शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचे अस्वस्थ राजकारण

By admin | Updated: September 26, 2014 05:39 IST

गेल्या २५ वर्षापासून शिवसेनेशी असलेला घरोबा संपुष्टात आल्याने शहर भाजप मध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे

पुणे : गेल्या २५ वर्षापासून शिवसेनेशी असलेला घरोबा संपुष्टात आल्याने शहर भाजप मध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे महापालिकेत शिवसेने पेक्षा 10 नगरसेवक जास्त असले, तरी भाजपमध्ये असलेले गटतटाचे राजकरण आणि भाजपच्या तुलनेत शिवसेनेची शहरात असलेली संघटानात्मक बांधणी यामुळे शहरातील आपले तीन बालेकिल्ले वाचविण्याचे आव्हान शहर भाजप पुढे असल्याने भाजपमध्ये अस्वस्थतेचे वातावर निर्माण झाले आहे.अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनिल शिरोळे यांना तब्बल 2 लाख 96 हजार मताधिक्य मिळाले. त्यात शिवसेनेचाही मोठा वाटा होता. विशेष म्हणजे शिवसेनेचे आमदार असलेल्या कोथरूड मतदारसंघातून शिरोळे यांना तब्बल 1 लाख 22 हजार मते मिळाली होती. त्यामुळे शिवसेनेची ताकद पुन्हा अधोरेखीत झाली होती. तसेच मागील विधानसभा निवडणूकीतही नव्याने निर्माण झालेल्या पर्वती मतदारसंघातही शिवसेनेच्या मदतीने भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळ विजयी झाल्या होत्या.2011 मध्ये झालेल्या खडकवासला मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणूकीत शिवसेनेच्या मदतीने भाजपचे उमेदवार भिमराव तापकीर मोठया मताधिक्क्याने विजयी झाले होते. मात्र, निवडणूका अवघ्या तीन आठवडयांवर येऊन ठेपल्या असताना आता भाजपला सर्व मतदारसंघाची पुनर्बाधनी करावी लागणार आहे. मात्र, युती होणार नाही हे गृहीत धरून सर्व मतदारसंघातून सक्षम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी भाजपने या पूर्वीच केली होती. त्यात विद्यमान तीन आमदारांबरोबरच शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघात युती असल्याने भाजपकडून विधानसभेनंतर पक्षबांधणी सुरू करण्यात आली होती. त्यामुळे सर्व शक्यता गृहीत धरूनच भाजपने सेनेच्या ताब्यात असलेल्या कोथरूड, कँन्टोन्मेंट, वडगावशेरी आणि हडपसर मतदारसंघातून उमेदवारांना तयारी करण्याचे संकेत देण्यात आले होते. त्यानुसार, अनेक इच्छूकांनी तयारीही सुरू केली आहे. त्यामुळे भाजपला या मतदारसंघामध्ये उमेदवारांसाठी फारशी शोधाशोध घ्यावी लागणार नसली तरी, लोकसभेत चाललेला मोदी फँक्टर विधानसभेत न चालल्यास सेनेच्या उमेदवारा बरोबरच भाजपच्या उमेदवारांची सरळ सरळ लढत होनार आहे. त्यात शिवसेना वरचढ होण्याची शक्यता असल्याने भाजपमध्ये ही अस्वस्थता आहे.(प्रतिनिधी)