शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
2
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
3
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
4
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
5
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
6
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
7
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
8
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
9
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
10
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
11
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
12
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
13
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
14
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
15
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
16
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
17
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
18
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
19
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?

आम्ही शांतीचे पुरस्कर्ते, पण हल्ला झाल्यास सडेतोड उत्तर देऊ - गृहमंत्री

By admin | Updated: January 2, 2016 11:39 IST

भारत शांततेचा पुरस्कर्ता आहे पण मात्र आमच्यावर कोणीही हल्ला केल्यास त्याचे सडेतोड प्रत्युत्तर देण्यात येईल, अशा शब्दांत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावले

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - भारत शांततेचा पुरस्कर्ता आहे पण मात्र आमच्यावर कोणीही हल्ला केल्यास त्याचे सडेतोड प्रत्युत्तर देण्यात येईल, अशा शब्दांत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावले. पंजाबमधील पठाणकोटच्या हवाई दलाच्या तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. लष्करच्या गणवेशात आलेल्या चार दहशतवाद्यांनी मध्यरात्री तीनच्या सुमारास हल्ला चढवत अंदाधुंद गोळीबार केला. सुमारे पाच तासांच्या धुमश्चक्रीनंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी या चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले खरे पण त्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले व अन्य ६ जण जखमी झाले.
या सर्व घडामोडींची माहिती गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकारांना दिली. ' भारत हा शांतीचा पुरस्कर्ता आहे. आणि शेजारी देश असलेल्या पाकिस्तानी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न असतो. पण कोणी आमच्या देशावर तुटून पडले, हल्ला केला, तर त्याला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ' असे ते म्हणाले. 
दहशतवाद्यांशी लढताना जवानांनी दाखवलेल्या धैर्याचा आम्हाला अभिमान आहे, असे सांगत त्यांनी भारतीय लष्कर व पंजाब पोलिसांचेही कौतुक केले.