शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

शब्दांची ‘महाश्वेता’ काळाच्या पडद्याआड

By admin | Updated: July 29, 2016 03:04 IST

रुदाली, हजार चौरासी की माँ अशा गाजलेल्या चित्रपटांपाठी दडलेल्या शब्दांची जननी... समाजातील पीडित-शोषितांची बाजू लावून धरत अखेरच्या क्षणापर्यंत सामाजिक कार्यकर्त्यांच्या

कोलकाता : रुदाली, हजार चौरासी की माँ अशा गाजलेल्या चित्रपटांपाठी दडलेल्या शब्दांची जननी... समाजातील पीडित-शोषितांची बाजू लावून धरत अखेरच्या क्षणापर्यंत सामाजिक कार्यकर्त्यांच्या भूमिकेत राहिलेल्या ख्यातनाम लेखिका महाश्वेता देवी गुरुवारी काळाच्या पडद्याआड गेल्या. वद्धापकाळाने आणि अनेक अवयव निकामी झाल्याने गुरुवारी पहाटे त्यांनी कोलकात्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने कादंबऱ्या आणि लघुकथांतून दडपल्या गेलेल्या गोरगरीब वर्गाचा आवाज आज स्तब्ध झाला. महाश्वेता देवी यांच्यावर २२ मेपासून बी. व्ही. नर्सिंग होममध्ये उपचार सुरू होते. पहाटे ३ वाजता त्यांची प्रकृती ढासळली. आम्ही आमच्याकडून सर्व ते प्रयत्न केले परंतु ताबडतोब त्यांची प्रकृती आणखी बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन नंतर त्यांचे अनेक अवयव निकामी झाले. त्यांनी ३.१६ वाजता शेवटचा श्वास घेतला, अशी माहिती नर्सिंग होमचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. टंडन यांनी दिली. (वृत्तसंस्था)अनेक साहित्यकृती रुपेरी पडद्यावरमहाश्वेता देवी यांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींत ‘हजार चौरासी की माँ’, ‘अरण्येर अधिकार’, झांसीर राणी’, ‘अग्निगर्भ’, ‘रुदाली’, ‘सिधु कन्हूर ढाके’ इत्यादींचा समावेश असून, या साहित्याने वंचित, दडपल्या गेलेल्या वर्गाचे अंतरंग उघड केले. त्यांच्या अनेक साहित्यकृतींनी रुपेरी पडद्यावर स्थानही मिळविले. गोविंद निहलानींनी दिग्दर्शित केलेला हिंदी चित्रपट ‘हजार चौरासी की माँ’ (१९९८) देवींच्या बंगाली कादंबरीवर आधारित होता. नक्षलवादी चळवळीत आपल्या मुलाचा का सहभाग होता याची कारणे समजून घेण्यासाठी आईचा झालेला भावनिक संघर्ष या चित्रपटाने दाखविला. १९९३मध्ये कल्पना लाजमी यांनी ‘रुदाली’ चित्रपट दिग्दर्शित केला. महाश्वेता देवींच्या ‘रुदाली’ नावाच्या कादंबरीवर तो आधारित होता. राजस्थानातील उच्चवर्णीयांमधील पुरुषांचा मृत्यू झाल्यावर शोक करण्यासाठी व्यावसायिक रडणाऱ्यांच्या (रुदाली) आयुष्याचा पट या चित्रपटात होता.महिलांच्या हक्कांवर महाश्वेता देवी यांनी लिहिलेल्या ‘चोली के पिछे’ या लघुकथेवर आधारित ‘गणगोर’ हा अनेक भाषांतील चित्रपट इटालियन दिग्दर्शक इटालो स्पिनेली यांनी तयार केला होता. लेखक, पत्रकार या भूमिकांपलीकडे जाऊन देवींनी आदिवासी आणि शोषितांच्या विकासासाठी काम केले.दडपल्या गेलेल्या वर्गाचा आवाजमहाश्वेता देवी यांच्या लिखाणात कार्यकर्त्याचा उत्साह होता. पीडित, शोषित व वंचित घटकांच्या हक्कांसाठी लढण्याचे साधन म्हणून त्यांनी आपली अभिव्यक्ती वापरली. कार्यकर्त्याची निष्ठा आणि लेखकाचा ध्यास असलेल्या देवी बघताबघता आपल्या कादंबऱ्या आणि लघुकथांतून दडपल्या गेलेल्या वर्गाचा आवाज बनला. त्यांना त्यामुळे पद्मविभूषण, मॅगसेसे, साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्कारासह अनेक सन्मान लाभले. देवी यांनी आदिवासी आणि ग्रामीण भागातील वंचितांना मदत केली. हे समाजघटक आपापल्या भागांत विकासकामे करू शकतील यासाठी त्यांनी त्यांना गटागटांमध्ये संघटित केले. आदिवासींच्या कल्याणासाठी महाश्वेता देवी यांनी अनेक संस्थांचीही स्थापना केली होती.महाश्वेता देवींच्या निधनाने अतीव दु:ख झाले. त्या करुणेचा आवाज होत्या.. समानतेचा आणि न्यायाचा आवाज होत्या. - नरेंद्र मोदी, पंतप्रधानभारताने सद्सद््विवेकाला कायम राखणारी व्यक्ती गमावली. आमच्या काळातील त्या महान लेखिकांपैकी एक होत्या.- सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्षा भारताने महान लेखक व पश्चिम बंगालने महान आई गमावली. माझ्या त्या मार्गदर्शक होत्या. महाश्वेता दी यांना शांती लाभो. - ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल