शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

अमेरिकी खासदारांनी मोदींना पत्र पाठविणे दुर्दैवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2016 03:14 IST

अमेरिकेच्या ३४ खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या विरोधातील हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त करणारे पत्र लिहिणे ही अतिशय ‘दुर्दैवी’ बाब असल्याचे

नवी दिल्ली : अमेरिकेच्या ३४ खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या विरोधातील हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त करणारे पत्र लिहिणे ही अतिशय ‘दुर्दैवी’ बाब असल्याचे भारत सरकारने म्हटले आहे.‘प्राचीन काळापासून सर्वसमावेशकता आणि सहिष्णुतेशी कटिबद्ध असलेला अनेकत्ववादी समाज म्हणजे भारत, अशी प्रशंसा करताना या काँग्रेस सदस्यांनी हिंसाचाराचे उदहारण देण्यासाठी काही मोजक्या घटनांची निवड करणे दुर्दैवी आहे,’ असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी एका निवेदनात म्हटले आहे.अमेरिकेच्या खासदारांनी २५ फेब्रुवारी रोजी मोदींना हे पत्र लिहिले होते, ते टॉम लॅन्टोस मानवाधिकार आयोगाने प्रसिद्ध केले. ‘भारतीय धार्मिक अल्पसंख्यक समाजाच्या सदस्यांविरुद्धचा वाढता हिंसाचार व असहिष्णुतेबद्दल आम्ही चिंता व्यक्त करतो. या धार्मिक अल्पसंख्यकांविरुद्ध हिंसाचार माजविणाऱ्यांना शिक्षा केली जाईल, हे सुनिश्चित करण्यासाठी तत्काळ पाऊल उचलण्याची विनंती आम्ही तुमच्या सरकारकडे करीत आहोत. (लोकमत न्यूज नेटवर्क)१७ जून २०१४ रोजी छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील किमान ५० ग्राम पंचायतींनी एक ठराव मंजूर करून सर्व बिगर-हिंदू धर्मीयांचा प्रचार, प्रार्थना आणि भाषणावर बंदी घातली होती,’ असे या पत्रात म्हटले आहे.हा ठराव मंजूर झाल्यानंतर ख्रिश्चन धर्माचे आचरण करणे हा गुन्हा ठरला आणि विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या सदस्यांचा समावेश असलेल्या जमावाने सिरीगुडा गावातील ख्रिश्चनांवर हल्ला करून सहा जणांना जखमी केले.ही बंदी घालण्यात आल्याने ख्रिश्चनांवर हल्ला करणे, सरकारी सेवा नाकारणे, खंडणी वसूल करणे, गावातून हाकलण्याची धमकी देणे, अन्न आणि पाणी नाकारणे आणि हिंदू धर्मात येण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे, असा आरोपही या खासदारांनी केला आहे. गोहत्या केल्याच्या आरोपावरून काही मुस्लिमांची कशी हत्या करण्यात आली, याचाही उल्लेख या पत्रात केला आहे.