शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

केंद्रीय मंत्र्यांमध्ये जुंपली

By admin | Updated: June 10, 2016 05:33 IST

मी हत्येची हाव समजू शकत नाही’, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी जनावरांना ठार मारण्याची परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून पर्यावरण मंत्रालयावर सडकून टीका केली

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- ‘मी हत्येची हाव समजू शकत नाही’, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी जनावरांना ठार मारण्याची परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून पर्यावरण मंत्रालयावर सडकून टीका केली. तथापि राज्यांच्या विनंतीवरूनच अशी परवानगी दिली जाते, असे सांगत पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जनावरांना मारण्याची परवानगी देण्याचे समर्थन केले.बिहारमध्ये नीलगायींना ठार मारण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकासमंत्री आणि पशू अधिकार कार्यकर्त्या मनेका गांधी यांनी हे वक्तव्य केले आहे. गांधी यांनी या नीलगायींची हत्या हा आजवरचा सर्वात मोठा नरसंहार असल्याचे म्हटले आहे. गांधी यांनी पर्यावरण मंत्रालयावर टीका केल्यानंतर केंद्रामध्ये ताळमेळ नाही, असा आरोप विरोधकांनी केला. गांधी म्हणाल्या, ‘ज्या जनावरांची हत्या करण्यासाठी केंद्राची परवानगी घेणे आवश्यक आहे, अशा सर्व जनावरांची यादी राज्यांकडून मागविण्याचे काम सध्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालय करीत आहे. हे पहिल्यांदाच घडत आहे. जनावरांच्या हत्येची ही कसली हाव आहे, हे मी समजू शकले नाही.’हे जनावरांच्या संख्येचे वैज्ञानिक व्यवस्थापन आहे आणि अपायकारक घोषित करण्यात आलेल्या जनावरांना मारण्याची परवानगी काही विशेष प्रदेश आणि ठरावीक कालावधीसाठीच दिली जाते, असे सांगून जावडेकर यांनी मात्र या पावलाचे समर्थन केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>आरोप... आणि खुलासाकेंद्र सरकारने बिहारमध्ये नीलगायी, पश्चिम बंगालमध्ये हत्ती, हिमाचल प्रदेशमध्ये माकड, गोव्यात मोर आणि महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात रानडुकरे मारण्याची परवानगी दिली. एकाही ग्रामप्रधान वा शेतकऱ्याने नीलगायींना मारण्याची परवानगी मागितली नसताना बिहारमध्ये अशी परवानगी दिली. - मनेका गांधी, केंद्रीय मंत्री विद्यमान कायद्यांतर्गत शेतकऱ्यांना जनावरांचा जास्त त्रास होतो आणि त्यांचे पीक नष्ट होते, तसेच राज्य सरकार जेव्हा प्रस्ताव पाठविते तेव्हाच आम्ही जनावरांना ठार मारण्याची परवानगी देतो. राज्य सरकारच्या विशेष भागात आणि ठरावीक काळासाठीच अशी परवानगी दिली जाते. परंतु हा काही केंद्र सरकारचा कार्यक्रम नाही. कायदाच तसा आहे. - प्रकाश जावडेकर>बिहार जावडेकरांसोबतजावडेकर यांच्या भूमिकेला अनपेक्षितपणे बिहार सरकारने पाठिंबा दिला आहे. वन्यप्राणी शेतांमध्ये शिरून शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे प्रसंगी त्यांना मारणे आवश्यक असते, असे बिहार सरकारतर्फे सांगण्यात आले. बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यापासून काही अंतरावर असलेल्या बाढ भागात शेतीचे नुकसान करणाऱ्या 400 नीलगायींना मारण्यात आले आहे.