शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

कुठे गेले अच्छे दिन? विरोधकांचा हल्ला

By admin | Updated: March 15, 2016 03:15 IST

सरकारने मांडलेला अर्थसंकल्प केवळ गुलाबी चित्र आणि अर्धसत्य आहे. सरकारने दिलेली ‘अच्छे दिन’ची घोषणा त्यात कुठेही दिसली नाही. चांगले दिवस केवळ रा.स्व.संघाला आले आहेत.

नवी दिल्ली : सरकारने मांडलेला अर्थसंकल्प केवळ गुलाबी चित्र आणि अर्धसत्य आहे. सरकारने दिलेली ‘अच्छे दिन’ची घोषणा त्यात कुठेही दिसली नाही. चांगले दिवस केवळ रा.स्व.संघाला आले आहेत. संघ हापपॅन्टमधून फुलपॅन्टवर आला आहे, अशा शब्दांत विरोधकांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पाची टर उडविली.लोकसभेत २०१६-१७ च्या अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तारिक अन्वर यांनी अर्थसंकल्पाला पूर्णपैकी पूर्ण गुण देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य बनविले. मोदी हेच परीक्षार्थी आणि परीक्षक होते, असा टोलाही त्यांनी हाणला. शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी केलेली तरतूद पाहता हा अर्थसंकल्प अर्धसत्य ठरतो. केवळ रा.स्व. संघासाठी ‘अच्छे दिन’ आलेले आहे. संघ हापपॅन्टमधून फुलपॅन्टपर्यंत वाढला, असेही ते म्हणाले. हा अर्थसंकल्प मध्यमवर्गीयांच्या विरोधात आहे, असे काँग्रेसचे संतोकसिंग चौधरी यांनी स्पष्ट केले. राजदचे जयप्रकाश नारायण यादव यांनी हा अर्थसंकल्प दिशाहीन आणि पोकळ असल्याचे नमूद केले. अर्थसंकल्पात दूरदृष्टीचा अभाव असून त्यात प. बंगालसाठी नवे असे काहीही नाही, याकडे तृणमूल काँग्रेसचे तापस मंडल यांनी लक्ष वेधले. (लोकमत न्यूज नेटवर्क)सत्ताधाऱ्यांचे प्रत्युत्तर...विरोधकांनी पंतप्रधानांची कायम टर उडविण्याचे प्रकार चालविले आहेत. देशाला महाशक्ती बनविण्यासाठी पंतप्रधान १८ तास काम करीत आहेत, असे भाजपचे गणेशसिंग यांनी म्हटले. हा अर्थसंकल्प अतिशय सुधारणावादी असून सर्व समाजघटकांना आणि गरिबांना अनुकूल असा आहे, असे भाजपच्या पूनम महाजन यांनी म्हटले.शिवसेनेची मागणी सोन्याच्या दागिन्यांवर आकारलेले १ टक्का अबकारी शुल्क मागे घ्यावे. जीएसटी लागू होईपर्यंत हे शुल्क आकारले जाऊ नये,अशी मागणी शिवसेनेची राहुल शेवाळे यांनी केली. हा अर्थसंकल्प संतुलित असल्याची प्रतिक्रिया अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांनी दिली.