शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
2
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
3
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
4
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
5
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
6
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
7
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
8
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
9
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
10
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
11
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
12
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
13
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
14
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
15
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
16
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
17
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
18
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
19
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
20
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं

अतांत्रिक लोकांचा जलसंधारणाच्या कामात धूमाकूळ जलसंपत्ती दिन विशेष : जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांची सरकारवर टिका

By admin | Updated: April 24, 2016 00:39 IST

जळगाव : जलसंधारणाच्या कामांमध्ये अतांत्रिक लोक शिरले आहेत. शासनाच्या जलयुक्त शिवार कामांची जबाबदारी कृषि विभागावर आहे. ही जबाबदारी भूजलशास्त्रज्ञ व स्थापत्य अभियांत्रिकी यांच्याकडे हवी. पण अतांत्रिक लोक या कामांमध्ये आहेत. या लोकांनी अक्षरक्ष: जलसंधारणाच्या कामांमध्ये धुमाकूळ घातला आहे. मग कितीही जलयुक्त शिवारची कामे झाली तरी टँकरमुक्त खान्देश करणे शक्य नाही, अशी टिका जलतज्ज्ञ तथा शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांनी लोकमतशी बोलताना केली आहे.

जळगाव : जलसंधारणाच्या कामांमध्ये अतांत्रिक लोक शिरले आहेत. शासनाच्या जलयुक्त शिवार कामांची जबाबदारी कृषि विभागावर आहे. ही जबाबदारी भूजलशास्त्रज्ञ व स्थापत्य अभियांत्रिकी यांच्याकडे हवी. पण अतांत्रिक लोक या कामांमध्ये आहेत. या लोकांनी अक्षरक्ष: जलसंधारणाच्या कामांमध्ये धुमाकूळ घातला आहे. मग कितीही जलयुक्त शिवारची कामे झाली तरी टँकरमुक्त खान्देश करणे शक्य नाही, अशी टिका जलतज्ज्ञ तथा शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांनी लोकमतशी बोलताना केली आहे.
जलसंपत्ती दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला. खानापूरकर हे मूळचे रावेर तालुक्यातील आहे. त्यांनी खान्देशसाठी शिरपूर पॅटर्न राबविण्याची मागणी पुन्हा एकदा यासंवादाच्या निमित्ताने केली.
पाणी प्रश्न कायम
पाणी प्रश्न मागील ६० वर्षे कायम आहे. शेतकर्‍यांना फक्त आश्वासने दिली जातात. शेतीला सोडा पण आता तर प्यायला पुरेसे पाणी नाही. अलीकडे या सरकारने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले, पण जेथे मागील काळात ही कामे झाली त्या गावांमध्येही टंचाई आहे. खान्देशात तशी स्थिती दिसून येते. दोन फूट खड्डा करा आणि आजूबाजूला माती टाका... फोटो काढा आणि बिले काढून घ्या..., असा प्रकार सुरू आहे. कृषि विभाग अतांत्रिक पद्धतीने हे काम करीत आहे. या अशाच अतांत्रिक लोकांनी मागील ४० वर्षे राज्यात जलसंधारणाची कामे केली म्हणून पाणीप्रश्न अधिक भीषण बनला असेही खानापूरकर म्हणाले.
जलसंधारण तांत्रिक पद्धतीने व्हावे
जलसंधारण हे तांत्रिक पद्धतीने भूजल शास्त्रज्ञ व स्थापत्य अभियंता यांच्यामाध्यमातून व्हावे. शिरपूर पॅटर्न अशाच पद्धतीने झाला. शिरपूर तालुका ८० टक्के बागायती आहे. एकही शेतकरी आत्महत्या नाही..., हे कामाचे फलित आहे. खान्देशात किंवा राज्यात अन्यत्र आठ हजार मी.मी.पाऊस पडला आणि अतांत्रिक पद्धतीने जलसंधारणाचे काम सुरू राहीले तर टँकरमुक्ती होऊ शकणार नाही, असेही खानापूरकर यांनी सांगितले.

पाणी पातळी खालावली
जिल्‘ात गिरणा काठावर शेती उजाड झाली आहे. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जळगाव आदी तालुक्यांमधील गिरणाकाठच्या गावांमध्ये ८० फुटांवर पाणी मिळायचे. पण आता २०० फूट कूपनलिका करूनही पाणी मिळत नाही. २०० फूट कूपनलिका करायला ४५ हजार रुपये खर्च येतो. पाणी पुरेसे नसले तर हा खर्च वाया जातो. गिराणा नदीवर किंवा गिरणाकाठच्या भागात जलसंधारणाची कामे न झाल्याने केळी, लिंबूची शेती उजाड झाली.