शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

‘भूमिगत’ ३०० कोटीतच

By admin | Updated: December 1, 2015 00:29 IST

औरंगाबाद : निधीअभावी अडचणीत आलेली ४६७ कोटी रुपयांची भूमिगत गटार योजना आयुक्तांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद : निधीअभावी अडचणीत आलेली ४६७ कोटी रुपयांची भूमिगत गटार योजना आयुक्तांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च टाळण्याच्या आयुक्तांच्या सूचनेनंतर ठेकेदाराने ही योजना ३०० कोटी रुपयांतच पूर्ण करून देण्याची तयारी दाखविली आहे. शहरातील सुस्थितीमधील लाईन न बदलता हे काम केले जाणार आहे. याबरोबरच पीएमसी (प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार)च्या खर्चातही कपात करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.मनपाचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शनिवारी भूमिगत गटार योजनेच्या कामाची आढावा बैठक घेतली. बैठकीला शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, घारपुरे आणि खिल्लारी इन्फ्राचे संचालक, फोट्रेस या पीएमसीचे संचालक ए.एस. कुमार आदी अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला योजनेंतर्गत आतापर्यंत झालेल्या कामांची माहिती देण्यात आली. केंद्र सरकारच्या नगरोत्थान योजनेंतर्गत शहरासाठी ४६७ कोटी रुपयांची ही योजना मंजूर झालेली आहे. केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात १४६ कोटी रुपयांचे अनुदान दिल्यानंतर वर्षभरापूर्वी योजनेच्या कामाला सुरूवात झाली; परंतु आता केंद्र सरकारने जुनी योजना बंद केल्यामुळे अनुदानाचा दुसरा हप्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, ही योजना अडचणीत आली आहे. यावरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यावर तोडगा म्हणून केंद्रेकर यांनी अनावश्यक कामे करू नका, जिथे पैसा वाचविता येईल तिथे बचत करा, अशा सूचना ठेकेदार कंपनीच्या संचालकांना दिल्या. त्यानंतर संबंधित ठेकेदाराने योजनेचे काम ३०० कोटी रुपयांतच पूर्ण करून देण्यात येईल, असा दावा केला. शहरातील सुस्थितीमधील लाईन न बदलता हे काम केले जाईल, असे यावेळी ठेकेदाराने सांगितले.