शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

उत्तराखंडमध्ये सत्तेसाठी फोडाफोडीचे सत्र सुरू

By admin | Updated: March 20, 2016 02:14 IST

उत्तराखंडमधील सत्ताधारी काँग्रेसमधील एक गट फुटून भाजपाकडे गेल्याने येथील हरिश रावत सरकार संकटात सापडले असून, काँग्रेस बंडखोरांच्या मदतीने सरकार

डेहराडून/नवी दिल्ली : उत्तराखंडमधील सत्ताधारी काँग्रेसमधील एक गट फुटून भाजपाकडे गेल्याने येथील हरिश रावत सरकार संकटात सापडले असून, काँग्रेस बंडखोरांच्या मदतीने सरकार स्थापनेचे भाजपाने प्रयत्न सुरू केले आहेत. रावत सरकार अल्पमतात आले असल्याने ते बरखास्त करावे, अशी मागणी भाजपाने राज्यपालांकडे केली आहे. मात्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना २८ मार्चपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.शनिवारी संध्याकाळी रावत यांनी फुटलेले काही आमदार परतल्याचा आणि भाजपाचे काही आमदारही आपल्याकडे असल्याचा दावा केला. आपण विधानसभेत बहुमत सिद्ध करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.विधानसभाध्यक्षांनी पक्षांतरविरोधी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची ताकीद दिली आहे. भाजपाच्या अविश्वास प्रस्तावाबाबत विचारले असता ते म्हणाले की, असा प्रस्ताव विधानसभेत आल्यावर त्याचा निर्णय घेतला जाईल.काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा डावभाजपावर हल्लाबोल करताना राजकीय सत्ता आणि पैशाची लालूच दाखवून भाजपेतर सरकार अस्थिर करण्याचा डाव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा खेळत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, मोदी-शहा जोडगोळी या देशातील निर्वाचित सरकारे बळजबरीने उलथून लावू पाहत आहे. अरुणाचल प्रदेशपाठोपाठ आता उत्तराखंडात हीच खेळी खेळली जात आहे.काँग्रेसचे ९ बंडखोर भाजपाकडेभाजपाचे नेते श्याम जाजू म्हणाले की, सरकार स्थापनेसाठी पक्षाजवळ पुरेसे संख्याबळ आहे. काँग्रेसचे ९ बंडखोर आमदार दिल्लीत पोहोचले असून, ते आमच्या संपर्कात आहेत.राज्यपालांची भेट घेणार पक्षांतरबंदी कायद्यान्वये बंडखोर आमदारांची संख्या कमी असली तरी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय बहुगुणा हेही भाजपाकडे गेल्याने त्यांच्या जोरावरच सरकार स्थापनेसाठी भाजपा नेते प्रयत्नशील आहेत. त्यासाठी ते राज्यपालांची भेट घेणार आहेत.