शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

वसईत सर्वपक्षीय उमेदवार एका मंचावर

By admin | Updated: October 8, 2014 01:15 IST

प्रा. स. गो. वर्टी स्मृती विचार व्याखानमालेच्या वतीने ‘विधानसभेसाठी मीच उमेदवार का? ’

नायगांव : प्रा. स. गो. वर्टी स्मृती विचार व्याखानमालेच्या वतीने ‘विधानसभेसाठी मीच उमेदवार का? ’ याअंतर्गत वसई विधानसभा मतदारसंघातील चार उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ यांनी केले.आपल्या अडचणी दूर होऊन उतम प्रशासक मिळावा, यासाठी मतदार लोकप्रतिनिधींना निवडून देतात. मात्र, असा उत्तम कारभार करण्यात यावा, यासाठी गरजा व मागण्यांचा समतोल राखता आला पहिजे. परंतु, आजचे राजकारण पाहिले तर राजकारणाचा समतोल ढासळलेला दिसतो. प्रश्न केवळ भ्रष्टाचाराचाच नाही तर उत्तम कारभाराचा आहे. वसईचा विचार केला तर वसईसाठी वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे. तो तातडीने सोडवायला हवा. प्रकल्पांची गरज ओळखून त्यानुसार सुविध पुरवणे आवश्यक आहे. आता नव्या आर्थिक वर्षात बेरोजगारांच्या कौशल्याला वाव देत त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देणे, तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधा माफक दरात देणे गरजेचे आहे.काँग्रेसचे मायकल फुर्ट्याडो यांनी वसईची लोकसंख्या वाढत असल्याने सुविधांचा तुटवडा जाणवत असल्याचे म्हटले. सध्या न्यायालयात सुरू असलेली गावांची लढाई यशस्वी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी वसई-विरार हा जलदगतीने लोकसंख्या वाढणारा प्रदेश असल्याने वर्टी समितीने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार महानगरपालिका स्थापन करण्यात आली. आज केवळ वसई प्रभागासाठी १०० कोटींच्या विकासकामांची तरतुद झाली. पाणी योजनांमधून ५०० एमएलडी जास्त पुरवठा होणार आहे. या वाढत्या मागण्यांना मिळणारा निधीच आवश्यक तरतुद करेल असे ठाकूर म्हणाले. तर मनवेल तुस्कानो यांनी धर्मनिरपेक्षतेची गरज असल्याचे सांगितले. न्यु इंग्लिश स्कुल वसई माजी विद्यार्थी महासंघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (वार्ताहर)