शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

महाराष्ट्राचा आवाज घुमला!

By admin | Updated: December 16, 2014 04:50 IST

महाराष्ट्राच्या पाच महत्त्वपूर्ण प्रश्नांनी लोकसभेचे लक्ष सोमवारी वेधून घेतले. दुष्काळावर उत्तर शोधत असतानाच, राज्यातील काही भागांत पडलेल्या गारांनी फळबागांचे अपरिमित नुकसान केले

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या पाच महत्त्वपूर्ण प्रश्नांनी लोकसभेचे लक्ष सोमवारी वेधून घेतले. दुष्काळावर उत्तर शोधत असतानाच, राज्यातील काही भागांत पडलेल्या गारांनी फळबागांचे अपरिमित नुकसान केले. तेथील शेतकऱ्यांना मदत करा, विदर्भातील युवकांना उद्योग सुरू करताना बँका मदत करत नाहीत, मुंबईतील जीर्ण झालेल्या इमारतींचे पुनर्वसन करा आणि सेवाग्रामच्या बापू कुटीचे अस्तित्व प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे. प्रश्नोत्तराच्या तासात व शून्यकाळातील या प्रश्नांनी राज्याच्या स्थितीवर प्रकाश पडल्याचे दिसून आले.पीक नुकसानीकडे वेधले लक्षनाशिक जिल्ह्यातील मालेगाव, निफाड, दिंडोरी, चांदवड, बागलाणसह अनेक भागांत गेल्या आठवड्यात दोन दिवस सलग बेमोसमी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढल्याने हजारो हेक्टरवरील द्राक्ष, डाळिंबासह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी पाहणी करून मदत देण्याचे जाहीर केले. राज्य सरकारने अहवाल पाठविला आहे़ त्यामुळे केंद्राने लक्ष घालण्याची मागणी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी शून्यप्रहरात केली. शिवसेना खासदारांनी या मागणीस समर्थन दिले. बँकांचा असहकारविदर्भातील अनेक भागातील आर्थिक स्थिती बेताची असल्याने अनेक अडचणींवर मात करून युवकांनी उद्योगासाठी बँकाकंडे कर्ज मागितले, तर त्यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले जाते. दुष्काळामुळे तुम्ही कर्ज फेडू शकणार नाहीत, अशी अपमानजनक उत्तरे दिली जातात. बँका कर्ज देत नाहीत, ही मानसिकता कधी बदलली जाईल, असे शिवसेनेच्या खा. भावना गवळी यांंनी लघुउद्योगमंत्री कलराज मिश्र यांना विचारले़ तेव्हा त्यांनी मन हेलावणारा हा विषय असून, मी यामध्ये लक्ष घालून अशा युवकांसाठी सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगात काही आर्थिक तरतूद करता येईल का, यासाठी योजना आखतो.जीर्ण इमारतींचे पुनर्वसन करादक्षिण मुंबईमध्ये असलेल्या १६ हजार जुन्या इमारतींपैकी १३ हजार ३३६ इमारती १९४० च्या पूर्वीच्या आहेत. त्यापैकी पाच हजार अतिशय जीर्ण आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकार योजना बनवीत आहे़ तेव्हा या इमारतींचा त्यामध्ये समावेश करा,अशी मागणी शिवसेना खा. अरविंद सावंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली. तेव्हा शहरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी योजना तयार झाली की अनेक विषय त्यामध्ये अंतर्भूत करू असे म्हटले. (विशेष प्रतिनिधी)