शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
4
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
5
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
6
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
7
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
8
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
9
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
10
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
11
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
12
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
13
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
14
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
15
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
16
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
17
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
18
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
19
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्र्यांमध्ये जुंपली

By admin | Updated: June 10, 2016 05:33 IST

मी हत्येची हाव समजू शकत नाही’, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी जनावरांना ठार मारण्याची परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून पर्यावरण मंत्रालयावर सडकून टीका केली

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- ‘मी हत्येची हाव समजू शकत नाही’, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी जनावरांना ठार मारण्याची परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून पर्यावरण मंत्रालयावर सडकून टीका केली. तथापि राज्यांच्या विनंतीवरूनच अशी परवानगी दिली जाते, असे सांगत पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जनावरांना मारण्याची परवानगी देण्याचे समर्थन केले.बिहारमध्ये नीलगायींना ठार मारण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकासमंत्री आणि पशू अधिकार कार्यकर्त्या मनेका गांधी यांनी हे वक्तव्य केले आहे. गांधी यांनी या नीलगायींची हत्या हा आजवरचा सर्वात मोठा नरसंहार असल्याचे म्हटले आहे. गांधी यांनी पर्यावरण मंत्रालयावर टीका केल्यानंतर केंद्रामध्ये ताळमेळ नाही, असा आरोप विरोधकांनी केला. गांधी म्हणाल्या, ‘ज्या जनावरांची हत्या करण्यासाठी केंद्राची परवानगी घेणे आवश्यक आहे, अशा सर्व जनावरांची यादी राज्यांकडून मागविण्याचे काम सध्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालय करीत आहे. हे पहिल्यांदाच घडत आहे. जनावरांच्या हत्येची ही कसली हाव आहे, हे मी समजू शकले नाही.’हे जनावरांच्या संख्येचे वैज्ञानिक व्यवस्थापन आहे आणि अपायकारक घोषित करण्यात आलेल्या जनावरांना मारण्याची परवानगी काही विशेष प्रदेश आणि ठरावीक कालावधीसाठीच दिली जाते, असे सांगून जावडेकर यांनी मात्र या पावलाचे समर्थन केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>आरोप... आणि खुलासाकेंद्र सरकारने बिहारमध्ये नीलगायी, पश्चिम बंगालमध्ये हत्ती, हिमाचल प्रदेशमध्ये माकड, गोव्यात मोर आणि महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात रानडुकरे मारण्याची परवानगी दिली. एकाही ग्रामप्रधान वा शेतकऱ्याने नीलगायींना मारण्याची परवानगी मागितली नसताना बिहारमध्ये अशी परवानगी दिली. - मनेका गांधी, केंद्रीय मंत्री विद्यमान कायद्यांतर्गत शेतकऱ्यांना जनावरांचा जास्त त्रास होतो आणि त्यांचे पीक नष्ट होते, तसेच राज्य सरकार जेव्हा प्रस्ताव पाठविते तेव्हाच आम्ही जनावरांना ठार मारण्याची परवानगी देतो. राज्य सरकारच्या विशेष भागात आणि ठरावीक काळासाठीच अशी परवानगी दिली जाते. परंतु हा काही केंद्र सरकारचा कार्यक्रम नाही. कायदाच तसा आहे. - प्रकाश जावडेकर>बिहार जावडेकरांसोबतजावडेकर यांच्या भूमिकेला अनपेक्षितपणे बिहार सरकारने पाठिंबा दिला आहे. वन्यप्राणी शेतांमध्ये शिरून शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे प्रसंगी त्यांना मारणे आवश्यक असते, असे बिहार सरकारतर्फे सांगण्यात आले. बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यापासून काही अंतरावर असलेल्या बाढ भागात शेतीचे नुकसान करणाऱ्या 400 नीलगायींना मारण्यात आले आहे.