शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

केंद्रीय मंत्र्यांमध्ये जुंपली

By admin | Updated: June 10, 2016 05:33 IST

मी हत्येची हाव समजू शकत नाही’, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी जनावरांना ठार मारण्याची परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून पर्यावरण मंत्रालयावर सडकून टीका केली

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- ‘मी हत्येची हाव समजू शकत नाही’, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी जनावरांना ठार मारण्याची परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून पर्यावरण मंत्रालयावर सडकून टीका केली. तथापि राज्यांच्या विनंतीवरूनच अशी परवानगी दिली जाते, असे सांगत पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जनावरांना मारण्याची परवानगी देण्याचे समर्थन केले.बिहारमध्ये नीलगायींना ठार मारण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकासमंत्री आणि पशू अधिकार कार्यकर्त्या मनेका गांधी यांनी हे वक्तव्य केले आहे. गांधी यांनी या नीलगायींची हत्या हा आजवरचा सर्वात मोठा नरसंहार असल्याचे म्हटले आहे. गांधी यांनी पर्यावरण मंत्रालयावर टीका केल्यानंतर केंद्रामध्ये ताळमेळ नाही, असा आरोप विरोधकांनी केला. गांधी म्हणाल्या, ‘ज्या जनावरांची हत्या करण्यासाठी केंद्राची परवानगी घेणे आवश्यक आहे, अशा सर्व जनावरांची यादी राज्यांकडून मागविण्याचे काम सध्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालय करीत आहे. हे पहिल्यांदाच घडत आहे. जनावरांच्या हत्येची ही कसली हाव आहे, हे मी समजू शकले नाही.’हे जनावरांच्या संख्येचे वैज्ञानिक व्यवस्थापन आहे आणि अपायकारक घोषित करण्यात आलेल्या जनावरांना मारण्याची परवानगी काही विशेष प्रदेश आणि ठरावीक कालावधीसाठीच दिली जाते, असे सांगून जावडेकर यांनी मात्र या पावलाचे समर्थन केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>आरोप... आणि खुलासाकेंद्र सरकारने बिहारमध्ये नीलगायी, पश्चिम बंगालमध्ये हत्ती, हिमाचल प्रदेशमध्ये माकड, गोव्यात मोर आणि महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात रानडुकरे मारण्याची परवानगी दिली. एकाही ग्रामप्रधान वा शेतकऱ्याने नीलगायींना मारण्याची परवानगी मागितली नसताना बिहारमध्ये अशी परवानगी दिली. - मनेका गांधी, केंद्रीय मंत्री विद्यमान कायद्यांतर्गत शेतकऱ्यांना जनावरांचा जास्त त्रास होतो आणि त्यांचे पीक नष्ट होते, तसेच राज्य सरकार जेव्हा प्रस्ताव पाठविते तेव्हाच आम्ही जनावरांना ठार मारण्याची परवानगी देतो. राज्य सरकारच्या विशेष भागात आणि ठरावीक काळासाठीच अशी परवानगी दिली जाते. परंतु हा काही केंद्र सरकारचा कार्यक्रम नाही. कायदाच तसा आहे. - प्रकाश जावडेकर>बिहार जावडेकरांसोबतजावडेकर यांच्या भूमिकेला अनपेक्षितपणे बिहार सरकारने पाठिंबा दिला आहे. वन्यप्राणी शेतांमध्ये शिरून शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे प्रसंगी त्यांना मारणे आवश्यक असते, असे बिहार सरकारतर्फे सांगण्यात आले. बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यापासून काही अंतरावर असलेल्या बाढ भागात शेतीचे नुकसान करणाऱ्या 400 नीलगायींना मारण्यात आले आहे.