शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

बदलत्या हवामानामुळे भाजीपाला संकटात

By admin | Updated: May 12, 2014 18:29 IST

तापमानातील होणार्‍या बदलांमुळे फळ आणि भाजीपाला संवर्गातील पिके धोक्यात आली आहेत.

पातूर : तापमानातील होणार्‍या बदलांमुळे फळ आणि भाजीपाला संवर्गातील पिके धोक्यात आली आहेत. टमाटर, भेंडी, काकडी, गवार, वांगी, बरबटी, आलू, कोबी, कारले या पिकांना तडाखा बसला आहे. या पिकाला लावलेला खर्चही आता निघणार की नाही, या संकटात भाजीपाला उत्पादक सापडले आहेत. पातूर तालुक्यातील आलेगाव, खामखेड, बोडखा,आगीखेड,शिर्ला यासह अनेक गावातील शेतकरी भाजीपाला पिके घेतात. भाजीपाला पिकावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबूनआहे. पातूर तालुक्यात फुलांची शेती आहे. येथून येणारी फुले हे अकोला व आजूबाजूच्या बाजारपेठेत विक्रीसाठी येतात. बदलत्या हवामानामुळे फुलेही कोमेजत आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकर्‍यांवर असलेली संकटांची मालिका कायम आहे. यामध्ये सर्वच शेतकरी भरडली जात आहेत. सुरुवातीला अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या हातातील खरीप हंगाम गेला. त्यानंतर रब्बीचे पीक घरी येईल, असे वाटत असतानाच वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. त्यातूनही सावरत शेतकर्‍यांनी फळे व भाजीपाला पिकांवर लक्ष केंद्रित केले होते; परंतु आता वातावरणातील सातत्याने होत असलेला बदल, पांढर्‍या माशीचा प्रकोप यामुळे फळे व भाजीपाला पीकही संकटात आले आहे. जे पीक किंवा फळे हाती येत आहे, त्याला बाजारात पाहिजे तसा भाव नाही. अत्यल्प दरात भाजीपाला व फळे व्यापार्‍यांना विकल्याशिवाय शेतकर्‍यांजवळ कोणताही मार्ग नाही. यातून व्यापारी मात्र चांगले पैसे कमवित असले तरी शेतकरी रात्रंदिवस परिश्रम करूनही रिताच आहे. या फळपिकांवरील पांढर्‍या माशीचा बंदोबस्त करण्यासाठी लागणारी औषधी अतिशय महागडी आहे. सध्या शेतकर्‍यांकडे पैसा जमा नसल्यामुळे त्यांना आपली पिके वाचविणे शक्य होताना दिसत नाही. टमाटर, भेंडी, काकडी, गवार, वांगी, बरबटी, आलू, कोबी, कारले यांसह अनेक पिके शेतकर्‍यांच्या शेतात आहे. ढगाळ वातावरण भाजीपाला पिकांसाठी घातक आहे. अशातच भाजीपाल्यांचे भाव गडगडले असल्यामुळे शेतकर्‍यांची चांगलीच कोंडी झाली आहे.