शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

निर्भयाच्या अल्पवयीन बलात्काऱ्याची अज्ञातस्थळी रवानगी

By admin | Updated: December 20, 2015 01:53 IST

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार व हत्याप्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या अल्पवयीन आरोपीस रविवारी होणाऱ्या सुटकेच्या

नवी दिल्ली/बदायू : संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार व हत्याप्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या अल्पवयीन आरोपीस रविवारी होणाऱ्या सुटकेच्या पूर्वसंध्येला बाल सुधारगृहातून एका अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले.दरम्यान, या अल्पवयीन आरोपीची शिक्षा वाढविण्याची मागणी होत असतानाच बदायूमधील त्याच्या गावातील काही लोकांनी त्याच्या प्रवेशास विरोध करण्याची तयारी केली आहे. उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन आरोपीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती वर्तविण्यात आली असून, अनेक संस्था करडी नजर ठेवून आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्याच्या सुटकेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. अज्ञातस्थळावरूनच रविवारी त्याची सुटका करण्यात येईल. या अल्पवयीन आरोपीच्या पुनर्वसनाची योजना तयार करण्यात आली असल्याचे दिल्ली सरकारने सांगितले आहे. या योजनेंतर्गत अल्पवयीन आरोपीस १० हजार रुपयांची आर्थिक मदत आणि शिवणयंत्र देण्यात येईल. जेणेकरून त्याला कपडे शिवण्याचे काम सुरू करता येऊ शकेल. १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत पॅरामेडिकलची २३ वर्षीय विद्यार्थिनी निर्भयावरील सामूहिक बलात्काराच्या घटनेतील एका आरोपीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याने, त्याची गणना कायद्यातील व्याख्येनुसार बालगुन्हेगारात झाली होती. त्यानुसार बालगुन्हेगार न्याय मंडळाने त्याला तीन वर्षांची शिक्षा ठोठावली होती आणि उत्तर दिल्लीच्या एका सुधारगृहात ठेवण्यात आले होते. बलात्काराच्या घा घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. गावात प्रवेशास बंदीची तयारीदरम्यान, तीन वर्षांची शिक्षा भोगून सुटणाऱ्या या अल्पवयीन आरोपीस त्याच्या बदायू येथील गावातील काही लोकांनी प्रवेशबंदी घालण्याचा विचार केला आहे. निर्भयाचा दोषी गावात परतावा, अशी लोकांची इच्छा नाही. गावातील एक वयोवृद्ध नागरिक फुलचंद यांनी सांगितले की, निर्भयाकांडातील या आरोपीचे कृत्य अत्यंत घृणास्पद असून, त्याला आता गावात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे गावाची देश-विदेशात प्रचंड बदनामी झाली. या घटनेनंतर शहरात शिकण्यासाठी गेलेल्या गावातील इतर तरुणांकडेही संशयाने बघितले जात आहे. एवढेच काय पण त्यांना कुणी नोकरी द्यायलाही तयार नाही. परिणामी गावात बेरोजगारांची संख्या वाढली आहे.फुलचंद यांच्याप्रमाणेच अनिल, कुन्नू, रामपाल, गुलाब आणि नरेशसह इतरही अनेक नागरिकांना निर्भयाचा गुन्हेगार आता गावात नको आहे. परंतु काहींनी त्याला गावात आणून नव्याने चांगले जीवन जगण्याची संधी मिळाली पाहिजे, असे मत मांडले आहे.या अल्पवयीन आरोपीस परत आणण्यासाठी त्याच्या कुटुंबातील कुठलाही सदस्य दिल्लीला जाणार नाही. परंतु बाल सुधारगृहातून सुटकेनंतर त्याने थेट गावात यावे आणि अत्यंत हलाखीचे जीवन जगत असलेल्या आपल्या कुटुंबाला मदत करावी, अशी त्यांची इच्छा असल्याचे त्याच्या आईने सांगितले. (वृत्तसंस्था)