शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

अतांत्रिक लोकांचा जलसंधारणाच्या कामात धूमाकूळ जलसंपत्ती दिन विशेष : जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांची सरकारवर टिका

By admin | Updated: April 24, 2016 00:39 IST

जळगाव : जलसंधारणाच्या कामांमध्ये अतांत्रिक लोक शिरले आहेत. शासनाच्या जलयुक्त शिवार कामांची जबाबदारी कृषि विभागावर आहे. ही जबाबदारी भूजलशास्त्रज्ञ व स्थापत्य अभियांत्रिकी यांच्याकडे हवी. पण अतांत्रिक लोक या कामांमध्ये आहेत. या लोकांनी अक्षरक्ष: जलसंधारणाच्या कामांमध्ये धुमाकूळ घातला आहे. मग कितीही जलयुक्त शिवारची कामे झाली तरी टँकरमुक्त खान्देश करणे शक्य नाही, अशी टिका जलतज्ज्ञ तथा शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांनी लोकमतशी बोलताना केली आहे.

जळगाव : जलसंधारणाच्या कामांमध्ये अतांत्रिक लोक शिरले आहेत. शासनाच्या जलयुक्त शिवार कामांची जबाबदारी कृषि विभागावर आहे. ही जबाबदारी भूजलशास्त्रज्ञ व स्थापत्य अभियांत्रिकी यांच्याकडे हवी. पण अतांत्रिक लोक या कामांमध्ये आहेत. या लोकांनी अक्षरक्ष: जलसंधारणाच्या कामांमध्ये धुमाकूळ घातला आहे. मग कितीही जलयुक्त शिवारची कामे झाली तरी टँकरमुक्त खान्देश करणे शक्य नाही, अशी टिका जलतज्ज्ञ तथा शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांनी लोकमतशी बोलताना केली आहे.
जलसंपत्ती दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला. खानापूरकर हे मूळचे रावेर तालुक्यातील आहे. त्यांनी खान्देशसाठी शिरपूर पॅटर्न राबविण्याची मागणी पुन्हा एकदा यासंवादाच्या निमित्ताने केली.
पाणी प्रश्न कायम
पाणी प्रश्न मागील ६० वर्षे कायम आहे. शेतकर्‍यांना फक्त आश्वासने दिली जातात. शेतीला सोडा पण आता तर प्यायला पुरेसे पाणी नाही. अलीकडे या सरकारने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले, पण जेथे मागील काळात ही कामे झाली त्या गावांमध्येही टंचाई आहे. खान्देशात तशी स्थिती दिसून येते. दोन फूट खड्डा करा आणि आजूबाजूला माती टाका... फोटो काढा आणि बिले काढून घ्या..., असा प्रकार सुरू आहे. कृषि विभाग अतांत्रिक पद्धतीने हे काम करीत आहे. या अशाच अतांत्रिक लोकांनी मागील ४० वर्षे राज्यात जलसंधारणाची कामे केली म्हणून पाणीप्रश्न अधिक भीषण बनला असेही खानापूरकर म्हणाले.
जलसंधारण तांत्रिक पद्धतीने व्हावे
जलसंधारण हे तांत्रिक पद्धतीने भूजल शास्त्रज्ञ व स्थापत्य अभियंता यांच्यामाध्यमातून व्हावे. शिरपूर पॅटर्न अशाच पद्धतीने झाला. शिरपूर तालुका ८० टक्के बागायती आहे. एकही शेतकरी आत्महत्या नाही..., हे कामाचे फलित आहे. खान्देशात किंवा राज्यात अन्यत्र आठ हजार मी.मी.पाऊस पडला आणि अतांत्रिक पद्धतीने जलसंधारणाचे काम सुरू राहीले तर टँकरमुक्ती होऊ शकणार नाही, असेही खानापूरकर यांनी सांगितले.

पाणी पातळी खालावली
जिल्‘ात गिरणा काठावर शेती उजाड झाली आहे. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जळगाव आदी तालुक्यांमधील गिरणाकाठच्या गावांमध्ये ८० फुटांवर पाणी मिळायचे. पण आता २०० फूट कूपनलिका करूनही पाणी मिळत नाही. २०० फूट कूपनलिका करायला ४५ हजार रुपये खर्च येतो. पाणी पुरेसे नसले तर हा खर्च वाया जातो. गिराणा नदीवर किंवा गिरणाकाठच्या भागात जलसंधारणाची कामे न झाल्याने केळी, लिंबूची शेती उजाड झाली.