शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

२१ वर्षांच्या वियोगानंतर दोन भावंडांचे पुनर्मिलन

By admin | Updated: April 17, 2016 03:08 IST

फेसबुकच्या योग्य वापरामुळे तब्बल २१ वर्षांच्या वियोगानंतर दोन भावंडांचे पुनर्मिलन झाले आहे. मूळ वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील रहिवासी आणि सध्या येथील पत्र सूचना

- प्रमोद गवळी,  नवी दिल्ली

फेसबुकच्या योग्य वापरामुळे तब्बल २१ वर्षांच्या वियोगानंतर दोन भावंडांचे पुनर्मिलन झाले आहे. मूळ वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील रहिवासी आणि सध्या येथील पत्र सूचना कार्यालयाच्या (पीआयबी) ग्रंथालयात कार्यरत विजय नितनवरे (वय ४५) यांनी निराश न होता सतत आपल्या भावाचा शोध सुरू ठेवला होता आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यांना त्यांचा भाऊ हंसराज मिळाला.३५ वर्षांचा हंसराज पुण्याच्या दिघी येथे वास्तव्याला आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून तो भोसरीमध्ये एका कंपनीत कामाला आहे. विजय आणि हंसराज यांचे वडील पुरुषोत्तम नितनवरे वर्धेजवळील पुलगाव अ‍ॅम्युनेशन डेपोमध्ये कार्यरत होते. १९८२ साली त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचा सर्वात लहान मुलगा हंसराज अवघा एक वर्षांचा होता. चार वर्षांनंतर त्यांच्या जागी पत्नीला डेपोत काम मिळाले. पुढे २३ मार्च १९९६ रोजी त्यांचीही जीवनयात्रा संपली. तेव्हा हंसराज इयत्ता दहावीत होता. पोरकेपणाच्या दु:खाने मानसिकदृष्ट्या खचला होता. हुशार विद्यार्थी असल्यावरही तो अनुत्तीर्ण झाला. भाऊबहिणीकडून आपल्याला जिव्हाळा मिळणार नाही या विचाराने त्याने २५ मे १९९६ रोजी घर सोडले. दरम्यान नैराश्याने ग्रासलेल्या हंसराजने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. पण सुदैवाने एका इसमाने त्याचे प्राण वाचविले. त्यानंतर स्वत:ला सावरत मुंबईत एका कंपनीत हेल्पर म्हणून काम केले. दरम्यानच्या काळात घरातून पळून गेला असल्याने पुन्हा भावाबहिणीशी संपर्क करण्याचे धाडस त्याला झाले नाही. मुंबईत १० वर्षे राहून पुण्यात आला. तेथे लग्नही केले. दुसरीकडे मोठा भाऊ विजय आपल्या धाकट्या भावाच्या शोधासाठी अहोरात्र परिश्रम घेत होता. पोलीस ठाण्यांच्या खेटा घातल्या. छायाचित्र प्रसिद्ध केले आणि मग गुगलवर सर्च सुरू केला. त्यानंतर फेसबुकवर हंसराज नावाच्या लोकांना शोधणे सुरू झाले आणि अखेर त्याला त्याचा भाऊ ‘हंसराज’ मिळाला. विजयने त्याला पुलगावचा संदर्भ दिला तेव्हा त्याने ‘भाऊ मला क्षमा कर’ असे उत्तर दिले. या संदेशाने विजयच्या आशा पल्लवित झाल्या. त्याने फेसबुकवरच हंसराजच्या मित्रांशी संपर्क साधला. एक दिवस हंसराजने विजयला फोन केला आणि दोन भावांची पुन्हा भेट झाली.आपला धाकटा भाऊ जा जगात नाही हे मन मानत नव्हते. त्यामुळे सातत्याने त्याचा शोध सुरू ठेवला. चमत्कारांबद्दल ऐकले आहे; पण आता त्यावर विश्वास बसला.- विजय नितनवरेघरातून पळून जाण्याची घोडचूक केल्यावर पुन्हा भावाबहिणीसमक्ष जाण्याचे धाडस होत नव्हते. त्यांनी मात्र मला शोधण्यासाठी जिवाचे रान केले. अनेक वर्षांच्या वियोगानंतर मी त्यांना भेटत असून माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. -         हंसराज नितनवरे