शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीचा निर्णय आम्ही घेतलाच नव्हता : रिझर्व्ह बँकेचा समितीकडे खुलासा

By admin | Updated: January 11, 2017 00:46 IST

मेनंतर जून, जुलै आणि आॅगस्ट महिन्यात झालेल्या बैठकांमध्येही ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती, असे रिझर्व्ह बँकेने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.

 नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयाची केंद्र सरकारने आपणास केवळ एक दिवस आधी कल्पना दिली होती, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. हा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतल्याचे आधी सांगण्यात येत होते. मात्र हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि आरबीआयला फक्त एकच दिवस आधी त्याची माहिती दिली, असे आरबीआयच्या दस्तावेजातून स्पष्ट होत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, रिझर्व्ह बँकेने दिलेल्या ७ पानांच्या दस्तावेजातून हे उघड झाले आहे. अर्थव्यवस्थेशी संबंधित असलेल्या ३ समस्यांना लगाम घालण्यासाठी ५00 आणि १000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने दिला होता. चलनात आलेल्या बनावट नोटा, दहशतवाद्यांना मिळणारा निधी, काळा पैसा या तीन समस्या असल्याचा उल्लेख सरकारने केल्याचे रिझर्व्ह बँकेच्या दस्तावेजात नमूद करण्यात आले आहे.नोटाबंदीनंतर राज्यसभेत या विषयावरही चचार्ही झाली, तेव्हा त्यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी नोटाबंदीचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या बोर्डाने घेतल्याचे सांगितले होते. तो प्रस्ताव केंद्राकडे आला आणि केंद्रीय मंत्रिमंडळानं त्याला मंजुरी दिल्यानंतर ५00 आणि १000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आली, असंही ते म्हणाले होते. मात्र हा निर्णय रिझर्व्ह बँकेने नव्हे, तर सरकारनेच घेतल्याचे दस्तावेजातून दिसत आहे. दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा जारी करण्याचा प्रस्ताव १९ मे २0१६ रोजी रिझर्व्ह बँकेच्या मंडळाने मंजूर केला होता. त्यावेळी ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बाद करण्याचा कोणताही निर्णय झाला नव्हता, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. आर्थिक स्थायी समितीला दिलेल्या पत्रात आरबीयने याचा उल्लेख केला आहे. इंग्रजी वृत्तपत्राने माहिती अधिकारातील प्रश्नाला उत्तर देताना हा खुलासा झाला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)