शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

मुकुल रोहतगींनंतर कोण? साळवे की कुमार ?

By admin | Updated: June 12, 2017 16:39 IST

अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्यानंतर या पदावर कोणाची नियुक्ती होणार याबाबत राजधानीत चर्चा सुरु आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि 12- भारताचे महान्यायवादी (अॅटर्नी जनरल) मुकुल रोहतगी यांच्या कार्यकाळ येत्या 19 जून रोजी समाप्त होत आहे. रोहतगी यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून आपल्याला कार्यकाळ संपल्यानंतर पदावरुन मुक्त करावे असे पत्र लिहिले आहे. आता यावर सरकारने निर्णय घ्यायचा आहे असे रोहतगी यांनी स्पष्ट केले आहे. रोहतगी यांनी पदावरुन मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आता अॅटर्नी जनरलपदी कोणाची नियुक्ती होणार याबाबत चर्चा सुरु झाली आहे. या पदासाठी सध्या ज्येष्ठ वकील हरिश साळवे आणि सध्या सॉलिसिटर जनरल असणारे रणजित कुमार यांची नावे चर्चेमध्ये सर्वात आघाडीवर आहेत.

मोहन परासरन यांच्यानंतर रणजित कुमार यांची सॉलिसिटर जनरलपदी 2014 साली नेमणूक झाली होती. त्याचप्रमाणे नव्याने सत्तेमध्ये आलेल्या रालोआ सरकारने 19 जून 2014 रोजी रोहतगी यांची अॅटर्नी जनरलपदावर नेमणूक केली होती. रोहतगी यांनी या तीन वर्षांमध्ये महत्त्वाच्या विविध खटल्यांमध्ये सरकारची बाजू मांडली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये कुलभूषण जाधव खटल्यामध्ये नुकतीच भारताची यशस्वी बाजू मांडणाऱ्या साळवे यांचे नाव देशातील सर्वाधीक फी घेणाऱ्या वकिलांमध्ये घेतले जाते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये तत्कालीन अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांनी पदावरुन मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर हरिश साळवे यांनी या पदाची ऑफर नाकारली होती. 2014 सालीही त्यांनी अॅटर्नी जनरलपद स्वीकारावे अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली होती असे सांगितले जाते, मात्र यावेळेसही साळवे यांनी त्यास नकार दिला होता.