शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक स्टडी रिपोर्ट
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
6
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
7
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
8
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
9
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
10
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
11
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
12
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
13
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
14
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
15
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
16
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
17
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
18
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
19
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
20
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?

२१ वर्षांच्या वियोगानंतर दोन भावंडांचे पुनर्मिलन

By admin | Updated: April 17, 2016 03:08 IST

फेसबुकच्या योग्य वापरामुळे तब्बल २१ वर्षांच्या वियोगानंतर दोन भावंडांचे पुनर्मिलन झाले आहे. मूळ वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील रहिवासी आणि सध्या येथील पत्र सूचना

- प्रमोद गवळी,  नवी दिल्ली

फेसबुकच्या योग्य वापरामुळे तब्बल २१ वर्षांच्या वियोगानंतर दोन भावंडांचे पुनर्मिलन झाले आहे. मूळ वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील रहिवासी आणि सध्या येथील पत्र सूचना कार्यालयाच्या (पीआयबी) ग्रंथालयात कार्यरत विजय नितनवरे (वय ४५) यांनी निराश न होता सतत आपल्या भावाचा शोध सुरू ठेवला होता आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यांना त्यांचा भाऊ हंसराज मिळाला.३५ वर्षांचा हंसराज पुण्याच्या दिघी येथे वास्तव्याला आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून तो भोसरीमध्ये एका कंपनीत कामाला आहे. विजय आणि हंसराज यांचे वडील पुरुषोत्तम नितनवरे वर्धेजवळील पुलगाव अ‍ॅम्युनेशन डेपोमध्ये कार्यरत होते. १९८२ साली त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचा सर्वात लहान मुलगा हंसराज अवघा एक वर्षांचा होता. चार वर्षांनंतर त्यांच्या जागी पत्नीला डेपोत काम मिळाले. पुढे २३ मार्च १९९६ रोजी त्यांचीही जीवनयात्रा संपली. तेव्हा हंसराज इयत्ता दहावीत होता. पोरकेपणाच्या दु:खाने मानसिकदृष्ट्या खचला होता. हुशार विद्यार्थी असल्यावरही तो अनुत्तीर्ण झाला. भाऊबहिणीकडून आपल्याला जिव्हाळा मिळणार नाही या विचाराने त्याने २५ मे १९९६ रोजी घर सोडले. दरम्यान नैराश्याने ग्रासलेल्या हंसराजने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. पण सुदैवाने एका इसमाने त्याचे प्राण वाचविले. त्यानंतर स्वत:ला सावरत मुंबईत एका कंपनीत हेल्पर म्हणून काम केले. दरम्यानच्या काळात घरातून पळून गेला असल्याने पुन्हा भावाबहिणीशी संपर्क करण्याचे धाडस त्याला झाले नाही. मुंबईत १० वर्षे राहून पुण्यात आला. तेथे लग्नही केले. दुसरीकडे मोठा भाऊ विजय आपल्या धाकट्या भावाच्या शोधासाठी अहोरात्र परिश्रम घेत होता. पोलीस ठाण्यांच्या खेटा घातल्या. छायाचित्र प्रसिद्ध केले आणि मग गुगलवर सर्च सुरू केला. त्यानंतर फेसबुकवर हंसराज नावाच्या लोकांना शोधणे सुरू झाले आणि अखेर त्याला त्याचा भाऊ ‘हंसराज’ मिळाला. विजयने त्याला पुलगावचा संदर्भ दिला तेव्हा त्याने ‘भाऊ मला क्षमा कर’ असे उत्तर दिले. या संदेशाने विजयच्या आशा पल्लवित झाल्या. त्याने फेसबुकवरच हंसराजच्या मित्रांशी संपर्क साधला. एक दिवस हंसराजने विजयला फोन केला आणि दोन भावांची पुन्हा भेट झाली.आपला धाकटा भाऊ जा जगात नाही हे मन मानत नव्हते. त्यामुळे सातत्याने त्याचा शोध सुरू ठेवला. चमत्कारांबद्दल ऐकले आहे; पण आता त्यावर विश्वास बसला.- विजय नितनवरेघरातून पळून जाण्याची घोडचूक केल्यावर पुन्हा भावाबहिणीसमक्ष जाण्याचे धाडस होत नव्हते. त्यांनी मात्र मला शोधण्यासाठी जिवाचे रान केले. अनेक वर्षांच्या वियोगानंतर मी त्यांना भेटत असून माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. -         हंसराज नितनवरे