शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

जीडीपी म्हणजे नेमके काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 05:29 IST

एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) हे देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रकृती जोखण्याचे सर्वच देशांमध्ये वापरले जाणारे प्रमुख साधन आहे.

एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) हे देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रकृती जोखण्याचे सर्वच देशांमध्ये वापरले जाणारे प्रमुख साधन आहे. देशात निर्माण झालेली सर्वच उत्पादने आणि सेवा यांची ठराविक कालावधीसाठी एकत्रित केलेली ठराविक चलनातील आकडेवारी म्हणजे एकूण देशांतर्गत उत्पादन होय.

जीडीपी मोजण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जात असला तरी भारतात खालील सुत्रानुसार त्याची मोजणी केली जाते.जीडीपी = खासगी उपयोग+ त्यामध्ये झालेली एकूण गुंतवणूक + सरकारी गुंतवणूक + सरकारी खर्च + (निर्यात - आयात)जीडीपीमध्ये होणारी वाढ अथवा घट ही देशाच्या सामाजिक व आर्थिक बदलाला कारणीभूत ठरत असते. देशातील गरीबी, बेरोजगारी, जीवनाची पातळी, साक्षरता आणि आरोग्यसेवा या विविध बाबी जीडीपीवर अवलंबून असतात. जीडीपी वाढला की या विविध सेवांवरील सरकारी खर्चासाठी अधिक रक्कम उपलब्ध होते. मात्र जीडीपी कमी झाल्यास सामाजिक सेवांवरील खर्चात कपात करणे सरकारला भाग पडते. त्यामुळे देशाचा विकास कमी प्रमाणात होताना दिसतो.

जीडीपीची मोजणीकोणाकडून?भारतात सांख्यीकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय हे जीडीपीच्या मोजणीसाठी जबाबदार असते. केंद्रीय सांख्यीकी कार्यालयातील अकाऊंट विभाग हा जीडीपीची मोजणी करीत असतो. जीडीपीची मोजणी ही दर ३ महिन्यांनी केली जाते. दरवर्षी ३१ मे रोजी वार्षिक जीडीपीची घोषणा केली जात असते. विविध वस्तूंच्या स्थिर किमती आणि सध्याच्या बाजारभावानुसार असलेल्या किमती या दोन्ही पद्धतींनी जीडीपी मोजला जातो.कोणत्या क्षेत्राचा किती वाटादेशाच्या जीडीपीमध्ये विविध क्षेत्रांचा वेगवेगळा वाटा असतो. भारताच्या जीडीपी मोजणीमध्येकृषी क्षेत्राचा वाटा १७ टक्के तर औद्योगिक क्षेत्राचा वाटा २९ टक्के आहे. सर्वाधिक ३० टक्के वाटा हा सेवा क्षेत्राकडे आहे.१९९१ मध्ये भारताने खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचे धोरण स्विकारल्यानंतर पुढील दशकात जीडीपीचा वाढीचा दर दरवर्षी सरासरी ६ ते ७ टक्के राहिला. सन २०१४ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक वाढ देणारी अर्थव्यवस्था होती.सन २०१० मध्ये सर्वाधिक वाढभारताच्या जीडीपीमध्ये सन २०१० मध्ये सर्वाधिक म्हणजे १०.३ टक्के एवढी वाढ झाली होती. त्याआधी सन २००७ मध्ये ९.८ टक्के तर १९८८ मध्ये ९.६ टक्यांनी जीडीपी वाढला होता. याशिवाय २००५ आणि २००६ या दोन वर्षात जीडीपी वाढीचा दर ९.३ टक्के होता.भारतीय अर्थव्यवस्थेला नविन दिशा देणारे सन १९९१ मध्ये जीडीपीच्या वाढीचा दर १.१ टक्का असा सर्वात कमी राहिला. याआधी १९८२ मध्ये ३.५, १९८४ मध्ये ३.८, २००२ व २००८ मध्ये ३.९ असाही जीडीपीच्या वाढीचा दर राहिला.