शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

शब्दांची ‘महाश्वेता’ काळाच्या पडद्याआड

By admin | Updated: July 29, 2016 03:04 IST

रुदाली, हजार चौरासी की माँ अशा गाजलेल्या चित्रपटांपाठी दडलेल्या शब्दांची जननी... समाजातील पीडित-शोषितांची बाजू लावून धरत अखेरच्या क्षणापर्यंत सामाजिक कार्यकर्त्यांच्या

कोलकाता : रुदाली, हजार चौरासी की माँ अशा गाजलेल्या चित्रपटांपाठी दडलेल्या शब्दांची जननी... समाजातील पीडित-शोषितांची बाजू लावून धरत अखेरच्या क्षणापर्यंत सामाजिक कार्यकर्त्यांच्या भूमिकेत राहिलेल्या ख्यातनाम लेखिका महाश्वेता देवी गुरुवारी काळाच्या पडद्याआड गेल्या. वद्धापकाळाने आणि अनेक अवयव निकामी झाल्याने गुरुवारी पहाटे त्यांनी कोलकात्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने कादंबऱ्या आणि लघुकथांतून दडपल्या गेलेल्या गोरगरीब वर्गाचा आवाज आज स्तब्ध झाला. महाश्वेता देवी यांच्यावर २२ मेपासून बी. व्ही. नर्सिंग होममध्ये उपचार सुरू होते. पहाटे ३ वाजता त्यांची प्रकृती ढासळली. आम्ही आमच्याकडून सर्व ते प्रयत्न केले परंतु ताबडतोब त्यांची प्रकृती आणखी बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन नंतर त्यांचे अनेक अवयव निकामी झाले. त्यांनी ३.१६ वाजता शेवटचा श्वास घेतला, अशी माहिती नर्सिंग होमचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. टंडन यांनी दिली. (वृत्तसंस्था)अनेक साहित्यकृती रुपेरी पडद्यावरमहाश्वेता देवी यांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींत ‘हजार चौरासी की माँ’, ‘अरण्येर अधिकार’, झांसीर राणी’, ‘अग्निगर्भ’, ‘रुदाली’, ‘सिधु कन्हूर ढाके’ इत्यादींचा समावेश असून, या साहित्याने वंचित, दडपल्या गेलेल्या वर्गाचे अंतरंग उघड केले. त्यांच्या अनेक साहित्यकृतींनी रुपेरी पडद्यावर स्थानही मिळविले. गोविंद निहलानींनी दिग्दर्शित केलेला हिंदी चित्रपट ‘हजार चौरासी की माँ’ (१९९८) देवींच्या बंगाली कादंबरीवर आधारित होता. नक्षलवादी चळवळीत आपल्या मुलाचा का सहभाग होता याची कारणे समजून घेण्यासाठी आईचा झालेला भावनिक संघर्ष या चित्रपटाने दाखविला. १९९३मध्ये कल्पना लाजमी यांनी ‘रुदाली’ चित्रपट दिग्दर्शित केला. महाश्वेता देवींच्या ‘रुदाली’ नावाच्या कादंबरीवर तो आधारित होता. राजस्थानातील उच्चवर्णीयांमधील पुरुषांचा मृत्यू झाल्यावर शोक करण्यासाठी व्यावसायिक रडणाऱ्यांच्या (रुदाली) आयुष्याचा पट या चित्रपटात होता.महिलांच्या हक्कांवर महाश्वेता देवी यांनी लिहिलेल्या ‘चोली के पिछे’ या लघुकथेवर आधारित ‘गणगोर’ हा अनेक भाषांतील चित्रपट इटालियन दिग्दर्शक इटालो स्पिनेली यांनी तयार केला होता. लेखक, पत्रकार या भूमिकांपलीकडे जाऊन देवींनी आदिवासी आणि शोषितांच्या विकासासाठी काम केले.दडपल्या गेलेल्या वर्गाचा आवाजमहाश्वेता देवी यांच्या लिखाणात कार्यकर्त्याचा उत्साह होता. पीडित, शोषित व वंचित घटकांच्या हक्कांसाठी लढण्याचे साधन म्हणून त्यांनी आपली अभिव्यक्ती वापरली. कार्यकर्त्याची निष्ठा आणि लेखकाचा ध्यास असलेल्या देवी बघताबघता आपल्या कादंबऱ्या आणि लघुकथांतून दडपल्या गेलेल्या वर्गाचा आवाज बनला. त्यांना त्यामुळे पद्मविभूषण, मॅगसेसे, साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्कारासह अनेक सन्मान लाभले. देवी यांनी आदिवासी आणि ग्रामीण भागातील वंचितांना मदत केली. हे समाजघटक आपापल्या भागांत विकासकामे करू शकतील यासाठी त्यांनी त्यांना गटागटांमध्ये संघटित केले. आदिवासींच्या कल्याणासाठी महाश्वेता देवी यांनी अनेक संस्थांचीही स्थापना केली होती.महाश्वेता देवींच्या निधनाने अतीव दु:ख झाले. त्या करुणेचा आवाज होत्या.. समानतेचा आणि न्यायाचा आवाज होत्या. - नरेंद्र मोदी, पंतप्रधानभारताने सद्सद््विवेकाला कायम राखणारी व्यक्ती गमावली. आमच्या काळातील त्या महान लेखिकांपैकी एक होत्या.- सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्षा भारताने महान लेखक व पश्चिम बंगालने महान आई गमावली. माझ्या त्या मार्गदर्शक होत्या. महाश्वेता दी यांना शांती लाभो. - ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल