शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

पंतप्रधानांच्या घोषणेला वाटाण्याच्या अक्षता

By admin | Updated: March 24, 2015 23:55 IST

जनधन योजना : विम्याची रक्कम फक्त ३० हजार

जनधन योजना : विम्याची रक्कम फक्त ३० हजारसंकेत शुक्लनाशिक : भारतातील तळागाळातील लोकांनी राष्ट्रीयीकृत बॅँकेत खाते उघडावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या जनधन योजनेतील लाभार्थ्यांना असलेल्या विमा कवचाच्या रकमेवरून शासनामध्येच गोंधळ असून, त्या अंतर्गत दिवंगत खातेधारकाच्या वारसाला जनधन नव्हे, तर आम आदमी विमा योजनेंतर्गत रक्कम दिली गेल्याने शासनाने एकप्रकारे पंतप्रधानांच्या घोषणेलाच वाटाण्याच्या अक्षता लावल्याचा आरोप होत आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर पहिल्याच स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जनधन योजनेची घोषणा केली होती. या योजनेनुसार राष्ट्रीयीकृत बॅँकेत झिरो बॅलन्सवर खाते उघडणार्‍या नागरिकांनाही विम्याचे संरक्षण कवच देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले होते. हे कवच सुमारे एक लाखाचे असेल, असेही ते म्हणाले होते. त्यानुसार या योजनेला देशभरात चांगले योगदान मिळाले. सर्वसाधारण गटातील लाखो नागरिकांनी त्याअंतर्गत विविध राष्ट्रीयीकृत बॅँकांमध्ये खातेही उघडले. ऑक्टोबर महिन्यापासून या योजनेला प्रतिसाद मिळत असतानाच अवघ्या काही दिवसांनंतर त्यातील काही खातेधारकांचा मृत्यूही झाला. मोदींनी घोषणा केल्याप्रमाणे खातेधारकांच्या वारसांनी बॅँकेत विमा रकमेसाठी विचारणा केली. विम्याची जबाबदारीही बॅँकेवरच टाकण्यात आली असल्याने बॅँकेने त्यानुसार शासनाच्या अंगिकृत असलेल्या भारतीय आयुर्विमा कंपनीकडे त्याबाबत विचारणा झाल्यानंतर शासनाने जनधन योजनेतील लाभार्थ्यांना जुन्याच आम आदमी विमा योजनेनुसार मदत देण्याचा निर्णय घेतल्याचे कळवण्यात आले. त्यानुसार नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर या जिल्‘ांतील मयत खातेधारकांच्या वारसांना प्रत्येकी ३० हजार रुपये देण्यात आले. ५० खातेधारकांना लाभजनधन योजनेत खाते उघडलेल्या आणि त्यानंतर अल्पावधीतच मृत्यू झालेल्या सुमारे ५० खातेधारकांच्या विमा रकमेबाबत साशंकता निर्माण झाली होती. त्यानुसार शासनाशी संपर्क साधला असता प्रत्येक मृत खातेधारकाच्या वारसाला आम आदमी विमा योजनेप्रमाणे ३० हजार रुपये देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार भारतीय आयुर्विमा कंपनीने सुमारे ५० खातेधारकांच्या वारसांना त्याचा मोबदला दिला आहे. आम आदमी विमा योजनेत नैसर्गिक मृत्यूसाठी ३० हजार रुपये देण्यात येतात, तर अपघाती मृत्यूमध्ये ७५ हजार रुपये दिले जातात. जनधनमध्ये पंतप्रधानांनी एक लाखाची घोषणा केली होती. शासनाच्या आदेशानुसारच परिपूर्तीजनधन योजनेतील सभासदाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसाने विमा रकमेबद्दल बॅँकेत विचारणा केली. बॅँकेच्या अधिकार्‍यांनी त्यानुसार आमच्याकडे क्लेम पाठवले. हे क्लेम कोणत्या पद्धतीने द्यावे याचे मार्गदर्शन घेण्यासाठी जेव्हा आमच्या वरिष्ठ कार्यालयात संपर्क साधला तेव्हा आम आदमीच्या नियमांनुसार क्लेम (परिपूर्ती) देण्याचे आम्हाला सांगण्यात आले. त्यानुसार प्रत्येक सभासदाच्या वारसाला आम्ही ३० हजार रुपये प्रदान केले.- शेखर मोघे (सरचिटणीस, विमा कामगार युनियन)