शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

महाराष्ट्राचा आवाज घुमला!

By admin | Updated: December 16, 2014 04:50 IST

महाराष्ट्राच्या पाच महत्त्वपूर्ण प्रश्नांनी लोकसभेचे लक्ष सोमवारी वेधून घेतले. दुष्काळावर उत्तर शोधत असतानाच, राज्यातील काही भागांत पडलेल्या गारांनी फळबागांचे अपरिमित नुकसान केले

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या पाच महत्त्वपूर्ण प्रश्नांनी लोकसभेचे लक्ष सोमवारी वेधून घेतले. दुष्काळावर उत्तर शोधत असतानाच, राज्यातील काही भागांत पडलेल्या गारांनी फळबागांचे अपरिमित नुकसान केले. तेथील शेतकऱ्यांना मदत करा, विदर्भातील युवकांना उद्योग सुरू करताना बँका मदत करत नाहीत, मुंबईतील जीर्ण झालेल्या इमारतींचे पुनर्वसन करा आणि सेवाग्रामच्या बापू कुटीचे अस्तित्व प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे. प्रश्नोत्तराच्या तासात व शून्यकाळातील या प्रश्नांनी राज्याच्या स्थितीवर प्रकाश पडल्याचे दिसून आले.पीक नुकसानीकडे वेधले लक्षनाशिक जिल्ह्यातील मालेगाव, निफाड, दिंडोरी, चांदवड, बागलाणसह अनेक भागांत गेल्या आठवड्यात दोन दिवस सलग बेमोसमी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढल्याने हजारो हेक्टरवरील द्राक्ष, डाळिंबासह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी पाहणी करून मदत देण्याचे जाहीर केले. राज्य सरकारने अहवाल पाठविला आहे़ त्यामुळे केंद्राने लक्ष घालण्याची मागणी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी शून्यप्रहरात केली. शिवसेना खासदारांनी या मागणीस समर्थन दिले. बँकांचा असहकारविदर्भातील अनेक भागातील आर्थिक स्थिती बेताची असल्याने अनेक अडचणींवर मात करून युवकांनी उद्योगासाठी बँकाकंडे कर्ज मागितले, तर त्यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले जाते. दुष्काळामुळे तुम्ही कर्ज फेडू शकणार नाहीत, अशी अपमानजनक उत्तरे दिली जातात. बँका कर्ज देत नाहीत, ही मानसिकता कधी बदलली जाईल, असे शिवसेनेच्या खा. भावना गवळी यांंनी लघुउद्योगमंत्री कलराज मिश्र यांना विचारले़ तेव्हा त्यांनी मन हेलावणारा हा विषय असून, मी यामध्ये लक्ष घालून अशा युवकांसाठी सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगात काही आर्थिक तरतूद करता येईल का, यासाठी योजना आखतो.जीर्ण इमारतींचे पुनर्वसन करादक्षिण मुंबईमध्ये असलेल्या १६ हजार जुन्या इमारतींपैकी १३ हजार ३३६ इमारती १९४० च्या पूर्वीच्या आहेत. त्यापैकी पाच हजार अतिशय जीर्ण आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकार योजना बनवीत आहे़ तेव्हा या इमारतींचा त्यामध्ये समावेश करा,अशी मागणी शिवसेना खा. अरविंद सावंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली. तेव्हा शहरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी योजना तयार झाली की अनेक विषय त्यामध्ये अंतर्भूत करू असे म्हटले. (विशेष प्रतिनिधी)