शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

विजय मल्ल्यांना देशाबाहेर काढू शकत नाही -ब्रिटीश सरकारने फेटाळली मागणी

By admin | Updated: May 11, 2016 09:55 IST

भारत सरकारने विजय माल्या यांचा पासपोर्ट जरी रद्द केला असला तरी आम्ही त्यांना देशाबाहेर काढू शकत नाही, असे ब्रिटन सरकारने स्पष्ट केले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बूडवून देशाबाहेर पळालेले विजय मल्ल्या हे इतक्यात तरी भारतात परतण्याची चिन्हे दिसत नाहीत. सरकारने जरी त्यांचा भारतीय पासपोर्ट रद्द केला असला तरीही मल्या यांना भारतात परत पाठवू शकत नाही, असे सांगत ब्रिटीश सरकारने केंद्र सरकारची मागणी फेटाळली. मल्ल्या यांचे हस्तांतरण शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र असे असले तरीही मल्ल्या यांच्यावर लावण्यात आलेल्या गंभीर आरोपांची ब्रिटन सरकारला पूर्ण कल्पना असून त्यांनी भारत सरकारला मदत करण्यास पूर्णपणे तयारी दाखवली आहे. 
 
तीनवेळा समन्स बजावूनही विजय मल्ल्या हजर न झाल्यामुळे सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीतील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला त्यांचा पासपोर्ट रद्द किंवा हस्तगत करावा, असे कळविले होते, त्यानुसार गेल्या महिन्यात मल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला होता. पासपोर्ट रद्द झाल्यामुळे परदेशातील त्यांचे वास्तव्य बेकायदा ठरून त्यांना मायदेशी परतणे भाग पडेल, असा अधिका-यांचा होरा होता. मात्र ब्रिटन सरकारने त्यांना देशाबाहेर घालवण्यास नकार दर्शवला असून याप्रकरणी भारत सरकारने कायदेशीर मदत घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिल्याचे परराषष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी नमूद केले. 
 
' १९७१ सालच्या इमिग्रेशन कायद्यानुसार ब्रिटनमध्ये प्रवेश करताना एखाद्या इसमाचा पासपोर्ट वैध असल्यास त्यानंतर देशात राहण्यासाठी त्या व्यक्तीचा पासपोर्ट वैध असणे आवश्यक नाही,' असे स्वरूप म्हणाले.  विजय मल्ल्या यांनी २ मार्च रोजी भारतातून ब्रिटनमध्ये पलायन केले व त्यानंतरच काही कालावधीने भारत सरकारने त्यांचा पासपोर्ट रद्द केला होता. म्हणजेच ब्रिटनमध्ये प्रवेश करताना मल्ल्या यांचा पासपोर्ट वैध असल्याने आता ब्रिटन सरकार त्यांना देशाबाहेर काढू शकत नाही व त्यामुळेच ते ब्रिटनमध्ये कायदेशीररित्या राहू शकतात' असे दिसते. ईडीने मल्ल्यांना बजावलेल्या तिसऱ्या समन्समध्ये नऊ एप्रिलला चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले होते. मात्र, मल्ल्या हजर झाले नाहीत. ईडी ९०० कोटी रूपयांच्या आयडीबीआय कर्ज घोटाळ्याचा तपास करीत आहे.