शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

बहुतांश पक्षांकडून स्वागत; शिवसेनेकडून मात्र विरोध

By admin | Updated: March 25, 2015 01:35 IST

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुराबद्दल अटक करण्याची तरतूद सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याच्या निर्णयाचे बहुतांश राजकीय पक्षांनी स्वागत केले; मात्र शिवसेना आणि संजदने विरोध कायम ठेवला आहे.

नवी दिल्ली : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुराबद्दल अटक करण्याची तरतूद सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याच्या निर्णयाचे बहुतांश राजकीय पक्षांनी स्वागत केले; मात्र शिवसेना आणि संजदने विरोध कायम ठेवला आहे. एकीकडे हा कायदा सदोष असल्याची कबुली काँग्रेसने दिली असताना यापूर्वीच्या संपुआ सरकारच्या धोरणाशी आम्ही सहमत नव्हतोेच. यापूर्वीच्या सरकारच्या निर्णयाचे समर्थन करायचे नाही, अशी सावध भूमिका मोदी सरकारने घेतली होती, असे केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले. न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करतो, पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे शिव्या देण्याचे स्वातंत्र्य ठरत नाही. एक चांगली तरतूद रद्द करीत चूकच केली असल्याचे संजदचे नेते शरद यादव यांनी म्हटले. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचे हात कमकुवत करणारा हा निर्णय असल्याचे सेनेने म्हटले. न्यायालयात काँग्रेस व भाजपने लोकशाहीविरोधी भूमिका अवलंबल्याचा आरोप डावे पक्ष व आम आदमी पार्टीने केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)संपुआ सरकारने २००८ मध्ये हा कायदा आणला आहे. आमच्या सरकारने न्यायालयात बाजू मांडताना घटनात्मक वैधतेचा बचाव केला असला तरी आम्ही यापूर्वीच्या संपुआ सरकारच्या भूमिकेशी सहमत नाही. मोदी सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करते, असे भाजपचे प्रवक्ते नलीन कोहली यांनी म्हटले.अंबिकेश महापात्रा यांनाही आनंद२०१२ मध्ये फेसबुकवर ममता बॅनर्जी यांचे व्यंगचित्र पोस्ट केल्याबद्दल अटकेची पीडा झेलणारे जाधवपूर विद्यापीठातील प्रो. अंबिकेश महापात्रा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. सर्वसामान्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे या निर्णयामुळे रक्षण होईल, असे ते म्हणाले.न्याय मिळाला, हा तर जनतेचा विजय- पीडितेला आनंद४शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मुंबईत पाळण्यात आलेल्या बंदला विरोध करणारा मजकूर पोस्ट झाल्यानंतर केवळ ‘लाईक’ असा शेरा दिल्याने अटकेची झळ पोहोचलेल्या रिनू श्रीनिवासन या पीडित मुलीने हा तर जनतेचा विजय असे सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले आहे.४मजकूर पोस्ट करणाऱ्या शहीन धादा हिचे वडील फारुक धादा यांनीही ‘मोठा दिलासा’ या शब्दांत निर्णयाचे स्वागत केले. ४माझ्या मुलीचा उद्देश धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता. शहीनच्या कमेंटनंतर तिच्या काकांच्या क्लिनिकची तोडफोड करण्यात आली होती. त्यांना अद्यापही नुकसानभरपाई मिळाली नाही, असेही ते म्हणाले.४अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आम्ही आदर करतो. सोशल मीडियावरील संवाद कल्पनांचाही आम्हाला आदर आहे. सोशल मीडियावरील प्रामाणिक विरोध किंवा मत रोखले जाऊ नये असे आम्हाला वाटते. - रविशंकर प्रसाद, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री.४माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६ ए संबंधी मसुदा अयोग्यरीत्या तयार करण्यात आला असून त्याचा गैरवापर झाला आहे. वादग्रस्त तरतूद रद्द करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. - पी.चिदंबरम, माजी अर्थमंत्री ४अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने नको. गैरवापर होणारे कलम न्यायालयाने रद्द केल्याने आनंद झाला. - शशी थरूर, काँग्रेसचे खासदार