शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मसूद अजहरविषयी चीन भूमिका बदलेल?

By admin | Updated: December 31, 2016 02:36 IST

पाकिस्तानातील दहशतवादी मसूद अजहर व त्याची जैश-ए-मोहम्मद ही संघटना याबाबतची आपली भूमिका येत्या काही दिवसांत चीन स्पष्ट करणार आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानातील दहशतवादी मसूद अजहर व त्याची जैश-ए-मोहम्मद ही संघटना याबाबतची आपली भूमिका येत्या काही दिवसांत चीन स्पष्ट करणार आहे. चीन काय निर्णय घेतो, याकडे भारताचे लक्ष आहे. चीनच्या निर्णयानंतर भारत पुढील पाऊल उचलणार आहे. चीनने आतापर्यंत अजहर मसूदला दहशतवादी म्हणून घोषित करण्यास विरोध केला आहे. तसेच ३१ मार्च रोजीही त्याला दहशतवादी घोषित करण्यापासून रोखत, चीनने आडकाठी केली होती.मसूद अजहरला संयुक्त राष्ट्र संघ समितीच्या दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यात यावे, असा भारताता सातत्याने प्रयत्न आहे. चीनने मात्र विरोध केला होता. चीनच्या या विरोधाच्या भूमिकेबद्दल भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. चीनने केलेला विरोध केवळ तांत्रिक आधारावर व कारणास्तव असून, तो अनाकलनीय आहे, अशी टीका भारताने यापूर्वीही केली आहे. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले गेल्यास त्याची सर्व संपत्ती जप्त करणे शक्य होईल आणि त्याला अन्य देशांमध्ये जाताही येणार नाही. त्यांच्या देशांतर्गत कारवायांवरही आपोआप बंधने येतील. मात्र या प्रस्तावाला चीनने व्हेटोचा अधिकार वापररून विरोध केला होता. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीतील पाच सदस्यांना व्हेटो वापरण्याचा अधिकार आहे. त्यात चीनचाही समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीतील पाच कायम सभासद राष्ट्रांमध्ये अमेरिका, रशिया, चीन, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स हे देश आहेत. मात्र चीनने आतापर्यंतची भूमिका बदलून मसूद अजहरला दहशतवादी म्हणून घोषित करण्यास संमती दिल्यास वा प्रस्तावाला विरोध न केल्यास मसूद अजहर, त्याची संघटना आणि पाकिस्तान असे सारेच अडचणीत येतील. तो व जैश-ए-मोहम्मदची दहशतवाद्यांच्या यादीत नोंद होईल. नोव्हेंबरमध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभल यांनी चीनच्या सुरक्षा सल्लागारांशी यासंदर्भात चर्चा केली होती. त्यावेळी चीनने आपण निर्णय बदलणार नसल्याचे स्पष्ट केले होते. दहशतवादी लढताना दुटप्पी भूमिका घेणे योग्य नाही आणि दहशतवादाचा कोणीच राजकीय फायदा घेता कामा नये, असे चीनने म्हटले आहे. अशा स्थितीत चीनने मसूदबाबतच्या प्रस्तावाला विरोध केला, तर चीन आपल्याच भूमिकेला बगल देत आहे, असे चित्र निर्माण होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)- चीनने पुन्हा विरोध केल्यास काय पावले उचलायची, याची तयारी भारताने करून ठेवली आहे. त्या स्थितीत भारताकडून मसूद अजहरचा भाऊ अब्दुल रौफ असगर तसेच लष्कर-ए-तयब्बा व जैश-ए-मोहम्मदच्या अन्य दहशतवाद्यांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो.- राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने (एनआयए) मसूद अजहर हाच पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांची यादीत टाकण्यात यावे, असा भारताचा आग्रह आहे.