शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

नोटाबंदीचा दहशतवादाला दणका, जम्मू काश्मीरमधील हिंसाचार 60 टक्यांनी कमी

By admin | Updated: January 7, 2017 11:25 IST

काश्मीर खो-यासह अन्य ठिकाणी होणा-या दहशतवादावर नोटाबंदीच्या माध्यमातून करण्यात आलेला वार यशस्वी होताना दिसत आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, 7 - नोटाबंदी निर्णयामुळे अंडरवर्ल्डचं कंबरड मोडलं असताना दहशतवादालाही याचा चांगलाच फटका बसल्याचं दिसत आहे. काश्मीर खो-यासह अन्य ठिकाणी होणा-या दहशतवादावर नोटाबंदीच्या माध्यमातून करण्यात आलेला वार यशस्वी होताना दिसत आहे. गेल्या तीस दिवसांपासून नोटाबंदीच्या परिणामांची तपासणी करणा-या केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार नोटाबंदी निर्णयामुळे दहशतवाद्यांना होणा-या फंडिंगला आळा बसला आहे. यामुळेच काश्मीर खो-यातील दहशतवादाशी संबंधित हिंसाचार 60 टक्क्यांनी कमी झाला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या महिन्यात फक्त एक बॉम्बस्फोट झाला आहे. याशिवाय नोटाबंदी निर्णयामुळे नक्षवाद्यांचंही कंबंरडं मोडलं आहे. भारतामध्ये हवाला एजंट्सच्या कॉल ट्राफिकमध्ये 50 टक्क्यांची घसरण झाली आहे.  
 
 
हवालामध्ये पेमेंट रोख होते, आणि यामध्ये 500 आणि 1000 च्या नोटांचा समावेश असतो. पण 8 नोव्हेंबरला नोटाबंदी निर्णय जाहीर झाल्यानंतर या नोटांची किंमत फक्त रद्दीपुरती उरली आहे. याचा हवाला ऑपरेटर्सना खूप मोठा फटका बसला असून कॉल ट्राफिकमध्ये 50 टक्क्यांची घसरण झाली आहे.  
 
नोटांमध्ये करण्यात आलेल्या बदल आणि सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे सीमेपलीकडच्याही बनावट नोटांच्या धंदयावरही चांगलाच परिणाम झाल्याचं सरकारी अधिकारी आणि गुतप्तर यंत्रणेने सांगितलं आहे. एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 'पाकिस्तानमधील क्वेटामध्ये आणि कराचीमधील प्रेसमध्ये बनावट नोटा छापल्या जात होत्या. नोटाबंदी निर्णयानंतर या प्रेस बंद करण्याशिवाय त्यांच्यापुढे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. गुप्तचर यंत्रणांच्या तपासात ही माहिती समोर आली आहे'.
 
8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. यावेळी त्यांनी 500 आणि 1000 च्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. देशाला संबोधित करताना यावेळी दहशतवादाशी लढा देण्यासाठी नोटाबंदीची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या देशात असलेल्या बनावट चलनामध्ये 500 आणि 1000 च्या नोटांच प्रमाण जास्त आहे. 
 
नोटाबंदीच्या परिणामांची माहिती घेण्यासाठी सर्व राज्यांमधून माहिती मागवण्यात आली होती. खासकरुन संवेदनशील राज्यांमधून सुचना मागवण्यात आल्या. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काश्मीरमधील पाक पुरस्कृत दहशतवाद, बनावट नोटा आणि नक्षवाद्यांच्या फंडिंगवर झालेल्या परिणामावर चर्चा करण्यात आली. 'काश्मीर खो-यात गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांचं नेटवर्क कमकुवत झाल्याने दहशतवाद विरोधी ऑपरेशन्स चालवण्यात आले. पैसेच नसल्याने स्थानिकांना रोख देऊन दगडफेक करायला सांगणंही कठीण झालं आहे', अशी माहिती अधिका-याने दिली आहे.