शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
2
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
3
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
6
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
7
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
8
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
9
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
10
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
11
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
12
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
17
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
18
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
19
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
20
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा

आम्हीच पठाणकोट हल्ला केला

By admin | Updated: January 22, 2016 02:48 IST

पठाणकोट हल्ला हा आमच्या कारवायांचा भाग असल्याचे सांगत हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन याने या हल्ल्याची जबाबदारी जाहीरपणे स्वीकारली आहे

नवी दिल्ली : पठाणकोट हल्ला हा आमच्या कारवायांचा भाग असल्याचे सांगत हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन याने या हल्ल्याची जबाबदारी जाहीरपणे स्वीकारली आहे. ज्याचा खून झाला तो बळी आणि मारेकऱ्याचा मित्र अशा दोघांचे वकीलपत्र तुम्ही एकाचवेळी घेऊ शकत नाही, असे सांगत त्याने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या मुलाखतीची टर उडविली. शरीफ यांनी पाकिस्तानी पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत दहशतवादावर टीका केली होती. सलाहुद्दीनने भारत-पाक चर्चेशी काहीही देणे-घेणे नसल्याचे सांगत या हल्ल्याचा संबंध जोडू नये असेही स्पष्ट केले आहे.आम्ही भारताच्या लष्करी संस्थांना लक्ष्य बनविले असून पठाणकोट हल्ला हा या कारवाया सुरू ठेवण्याचाच एक भाग आहे, असे सलाहुद्दीन याने पाकिस्तानातील ‘वजूद’ या उर्दू न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. > काश्मीर वादात पाकिस्तान हा मूळ पक्ष... 1 पाकिस्तान हा काश्मीर मुद्यात मूळ पक्ष असल्याचे सलाहुद्दीन याने शरीफ यांच्या काश्मीर धोरणाविरोधात भूमिका मांडताना स्पष्ट केले आहे. काश्मीरमधील दबलेल्या घटकांच्या भावना आणि आकांक्षा पाहता पाकिस्तान हा जबाबदार घटक ठरतो. 2 तुम्ही बळी गेला त्याची आणि खुन्याच्या मित्राची वकिली एकाचवेळी करू शकत नाही. भारत-पाक चर्चा बंद पाडण्यासाठी पठाणकोट हल्ल्याचा कट रचण्यात आला हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. चर्चेच्या दीडशे फेऱ्या वांझोट्या ठरल्या आहेत, असे तो म्हणाला. > सीमेवर घुसखोराचा खात्मागुरुदासपूर (पंजाब) : सीमा सुरक्षा दलाने गुरुवारी सकाळी पठाणकोटमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर एका ३० वर्षीय घुसखोराचा खात्मा केला. २ जानेवारीला हवाईदल तळावरील हल्ल्यापासून बीएसएफ अतिसतर्क आहे.आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात बीएसएफच्या चमूला सकाळी ६ वाजताच्या दरम्यान बामियालच्या ताश परिसराजवळ किमान तीन घुसखोरांच्या संशयित हालचाली दिसल्या. त्यांना रोखण्याकरिता गोळीबार करण्यात आला. या कारवाईत एक घुसखोर ठार झाला तर त्याचे सहकारी पळून गेले.