शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, S-400 ने रॉकेट पाडले, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
3
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
4
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
5
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
6
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
7
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
8
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
9
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
10
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
11
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
12
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
13
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
14
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
15
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
16
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
17
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
18
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
19
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
20
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या

मोदी अचानक लाहोरला का गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2016 23:33 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींना असे कोणते आश्वासन मिळाले होते की अचानक ते लाहोरला गेले? सरकार नेमके काय करू इच्छिते? याचे उत्तर देशाला हवे आहे.

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदींना असे कोणते आश्वासन मिळाले होते की अचानक ते लाहोरला गेले? सरकार नेमके काय करू इच्छिते? याचे उत्तर देशाला हवे आहे. आपले परराष्ट्र धोरणही सरकारने लवकरात लवकर स्पष्ट केले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.पठाणकोट हवाईदल तळावरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर चौथ्या दिवशी, काँग्रेसतर्फे कठोर प्रतिक्रिया व्यक्त करतांना गंभीर स्वरात शर्मा म्हणाले, पठाणकोटची घटना केवळ दहशतवादी हल्ला नसून साऱ्या देशावर चढवण्यात आलेला हल्ला आहे. त्याला चोख प्रत्युत्तर देतांना वीरमरण आलेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करीत शर्मा पुढे म्हणाले, हे आव्हान इतक्या गंभीर स्वरूपाचे आहे की दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात एका सुरात साऱ्या देशातून आवाज उठला पाहिजे. काँग्रेस पक्ष अशा प्रसंगात अर्थातच देशाबरोबर आहे. तथापि या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत, सरकारकडून ज्याचे उत्तर साऱ्या देशाला हवे आहे.सरकारला सवाल विचारीत शर्मा म्हणाले, आॅगस्ट महिन्यात उभय देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची नियोजित चर्चा रद्द करण्यात आली. त्यानंतर बँकॉकमधे दोन्ही सुरक्षा सल्लागारांची अचानक बैठक झाली. त्या चर्चेतून नेमके काय निष्पन्न झाले? पंतप्रधानांची या चर्चेला संमती होती काय? रशियाच्या उफा आणि फ्रान्सच्या पॅरिस शहरात पंतप्रधान मोदी नवाज शरीफाना भेटले. त्या भेटीत असे कोणते आश्वासन मोदींना मिळाले की अफगाणिस्तानातून परततांना पंतप्रधानांना अचानक लाहोरला जावेसे वाटले? विशेष म्हणजे लाहोर भेटी प्रसंगी पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार जंजुआ उपस्थित नव्हते. त्यामुळे भारताबरोबरच्या चर्चेत पाकिस्तानात एकमत नाही असे चित्र दिसू लागले. एकप्रकारे भारताला हा इशाराच नव्हता काय? लाहोर भेटीत पंतप्रधानांनी नेमके काय साधले, ते तिथे का गेले होते? याची कोणतीही माहिती देशाला नाही. त्याची स्पष्ट उत्तरे सरकारने दिली पाहिजेत, असेही शर्मा म्हणाले.