शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकी खासदारांनी मोदींना पत्र पाठविणे दुर्दैवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2016 03:14 IST

अमेरिकेच्या ३४ खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या विरोधातील हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त करणारे पत्र लिहिणे ही अतिशय ‘दुर्दैवी’ बाब असल्याचे

नवी दिल्ली : अमेरिकेच्या ३४ खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या विरोधातील हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त करणारे पत्र लिहिणे ही अतिशय ‘दुर्दैवी’ बाब असल्याचे भारत सरकारने म्हटले आहे.‘प्राचीन काळापासून सर्वसमावेशकता आणि सहिष्णुतेशी कटिबद्ध असलेला अनेकत्ववादी समाज म्हणजे भारत, अशी प्रशंसा करताना या काँग्रेस सदस्यांनी हिंसाचाराचे उदहारण देण्यासाठी काही मोजक्या घटनांची निवड करणे दुर्दैवी आहे,’ असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी एका निवेदनात म्हटले आहे.अमेरिकेच्या खासदारांनी २५ फेब्रुवारी रोजी मोदींना हे पत्र लिहिले होते, ते टॉम लॅन्टोस मानवाधिकार आयोगाने प्रसिद्ध केले. ‘भारतीय धार्मिक अल्पसंख्यक समाजाच्या सदस्यांविरुद्धचा वाढता हिंसाचार व असहिष्णुतेबद्दल आम्ही चिंता व्यक्त करतो. या धार्मिक अल्पसंख्यकांविरुद्ध हिंसाचार माजविणाऱ्यांना शिक्षा केली जाईल, हे सुनिश्चित करण्यासाठी तत्काळ पाऊल उचलण्याची विनंती आम्ही तुमच्या सरकारकडे करीत आहोत. (लोकमत न्यूज नेटवर्क)१७ जून २०१४ रोजी छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील किमान ५० ग्राम पंचायतींनी एक ठराव मंजूर करून सर्व बिगर-हिंदू धर्मीयांचा प्रचार, प्रार्थना आणि भाषणावर बंदी घातली होती,’ असे या पत्रात म्हटले आहे.हा ठराव मंजूर झाल्यानंतर ख्रिश्चन धर्माचे आचरण करणे हा गुन्हा ठरला आणि विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या सदस्यांचा समावेश असलेल्या जमावाने सिरीगुडा गावातील ख्रिश्चनांवर हल्ला करून सहा जणांना जखमी केले.ही बंदी घालण्यात आल्याने ख्रिश्चनांवर हल्ला करणे, सरकारी सेवा नाकारणे, खंडणी वसूल करणे, गावातून हाकलण्याची धमकी देणे, अन्न आणि पाणी नाकारणे आणि हिंदू धर्मात येण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे, असा आरोपही या खासदारांनी केला आहे. गोहत्या केल्याच्या आरोपावरून काही मुस्लिमांची कशी हत्या करण्यात आली, याचाही उल्लेख या पत्रात केला आहे.