शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शिरसोली प्र.न.मध्ये टँकरने पाणी पुरवठा दिलासा : तात्पुरत्या पाणी योजनेसाठी प्रस्तावाची तयारी

By admin | Updated: March 21, 2016 00:21 IST

शिरसोली : शिरसोली प्र.न.मध्ये असलेल्या भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने टँकरने पाणी पुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तात्पुरत्या पाणी योजनेसाठी ग्रामपंचायतीने प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली आहे.

शिरसोली : शिरसोली प्र.न.मध्ये असलेल्या भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने टँकरने पाणी पुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तात्पुरत्या पाणी योजनेसाठी ग्रामपंचायतीने प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली आहे.
तालुक्यातील शिरसोली प्र.न.ही मोठी ग्रामपंचायत आहे. दुष्काळीस्थिती व योग्य नियोजनाच्या अभावामुळे गावात तब्बल २५ ते ३० दिवसाआड पाणी पुरवठा होत होता. ग्रामपंचायतीने या गावात टँकरने पाणी पुरवठा व्हावा यासाठी गटविकास अधिकार्‍यांकडे प्रस्ताव सादर केला होता. टंचाई शाखेने मान्यता दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या मोठ्या टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे.
टँकरचे पाणी गावाला पाणी पुरवठा करणार्‍या सार्वजनिक पाण्याच्या टाकीत ओतून त्या द्वारे गावात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे टंचाईच्या झळांपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

नायगाव धरणापासून पाणी योजना
गिरणा नदी परिसरातील शिरसोली गावाच्या सामूहिक पाणी योजनेचा पाण्याचा स्त्रोत कमी झाल्यामुळे शिरसोली प्र.न.ग्रामपंचायतीने नायगाव धरणावरून पाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. या ठिकाणावरून तात्पुरती पाणी योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रस्ताव तयार करणे सुरु केले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव सादर केल्यास १० लाखांपर्यंत मंजुरी देण्याचे आश्वासन दिले आहे. उर्वरित काम हे जैन उद्योग समुहाचे उपाध्यक्ष अशोक जैन यांनी करण्याचे आश्वासन दिले आहे. ग्रामपंचायतीकडे १२ व्या वित्त आयोगाचा १० ते १२ लाखांचा निधी आहे. यासार्‍या माध्यमातून तात्पुरती पाणी योजना राबविण्यात येणार असल्याचे सरपंच अर्जुन काटोले यांनी सांगितले.