शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
3
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
4
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
5
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
6
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
7
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
8
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
9
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
10
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
11
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...
12
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
13
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
14
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
15
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
16
रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये महिला रुग्णावर बलात्कार; गुंगीचं इंजेक्शन दिलं अन्...
17
कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
18
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
19
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
20
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले

केंद्रीय मंत्र्यांमध्ये जुंपली

By admin | Updated: June 10, 2016 05:33 IST

मी हत्येची हाव समजू शकत नाही’, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी जनावरांना ठार मारण्याची परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून पर्यावरण मंत्रालयावर सडकून टीका केली

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- ‘मी हत्येची हाव समजू शकत नाही’, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी जनावरांना ठार मारण्याची परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून पर्यावरण मंत्रालयावर सडकून टीका केली. तथापि राज्यांच्या विनंतीवरूनच अशी परवानगी दिली जाते, असे सांगत पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जनावरांना मारण्याची परवानगी देण्याचे समर्थन केले.बिहारमध्ये नीलगायींना ठार मारण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकासमंत्री आणि पशू अधिकार कार्यकर्त्या मनेका गांधी यांनी हे वक्तव्य केले आहे. गांधी यांनी या नीलगायींची हत्या हा आजवरचा सर्वात मोठा नरसंहार असल्याचे म्हटले आहे. गांधी यांनी पर्यावरण मंत्रालयावर टीका केल्यानंतर केंद्रामध्ये ताळमेळ नाही, असा आरोप विरोधकांनी केला. गांधी म्हणाल्या, ‘ज्या जनावरांची हत्या करण्यासाठी केंद्राची परवानगी घेणे आवश्यक आहे, अशा सर्व जनावरांची यादी राज्यांकडून मागविण्याचे काम सध्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालय करीत आहे. हे पहिल्यांदाच घडत आहे. जनावरांच्या हत्येची ही कसली हाव आहे, हे मी समजू शकले नाही.’हे जनावरांच्या संख्येचे वैज्ञानिक व्यवस्थापन आहे आणि अपायकारक घोषित करण्यात आलेल्या जनावरांना मारण्याची परवानगी काही विशेष प्रदेश आणि ठरावीक कालावधीसाठीच दिली जाते, असे सांगून जावडेकर यांनी मात्र या पावलाचे समर्थन केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>आरोप... आणि खुलासाकेंद्र सरकारने बिहारमध्ये नीलगायी, पश्चिम बंगालमध्ये हत्ती, हिमाचल प्रदेशमध्ये माकड, गोव्यात मोर आणि महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात रानडुकरे मारण्याची परवानगी दिली. एकाही ग्रामप्रधान वा शेतकऱ्याने नीलगायींना मारण्याची परवानगी मागितली नसताना बिहारमध्ये अशी परवानगी दिली. - मनेका गांधी, केंद्रीय मंत्री विद्यमान कायद्यांतर्गत शेतकऱ्यांना जनावरांचा जास्त त्रास होतो आणि त्यांचे पीक नष्ट होते, तसेच राज्य सरकार जेव्हा प्रस्ताव पाठविते तेव्हाच आम्ही जनावरांना ठार मारण्याची परवानगी देतो. राज्य सरकारच्या विशेष भागात आणि ठरावीक काळासाठीच अशी परवानगी दिली जाते. परंतु हा काही केंद्र सरकारचा कार्यक्रम नाही. कायदाच तसा आहे. - प्रकाश जावडेकर>बिहार जावडेकरांसोबतजावडेकर यांच्या भूमिकेला अनपेक्षितपणे बिहार सरकारने पाठिंबा दिला आहे. वन्यप्राणी शेतांमध्ये शिरून शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे प्रसंगी त्यांना मारणे आवश्यक असते, असे बिहार सरकारतर्फे सांगण्यात आले. बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यापासून काही अंतरावर असलेल्या बाढ भागात शेतीचे नुकसान करणाऱ्या 400 नीलगायींना मारण्यात आले आहे.