शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

राज्यपाल सदाशिवम राजीनामा देणार?

By admin | Updated: March 25, 2015 01:46 IST

सदाशिवम हे दिल्लीत परतण्यास आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (एनएचआरसी)अध्यक्षपद भूषविण्यास इच्छुक असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी म्हटले आहे.

हरीश गुप्ता - नवी दिल्लीकेरळचे राज्यपाल न्या. पी. सदाशिवम यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारताचे माजी सरन्यायाधीश असलेले सदाशिवम हे दिल्लीत परतण्यास आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (एनएचआरसी)अध्यक्षपद भूषविण्यास इच्छुक असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी म्हटले आहे.एनएचआरसीचे विद्यमान अध्यक्ष न्या. के. जी. बालकृष्णन हे लवकरच निवृत्त होणार असल्याने त्यांचा उचित उत्तराधिकारी शोधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. एनएचआरसी कायद्यानुसार निवृत्त सरन्यायाधीशच आयोगाचा अध्यक्ष बनू शकतो. देशात निवृत्त सरन्यायाधीश मोजकेच आहेत आणि त्यातही फार कमी निवृत्त सरन्यायाधीश हे एनएचआरसीचे अध्यक्ष बनण्यास राजी आहेत.मोदी सरकारपुढे अनेक पर्याय नाहीत. निवृत्त सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांना एनएचआरसीचे अध्यक्षपद बहाल करण्याची सरकारची अजिबात इच्छा नाही. २०१३ मध्ये सरन्यायाधीशपदावरून सेवानिवृत्त झालेले अल्तमास कबिर यांनाही हे पद देण्याची सरकारची इच्छा दिसत नाही. या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंतिम निर्णय घेतील. परंतु याबाबतीत काँग्रेसचे मत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सदाशिवम यांना राज्यपाल बनविण्याला काँग्रेसने विरोध केला होता.न्या. सदाशिवम यांची कर्नाटकचे राज्यपाल बनण्याची इच्छा होती. परंतु मोदी सरकारने त्यांना केरळच्या राज्यपालपदाचा प्रस्ताव दिला आणि मागच्या वर्षी त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला. परंतु आता एनएचआरसीमध्ये अध्यक्षपद रिक्त होणार असल्याचे लक्षात आल्यानंतर सदाशिवम यांनी हे पद भूषविण्याची आपली इच्छा व्यक्त केली असल्याचे या सूत्रांनी सांगितले.