शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

जाहिरातींमध्ये फक्त पंतप्रधानांचाच फोटो का ? सरकारचाच सवाल

By admin | Updated: March 10, 2016 12:54 IST

एकीकडे विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मंत्र्यांना महत्व देत नसल्याचा, सर्व श्रेय स्वत: घेत असल्याचा आरोप करत असताना आता त्यांचेच मंत्री आपल्यालाही श्रेय देण्याची मागणी करु लागले आहेत

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली. दि. १० - सरकारी जाहिरातींमध्ये आपलेही फोटो छापण्यात यावेत यासाठी भाजपाच्याच मंत्र्यांतर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. एकीकडे विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मंत्र्यांना महत्व देत नसल्याचा, सर्व श्रेय स्वत: घेत असल्याचा आरोप करत असताना सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. अ‍ॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी सरकारी जाहीरातींमध्ये फक्त पंतप्रधान, राष्ट्रपती आणि भारताचे सरन्यायाधीश यांचाच फोटो वापरण्याच्या दिलेल्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
 
जाहीरातींमध्ये फक्त पंतप्रधानांचा फोटो दाखवला जात आहे. यामुळे इतर मंत्र्यांचं महत्व कमी होत आहे. प्रत्येक मंत्री हा पंतप्रधानांएवढाच महत्वाचा आहे. फक्त तीन व्यक्तींचे फोटो छापण्यास परवानगी देणे याला काही आधार नाही. मुख्यमंत्री आणि केंद्रातील इतर मंत्र्यांचे फोटो का नाही ? आपल्याकडे लोकशाही आहे आणि व्यक्तिमत्व निष्ठा तयार करणं चुकीच ठरेल असं मुकूल रोहतगी यांनी न्यायालयात सांगितलं आहे. 
जर एखाद्या मंत्र्याने काम केलं आहे तर त्याला ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची परवानगी दिली पाहिजे, नाहीतर पुढच्या निवडणुकीत लोक त्यांना निवडून देणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आपल्या संघराज्याच्या विरोधात आहे. राज्यातील मुख्यमंत्रीही पंतप्रधानांइतकाच महत्वाचा आहे. त्यांच्या सरकारने केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यापासून त्यांना रोखू शकत नाही असं मत मुकूल रोहतगी यांनी नोंदवलं आहे. गेल्यावर्षी 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत सरकारी जाहिरातींवर फक्त पंतप्रधान, राष्ट्रपती आणि भारताचे सरन्यायाधीश यांचाच फोटो वापरण्याचे आदेश दिले होते.