शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

उल्फाचा जहाल नेता चेतिया भारताच्या स्वाधीन

By admin | Updated: November 12, 2015 03:24 IST

भारतासाठी दोन दशकांपासून फरार असलेला, पण गेली १८ वर्षे शेजारच्या बांगलादेशच्या तुरुंगात असलेला उल्फाचा जहाल नेता गोलप बरुआ ऊर्फ अनुप चेतिया याला बुधवारी शेख हसीना सरकारने भारताच्या स्वाधीन केले

नवी दिल्ली : भारतासाठी दोन दशकांपासून फरार असलेला, पण गेली १८ वर्षे शेजारच्या बांगलादेशच्या तुरुंगात असलेला उल्फाचा जहाल नेता गोलप बरुआ ऊर्फ अनुप चेतिया याला बुधवारी शेख हसीना सरकारने भारताच्या स्वाधीन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक हस्तक्षेपानंतर बांगलादेश सरकारने बुधवारी सकाळी त्याला भारताच्या ताब्यात दिले. अर्थात या साऱ्या प्रक्रियेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ईशान्य भारतातील शांततेसाठी मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रक्रियेला या घटनेतून आसाममध्ये अधिक चालना मिळणार आहे.काही दिवसांपूर्वीच इंडोनेशियाने मुंबईतील कुख्यात गँगस्टर छोटा राजन याला भारताच्या ताब्यात दिले. त्यानंतर लगेचच ही महत्त्वपूर्ण घटना झाली आहे. ४८ वर्षीय चेतिया हा बंदी घालण्यात आलेल्या युनायटेड लिबरेशन फ्रंट आॅफ आसाम (उल्फा)चा संस्थापक सरचिटणीस आहे. हत्याकांड, अपहरण, बँकेवरील दरोडे आणि खंडणी वसुलीसारख्या गंभीर गुन्ह्यांप्रकरणी तो भारतास हवा होता. गेली दोन दशके भारत चेतियाच्या हस्तांतरणासाठी पाठपुरावा करीत होता. मात्र, उभय देशांत प्रत्यार्पण करार नसल्याचे सांगून तेथे आतापर्यंत सत्तेवर आलेल्या सरकारांनी त्याच्या हस्तांतरणास नकार दिला होता. मात्र,अलीकडे स्वत: चेतिया यानेच ‘आपण भारतात परतण्यास उत्सुक आहोत’, असा लेखी अर्ज दिल्यानंतर बांगलादेशातील हसीना सरकारने त्याला भारतात परत पाठविण्याचा निर्णय घेतला.-------चेतियाची पार्श्वभूमी...१९९० च्या दशकात चेतिया हिंसक कारवायांनंतर भूमिगत झाला. त्यानंतर मार्च १९९१ मध्ये त्याला अटक करण्यात आली; पण आसामचे मुख्यमंत्री हितेश्वर सैकिया यांनी त्याला कारागृहातून जामिनावर सोडून दिले आणि मुक्तता होताच तो फरार झाला. तेव्हाच तो बांगलादेशात गेला असण्याची अटकळ होती. ती खरी ठरली. २१ डिसेंबर १९९७ रोजी त्याला हसीना यांच्या पहिल्या राजवटीत बांगलादेश सरकारने अटक केली होती. त्यावेळी त्याला विदेशी नागरिक कायदा, पासपोर्ट कायदा यांचा भंग केल्याचा आणि बांगलादेशात अवैध प्रवेश केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. याशिवाय बेकायदेशीरपणे विदेशी चलन, शस्त्रास्त्रे आणि सॅटेलाईट फोन बाळगणे आदी आरोपही ठेवण्यात आले होते. त्यासाठी ठोठावलेली सात वर्षांची शिक्षा तेथे भोगल्यावर त्याने राजकीय शरणार्थी म्हणून आपला स्वीकार करण्याची विनंती बांगलादेश सरकारला तीनदा केली. त्यावर सरकारने निर्णय घेतला नव्हता. परिणामी हा निर्णय होत नाही, तोवर सुरक्षिततता म्हणून चेतियाला तुरुंगातच ठेवण्याचा आदेश ढाका हायकोर्टाने दिला होता.---------पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रत्यार्पणासाठी केलेल्या सहकार्याबद्दल शेख हसीना यांचे आभार मानले आहेत.