शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

मोदी अचानक लाहोरला का गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2016 23:33 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींना असे कोणते आश्वासन मिळाले होते की अचानक ते लाहोरला गेले? सरकार नेमके काय करू इच्छिते? याचे उत्तर देशाला हवे आहे.

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदींना असे कोणते आश्वासन मिळाले होते की अचानक ते लाहोरला गेले? सरकार नेमके काय करू इच्छिते? याचे उत्तर देशाला हवे आहे. आपले परराष्ट्र धोरणही सरकारने लवकरात लवकर स्पष्ट केले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.पठाणकोट हवाईदल तळावरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर चौथ्या दिवशी, काँग्रेसतर्फे कठोर प्रतिक्रिया व्यक्त करतांना गंभीर स्वरात शर्मा म्हणाले, पठाणकोटची घटना केवळ दहशतवादी हल्ला नसून साऱ्या देशावर चढवण्यात आलेला हल्ला आहे. त्याला चोख प्रत्युत्तर देतांना वीरमरण आलेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करीत शर्मा पुढे म्हणाले, हे आव्हान इतक्या गंभीर स्वरूपाचे आहे की दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात एका सुरात साऱ्या देशातून आवाज उठला पाहिजे. काँग्रेस पक्ष अशा प्रसंगात अर्थातच देशाबरोबर आहे. तथापि या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत, सरकारकडून ज्याचे उत्तर साऱ्या देशाला हवे आहे.सरकारला सवाल विचारीत शर्मा म्हणाले, आॅगस्ट महिन्यात उभय देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची नियोजित चर्चा रद्द करण्यात आली. त्यानंतर बँकॉकमधे दोन्ही सुरक्षा सल्लागारांची अचानक बैठक झाली. त्या चर्चेतून नेमके काय निष्पन्न झाले? पंतप्रधानांची या चर्चेला संमती होती काय? रशियाच्या उफा आणि फ्रान्सच्या पॅरिस शहरात पंतप्रधान मोदी नवाज शरीफाना भेटले. त्या भेटीत असे कोणते आश्वासन मोदींना मिळाले की अफगाणिस्तानातून परततांना पंतप्रधानांना अचानक लाहोरला जावेसे वाटले? विशेष म्हणजे लाहोर भेटी प्रसंगी पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार जंजुआ उपस्थित नव्हते. त्यामुळे भारताबरोबरच्या चर्चेत पाकिस्तानात एकमत नाही असे चित्र दिसू लागले. एकप्रकारे भारताला हा इशाराच नव्हता काय? लाहोर भेटीत पंतप्रधानांनी नेमके काय साधले, ते तिथे का गेले होते? याची कोणतीही माहिती देशाला नाही. त्याची स्पष्ट उत्तरे सरकारने दिली पाहिजेत, असेही शर्मा म्हणाले.