शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

करणी केल्याच्या आरोपावरून दोन महिलांना जिवंत गाडले

By admin | Updated: November 4, 2016 06:17 IST

अंधश्रद्धा आणि चेटूक यासारख्या अतार्किक व अघोरी गोष्टींच्या जबर पगड्याने आसामच्या आदिवासी जिल्ह्यांत तिघींचा हकनाक बळी घेतला आहे.

गुवाहाटी : अंधश्रद्धा आणि चेटूक यासारख्या अतार्किक व अघोरी गोष्टींच्या जबर पगड्याने आसामच्या आदिवासी जिल्ह्यांत तिघींचा हकनाक बळी घेतला आहे. यापैकी एका घटनेत चेटूक केल्याच्या संशयावरून दोन प्रौढ महिलांना जिवंत गाडण्यात आले. दुसऱ्या घटनेत चोरीला गेलेला मोबाईल फोन सापडावा, यासाठी चार वर्षांच्या मुलीचा बळी देण्यात आला.पहिली घटना मध्य आसामच्या नागांव जिल्ह्यातील नहरबारी गावातील आदिवासी पाड्यावर गेल्या सोमवारी घडली. पाड्यावर पिण्याच्या पाण्याचा स्रोत असलेल्या विहिरीत कीडे झाल्याचे आढळले. यामुळेच लोक आजारी पडतात, असा निष्कर्ष काढला गेला. मांत्रिकाने कोणीतरी चेटूक केल्याने विहिरीत कीडे झाल्याचे सांगितले. पाड्यावरील लोकांनी साल्मी गौर (४७ वर्षे) आणि सागू गौर (५९) या दोन महिलांवर चेटूक केल्याचा संशय घेतला. रहिवाशांनी या दोघींना त्याच विहिरीत ढकलून वरून दगड-माती टाकून गाडून टाकले. त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी बासू गौर व सानू गौर या दोघांना अटक केली. कुमार सानू गौर या तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.>१३२ ‘चेटकिणीं’चा मृत्यूच्खास करून बोडो आणि आदिवासींची वस्ती असलेल्या आसामच्या जिल्ह्यांमध्ये अंधश्रद्धा आणि अघोरी विद्यांचा अशिक्षित लोकांवर जबर पगडा आहे. गावात होणारी रोगराई, मृत्यू वा नापिकी या सर्वांचे खापर चेटूक केले जाण्यावर फोडले जाते. ‘बेज’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या मांत्रिकाला बोलावून ‘चेटूक’ करणारी व्यक्ती ‘शोधून’ काढली जाते. नंतर या व्यक्तीचा अनन्वित छळ करून तिला वाळित टाकले जाते वा प्रसंगी ठारही मारले जाते. सरकारी आकडेवारीनुसार सन २००२ ते २०१२ या १० वर्षांत चेटूक करण्याच्या संशयावरून आसाममध्ये १३२ व्यक्तींना ठार मारण्यात आले आहे. यात महिला व मुलांची संख्या अधिक आहे.