शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
2
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
3
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
4
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
5
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
7
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
8
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
10
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
11
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
12
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
13
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
14
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
15
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
16
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
17
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
18
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
19
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
20
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील

पंतप्रधानांच्या घोषणेला वाटाण्याच्या अक्षता

By admin | Updated: March 24, 2015 23:55 IST

जनधन योजना : विम्याची रक्कम फक्त ३० हजार

जनधन योजना : विम्याची रक्कम फक्त ३० हजारसंकेत शुक्लनाशिक : भारतातील तळागाळातील लोकांनी राष्ट्रीयीकृत बॅँकेत खाते उघडावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या जनधन योजनेतील लाभार्थ्यांना असलेल्या विमा कवचाच्या रकमेवरून शासनामध्येच गोंधळ असून, त्या अंतर्गत दिवंगत खातेधारकाच्या वारसाला जनधन नव्हे, तर आम आदमी विमा योजनेंतर्गत रक्कम दिली गेल्याने शासनाने एकप्रकारे पंतप्रधानांच्या घोषणेलाच वाटाण्याच्या अक्षता लावल्याचा आरोप होत आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर पहिल्याच स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जनधन योजनेची घोषणा केली होती. या योजनेनुसार राष्ट्रीयीकृत बॅँकेत झिरो बॅलन्सवर खाते उघडणार्‍या नागरिकांनाही विम्याचे संरक्षण कवच देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले होते. हे कवच सुमारे एक लाखाचे असेल, असेही ते म्हणाले होते. त्यानुसार या योजनेला देशभरात चांगले योगदान मिळाले. सर्वसाधारण गटातील लाखो नागरिकांनी त्याअंतर्गत विविध राष्ट्रीयीकृत बॅँकांमध्ये खातेही उघडले. ऑक्टोबर महिन्यापासून या योजनेला प्रतिसाद मिळत असतानाच अवघ्या काही दिवसांनंतर त्यातील काही खातेधारकांचा मृत्यूही झाला. मोदींनी घोषणा केल्याप्रमाणे खातेधारकांच्या वारसांनी बॅँकेत विमा रकमेसाठी विचारणा केली. विम्याची जबाबदारीही बॅँकेवरच टाकण्यात आली असल्याने बॅँकेने त्यानुसार शासनाच्या अंगिकृत असलेल्या भारतीय आयुर्विमा कंपनीकडे त्याबाबत विचारणा झाल्यानंतर शासनाने जनधन योजनेतील लाभार्थ्यांना जुन्याच आम आदमी विमा योजनेनुसार मदत देण्याचा निर्णय घेतल्याचे कळवण्यात आले. त्यानुसार नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर या जिल्‘ांतील मयत खातेधारकांच्या वारसांना प्रत्येकी ३० हजार रुपये देण्यात आले. ५० खातेधारकांना लाभजनधन योजनेत खाते उघडलेल्या आणि त्यानंतर अल्पावधीतच मृत्यू झालेल्या सुमारे ५० खातेधारकांच्या विमा रकमेबाबत साशंकता निर्माण झाली होती. त्यानुसार शासनाशी संपर्क साधला असता प्रत्येक मृत खातेधारकाच्या वारसाला आम आदमी विमा योजनेप्रमाणे ३० हजार रुपये देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार भारतीय आयुर्विमा कंपनीने सुमारे ५० खातेधारकांच्या वारसांना त्याचा मोबदला दिला आहे. आम आदमी विमा योजनेत नैसर्गिक मृत्यूसाठी ३० हजार रुपये देण्यात येतात, तर अपघाती मृत्यूमध्ये ७५ हजार रुपये दिले जातात. जनधनमध्ये पंतप्रधानांनी एक लाखाची घोषणा केली होती. शासनाच्या आदेशानुसारच परिपूर्तीजनधन योजनेतील सभासदाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसाने विमा रकमेबद्दल बॅँकेत विचारणा केली. बॅँकेच्या अधिकार्‍यांनी त्यानुसार आमच्याकडे क्लेम पाठवले. हे क्लेम कोणत्या पद्धतीने द्यावे याचे मार्गदर्शन घेण्यासाठी जेव्हा आमच्या वरिष्ठ कार्यालयात संपर्क साधला तेव्हा आम आदमीच्या नियमांनुसार क्लेम (परिपूर्ती) देण्याचे आम्हाला सांगण्यात आले. त्यानुसार प्रत्येक सभासदाच्या वारसाला आम्ही ३० हजार रुपये प्रदान केले.- शेखर मोघे (सरचिटणीस, विमा कामगार युनियन)