शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

उल्फाचा जहाल नेता चेतिया भारताच्या स्वाधीन

By admin | Updated: November 12, 2015 03:24 IST

भारतासाठी दोन दशकांपासून फरार असलेला, पण गेली १८ वर्षे शेजारच्या बांगलादेशच्या तुरुंगात असलेला उल्फाचा जहाल नेता गोलप बरुआ ऊर्फ अनुप चेतिया याला बुधवारी शेख हसीना सरकारने भारताच्या स्वाधीन केले

नवी दिल्ली : भारतासाठी दोन दशकांपासून फरार असलेला, पण गेली १८ वर्षे शेजारच्या बांगलादेशच्या तुरुंगात असलेला उल्फाचा जहाल नेता गोलप बरुआ ऊर्फ अनुप चेतिया याला बुधवारी शेख हसीना सरकारने भारताच्या स्वाधीन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक हस्तक्षेपानंतर बांगलादेश सरकारने बुधवारी सकाळी त्याला भारताच्या ताब्यात दिले. अर्थात या साऱ्या प्रक्रियेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ईशान्य भारतातील शांततेसाठी मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रक्रियेला या घटनेतून आसाममध्ये अधिक चालना मिळणार आहे.काही दिवसांपूर्वीच इंडोनेशियाने मुंबईतील कुख्यात गँगस्टर छोटा राजन याला भारताच्या ताब्यात दिले. त्यानंतर लगेचच ही महत्त्वपूर्ण घटना झाली आहे. ४८ वर्षीय चेतिया हा बंदी घालण्यात आलेल्या युनायटेड लिबरेशन फ्रंट आॅफ आसाम (उल्फा)चा संस्थापक सरचिटणीस आहे. हत्याकांड, अपहरण, बँकेवरील दरोडे आणि खंडणी वसुलीसारख्या गंभीर गुन्ह्यांप्रकरणी तो भारतास हवा होता. गेली दोन दशके भारत चेतियाच्या हस्तांतरणासाठी पाठपुरावा करीत होता. मात्र, उभय देशांत प्रत्यार्पण करार नसल्याचे सांगून तेथे आतापर्यंत सत्तेवर आलेल्या सरकारांनी त्याच्या हस्तांतरणास नकार दिला होता. मात्र,अलीकडे स्वत: चेतिया यानेच ‘आपण भारतात परतण्यास उत्सुक आहोत’, असा लेखी अर्ज दिल्यानंतर बांगलादेशातील हसीना सरकारने त्याला भारतात परत पाठविण्याचा निर्णय घेतला.-------चेतियाची पार्श्वभूमी...१९९० च्या दशकात चेतिया हिंसक कारवायांनंतर भूमिगत झाला. त्यानंतर मार्च १९९१ मध्ये त्याला अटक करण्यात आली; पण आसामचे मुख्यमंत्री हितेश्वर सैकिया यांनी त्याला कारागृहातून जामिनावर सोडून दिले आणि मुक्तता होताच तो फरार झाला. तेव्हाच तो बांगलादेशात गेला असण्याची अटकळ होती. ती खरी ठरली. २१ डिसेंबर १९९७ रोजी त्याला हसीना यांच्या पहिल्या राजवटीत बांगलादेश सरकारने अटक केली होती. त्यावेळी त्याला विदेशी नागरिक कायदा, पासपोर्ट कायदा यांचा भंग केल्याचा आणि बांगलादेशात अवैध प्रवेश केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. याशिवाय बेकायदेशीरपणे विदेशी चलन, शस्त्रास्त्रे आणि सॅटेलाईट फोन बाळगणे आदी आरोपही ठेवण्यात आले होते. त्यासाठी ठोठावलेली सात वर्षांची शिक्षा तेथे भोगल्यावर त्याने राजकीय शरणार्थी म्हणून आपला स्वीकार करण्याची विनंती बांगलादेश सरकारला तीनदा केली. त्यावर सरकारने निर्णय घेतला नव्हता. परिणामी हा निर्णय होत नाही, तोवर सुरक्षिततता म्हणून चेतियाला तुरुंगातच ठेवण्याचा आदेश ढाका हायकोर्टाने दिला होता.---------पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रत्यार्पणासाठी केलेल्या सहकार्याबद्दल शेख हसीना यांचे आभार मानले आहेत.