शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

पाणी योजनांवर कोट्यवधीचा खर्च तरी टँकर का? जलव्यवस्थापन समितीची सभा : जि.प.सदस्यांनी विचारला यांना जाब

By admin | Updated: June 2, 2016 22:20 IST

जळगाव : जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेवर गावांमध्ये २ ते ३ कोटी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र तरीदेखील अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी पुरवठा वेळेवर होत नसेल तर पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर लाखो रुपयांच्या निधीच्या खर्चाला मान्यता कशासाठी द्यावी. शासनाच्या जुन्या पाणीपुरवठा योजनेसाठी केलेला खर्च उपयोगात आला नाही का? किंवा या योजनांमध्ये गैरव्यवहार झाला आहे का? असा जाब जलव्यवस्थापन समितीच्या सभेत जि.प.सदस्य रमेश पाटील यांनी सीईओंना विचारला.

जळगाव : जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेवर गावांमध्ये २ ते ३ कोटी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र तरीदेखील अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी पुरवठा वेळेवर होत नसेल तर पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर लाखो रुपयांच्या निधीच्या खर्चाला मान्यता कशासाठी द्यावी. शासनाच्या जुन्या पाणीपुरवठा योजनेसाठी केलेला खर्च उपयोगात आला नाही का? किंवा या योजनांमध्ये गैरव्यवहार झाला आहे का? असा जाब जलव्यवस्थापन समितीच्या सभेत जि.प.सदस्य रमेश पाटील यांनी सीईओंना विचारला.
जलव्यवस्थापन समितीची सभा अध्यक्षा प्रयाग कोळी यांच्या अध्यक्षतेखाली सानेगुरुजी सभागृहात झाली. यावेळी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, कृषि सभापती मिना पाटील, समाज कल्याण सभापती दर्शना घोडेस्वार, सदस्य पूनम पाटील, डॉ.उध्दव पाटील, रुपाली चोपडे, सीईओ अस्तिककुमार पांडेय, ग्रा.पं विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी मीनल कुंटे, राजन पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. उध्दव पाटील यांनी नवीन पंपिग मशिन घेतल्या आहेत. पाणी पुरवठ्यासाठी वापरण्यात येणारे पाईप वारंवार फुटतात. त्यामुळे नवीन पाईप लाईनच्या निधीसाठी मागणी केली. यावेळी मागील सभेतील ठरावांवरील पूर्ततेचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व उपविभागीय कामकाजाचा, सामुदायिक पाणी पुरवठा योजनेतंर्गत वसुलीचा व खर्चाचा आढावा, जि.प.च्या लघुसिंचन विभाग व उपविभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अंतर्गत साठवण बंधारे, सिमेंट नाला बांधणे, पाझर तलाव दुरुस्ती, साठवण बंधारे दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर आयत्या वेळी येणार्‍या विषयांना मान्यता देण्यात आली. त्यात भडगाव तालुक्यातील बोरनार पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी ९ लाख ५४ हजार, पारोळा तालुक्यातील वंजारी बोदडे पाणी पुरवठा योजनेसाठी व पीव्हीसी पाईपलाईनसाठी ८ लाख ५२ हजार, अमळनेर तालुक्यातील जळोद येथील जलकुंभ व पीव्हीसी पाईपलाईन दुरुस्ती व देखभालसाठी १५ लाख ८१ हजार रुपये तर रावेर तालुक्यातील गहुखेडा व इतर पाच गावांच्या जलशुध्दीकरण दुरुस्तीच्या कामासाठी २२ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला.
हगणदारीमुक्तीसाठी डॉ.व्ही.आर.पाटील यांनी दोन गावे घेतली.
प्रत्येक गाव हगणदारीमुक्त करण्याचे आवाहन सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांनी यावेळी केले.