शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

‘प्रसारभारती’वर अघोषित सेन्सॉरशिप?

By admin | Updated: April 2, 2016 04:20 IST

‘प्रसार भारती’वरील अघोषित सेन्सॉरशिपमुळे ‘आकाशवाणी’ आणि ‘दूरदर्शन’च्या अधिकाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. या सरकारी प्रसारमाध्यमांना पूर्ण स्वायत्तता देण्याच्या

- शीलेश शर्मा, नवी दिल्ली

‘प्रसार भारती’वरील अघोषित सेन्सॉरशिपमुळे ‘आकाशवाणी’ आणि ‘दूरदर्शन’च्या अधिकाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. या सरकारी प्रसारमाध्यमांना पूर्ण स्वायत्तता देण्याच्या केवळ गप्पा मारल्या जातात पण प्रत्यक्षात मात्र माहिती आणि प्रसारण मंत्रालय आपले सर्व निर्णय भाजपा आणि रा. स्व. संघ मुख्यालयाच्या शिफारशींवरून घेत असल्याचे दिसत असल्याने अधिकारीवर्ग त्रस्त झाल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.ताज्या घडामोडींशी संबंधित असलेल्या प्रत्येक कार्यक्रमाची भाजपा आणि संघ मुख्यालयात समीक्षा करण्यात येते. एखाद्या कार्यक्रमात संघाच्या धोरणांच्या विरोधात भाष्य वा टिप्पणी करण्यात आली असेल तर संबंधित अधिकाऱ्याला फोनवर तात्काळ ताकीद दिली जाते. अशाप्रकारे एखाद्या अधिकाऱ्याला तीनदा ताकीद मिळाल्यानंतर त्या अधिकाऱ्याविरुद्ध मंत्रालय अशी काही कारवाई करते की त्याला काम करणेही कठीण जाते, असे ‘आकाशवाणी’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.हा हस्तक्षेप एवढ्यावरच थांबत नाही, तर कोणत्या कार्यक्रमात कोणता वक्ता राहील, याचा निर्णयही भाजपा आणि संघ मुख्यालयातूनच घेतला जातो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाच्या एका विशेष विभागाने तयार केलेली वक्त्यांची यादी ‘आकाशवाणी’ आणि ‘दूरदर्शन’ला देण्यात आली आहे. या यादीत रा. स्व. संघाच्या विचारसरणीचे पत्रकार, प्राध्यापक आणि संघाचे स्वयंसेवक यांच्याच नावांचा समावेश आहे. एखाद्या कार्यक्रमासाठी वक्त्याला बोलावण्याचा प्रसंग आला तर त्याची निवड या यादीत असलेल्या नावांमधूनच करण्यात आली पाहिजे, अशी ताकीद देण्यात आली आहे.‘भाजपा आणि संघ मुख्यालयातून मिळणाऱ्या निर्देशांचे पालन कशाप्रकारे केले पाहिजे, हे लिखित स्वरूपात नसले तरी अतिरिक्त महासंचालक आणि त्यापेक्षा वरच्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांना थेट मंत्रालयात बोलावून मौखिक आदेश देण्यात आलेले आहेत,’ अशी माहिती ‘दूरदर्शन’च्या अन्य एका अधिकाऱ्याने दिली. ‘आज केंद्रात असलेल्या सरकारच्या कार्यकाळात जे काही सुरू आहे ते आपण ४० वर्षांच्या आपल्या नोकरीत अन्य कोणत्याही सरकारच्या कार्यकाळात कधी पाहिले नाही. अशा परिस्थितीत काम करणे कठीणच नाही तर अशक्य झाले आहे,’ असे रजेवर असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.उघड बोलायची चोरी - आकाशवाणी आणि दूरदर्शनमध्ये सध्या कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे. मंत्रालयाने नव्या नियुक्त्यांवर बंदी घातली आहे. जुने कर्मचारी निवृत्त होत आहेत. परिणामी सर्वच कामकाज कंत्राटी पद्धतीने सुरू आहे. - मिळालेले कंत्राट वा काम रद्द होईल, या भीतीपोटी आकाशवाणी आणि दूरदर्शन या दोन्ही ठिकाणी संघ, भाजपा आणि मंत्रालयाकडून मिळणाऱ्या निर्देशांबाबत कुणी उघडपणे बोलायला तयार नाही.