शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

निर्भयाच्या अल्पवयीन बलात्काऱ्याची अज्ञातस्थळी रवानगी

By admin | Updated: December 20, 2015 01:53 IST

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार व हत्याप्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या अल्पवयीन आरोपीस रविवारी होणाऱ्या सुटकेच्या

नवी दिल्ली/बदायू : संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार व हत्याप्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या अल्पवयीन आरोपीस रविवारी होणाऱ्या सुटकेच्या पूर्वसंध्येला बाल सुधारगृहातून एका अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले.दरम्यान, या अल्पवयीन आरोपीची शिक्षा वाढविण्याची मागणी होत असतानाच बदायूमधील त्याच्या गावातील काही लोकांनी त्याच्या प्रवेशास विरोध करण्याची तयारी केली आहे. उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन आरोपीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती वर्तविण्यात आली असून, अनेक संस्था करडी नजर ठेवून आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्याच्या सुटकेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. अज्ञातस्थळावरूनच रविवारी त्याची सुटका करण्यात येईल. या अल्पवयीन आरोपीच्या पुनर्वसनाची योजना तयार करण्यात आली असल्याचे दिल्ली सरकारने सांगितले आहे. या योजनेंतर्गत अल्पवयीन आरोपीस १० हजार रुपयांची आर्थिक मदत आणि शिवणयंत्र देण्यात येईल. जेणेकरून त्याला कपडे शिवण्याचे काम सुरू करता येऊ शकेल. १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत पॅरामेडिकलची २३ वर्षीय विद्यार्थिनी निर्भयावरील सामूहिक बलात्काराच्या घटनेतील एका आरोपीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याने, त्याची गणना कायद्यातील व्याख्येनुसार बालगुन्हेगारात झाली होती. त्यानुसार बालगुन्हेगार न्याय मंडळाने त्याला तीन वर्षांची शिक्षा ठोठावली होती आणि उत्तर दिल्लीच्या एका सुधारगृहात ठेवण्यात आले होते. बलात्काराच्या घा घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. गावात प्रवेशास बंदीची तयारीदरम्यान, तीन वर्षांची शिक्षा भोगून सुटणाऱ्या या अल्पवयीन आरोपीस त्याच्या बदायू येथील गावातील काही लोकांनी प्रवेशबंदी घालण्याचा विचार केला आहे. निर्भयाचा दोषी गावात परतावा, अशी लोकांची इच्छा नाही. गावातील एक वयोवृद्ध नागरिक फुलचंद यांनी सांगितले की, निर्भयाकांडातील या आरोपीचे कृत्य अत्यंत घृणास्पद असून, त्याला आता गावात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे गावाची देश-विदेशात प्रचंड बदनामी झाली. या घटनेनंतर शहरात शिकण्यासाठी गेलेल्या गावातील इतर तरुणांकडेही संशयाने बघितले जात आहे. एवढेच काय पण त्यांना कुणी नोकरी द्यायलाही तयार नाही. परिणामी गावात बेरोजगारांची संख्या वाढली आहे.फुलचंद यांच्याप्रमाणेच अनिल, कुन्नू, रामपाल, गुलाब आणि नरेशसह इतरही अनेक नागरिकांना निर्भयाचा गुन्हेगार आता गावात नको आहे. परंतु काहींनी त्याला गावात आणून नव्याने चांगले जीवन जगण्याची संधी मिळाली पाहिजे, असे मत मांडले आहे.या अल्पवयीन आरोपीस परत आणण्यासाठी त्याच्या कुटुंबातील कुठलाही सदस्य दिल्लीला जाणार नाही. परंतु बाल सुधारगृहातून सुटकेनंतर त्याने थेट गावात यावे आणि अत्यंत हलाखीचे जीवन जगत असलेल्या आपल्या कुटुंबाला मदत करावी, अशी त्यांची इच्छा असल्याचे त्याच्या आईने सांगितले. (वृत्तसंस्था)