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘त्यांना घेरून काम फत्ते करा’

By admin | Updated: November 5, 2016 06:25 IST

सिमीच्या आठ जणांच्या एनकाऊंटरवरून सुरू झालेल्या वादात आता आणखी भर पडली

भोपाळ : सिमीच्या आठ जणांच्या एनकाऊंटरवरून सुरू झालेल्या वादात आता आणखी भर पडली आहे. सोशल मीडियातील एका आॅडिओने चर्चेला तोंड फोडले आहे. ‘त्यांना घेरून काम फत्ते करा’ अशी चर्चा या आॅपरेशनमध्ये सहभागी असलेल्या सुरक्षारक्षकांत झाल्याची ही आॅडिओ टेप आहे. या टेपमुळे मध्य प्रदेश सरकार अडचणीत आले आहे.भोपाळच्या तुुरुंगातून पळून गेल्यानंतर या आठ जणांचे एन्काऊंटर करण्यात आले होते. या आॅडिओ टेपमध्ये स्पष्ट ऐकू येत आहे की, दोन जणांतील संवादात एक व्यक्ती दुसऱ्याला फायरिंगचे आदेश देत आहे. या पोलिसाला सावध राहण्याच्या सूचनाही देण्यात येत आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस टीमशी संवाद साधण्यासाठी वायरलेसऐवजी फोनचा उपयोग करण्याचेही यात सुचविण्यात आले आहे. याबाबत बोलताना पोलीस अधीक्षक अनुराग शर्मा म्हणाले की, या सर्व बाबींचा तपासात समावेश करण्यात आला आहे. आपण अद्याप ही क्लिप ऐकली नाही. दरम्यान, पोलीस महानिरीक्षक योगेश चौधरी म्हणाले की, आॅडिओचे हे प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे पाठविण्यात येईल. या दोन्ही आॅडिओ टेप नऊ मिनिटांच्या आहेत. यातील काही संभाषणात असेही म्हटले आहे की, ‘पटेलसाहब, निपटा दो’, ‘उन्हे जल्दी खत्म कर दो.’ काही जणांचे एनकाऊंटर करण्यात आल्यानंतर या टीममधील कर्मचाऱ्यांनी एकमेकांचे अभिनंदन केल्याचेही क्लिपमधून ऐकण्यास मिळत आहे. ‘पाच जणांना मारले आहे, तिघांचे आॅपरेशन सुरू आहे,’ असेही या क्लिपमध्ये म्हटले आहे. ‘गो अहेड, बिलकूल नहीं पिछे हटना है. घेर के करो पुरा काम तमाम,’असेही ऐकू येते. दोन-तीन अ‍ॅम्बुलन्स पाठविण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. याचवेळी एका जणाचा असाही आवाज येत आहे की, ‘कोई जिंदा न रहना चाहिए’, ‘सर्व जण मारले गेले. एनकाऊंटर यशस्वी झाले. आतापर्यंत मीडियाही पोहोचला नसेल. मीडियातही दम नाही,’ असाही आवाज या क्लिपमधून ऐकावयास मिळत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>मुख्यमंत्र्यांनी दिले न्यायालयीन चौकशीचे आदेशभोपाळच्या तुरुंगातून सिमीचे आठ जण पळाल्याच्या आणि त्यांच्या कथित एन्काऊंटर प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले आहेत. सरकारने स्पष्ट केले आहे की, ही चौकशी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस.के. पांडे हे करतील. सिमीचे हे कार्यकर्ते ३०-३१ च्या मध्यरात्री तुरुंगातून पळाले होते.फरार होण्यापूर्वी सिमी कार्यकर्त्यांनी येथील सुरक्षारक्षक रमाशंकर यादव यांची हत्या केली होती. ३१ आॅक्टोबर रोजी भोपाळच्या बाहेरच्या परिसरात मणिखेडा पठार येथे पोलिसांच्या एन्काऊटरमध्ये हे आठ जण मारले गेले होते.यानंतर पोलीस आणि राज्याच्या गृहमंत्र्यांचे परस्पर विरोधी वक्तव्ये आली होती. त्यामुळे ही चकमक खोटी असल्याचे आरोप होऊ लागले आहेत. उच्च न्यायालयात याबाबत एक जनहित याचिका दाखल झाली असून, न्यायालयीन चौकशीची मागणी यात करण्यात आली आहे.