शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकाकडून तरुणाला बेदम मारहाण जुन्या वादातून घडली घटना : गोलाणी मार्केटमध्ये दोन गट समोरा-समोर

By admin | Updated: June 2, 2016 18:13 IST

जळगाव: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या जुन्या वादातून गुरुवारी दुपारी बारा वाजता गोलाणी मार्केटमध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाली, वाद सोडविण्यासाठी आलेल्यांनीही एकमेकावर हाथ साफ केले. यात नगरसेवक चेतन शिरसाळे यांनी किरण जोशी या तरुणाला बेदम मारहाण केली. फाटलेल्या कपड्यावर हा तरुण सैरावैरा पळत सुटला होता. दरम्यान, दोन्ही कडील ५० ते ६० जण एकमंेकावर चालून आले होते. या हाणामारीमुळे गोलाणीत तुफान गर्दी झाली होती.

जळगाव: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या जुन्या वादातून गुरुवारी दुपारी बारा वाजता गोलाणी मार्केटमध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाली, वाद सोडविण्यासाठी आलेल्यांनीही एकमेकावर हाथ साफ केले. यात नगरसेवक चेतन शिरसाळे यांनी किरण जोशी या तरुणाला बेदम मारहाण केली. फाटलेल्या कपड्यावर हा तरुण सैरावैरा पळत सुटला होता. दरम्यान, दोन्ही कडील ५० ते ६० जण एकमंेकावर चालून आले होते. या हाणामारीमुळे गोलाणीत तुफान गर्दी झाली होती.
गोलाणी मार्केटमध्ये क्लास सुटल्यानंतर पार्किंगमधून दुचाकी काढत असताना दोन तरुणांमध्ये जुन्या वादातून शाब्दिक वाद झाला. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी एका तरुणाने मित्र किरण जोशी याला बोलावून घेतले. त्याने आल्या आल्या तरुणांना मारहाण केली. त्याच्यासोबत असलेल्या तीन ते चार जणांनीही या तरुणांना बदडून काढले, त्यामुळे त्यातील एका तरुणाने नगरसेवक चेतन शिरसाळे यांना फोन केला असता शिरसाळे अवघ्या दहाच मिनिटात घटनास्थळावर पोहचले, त्यांनीही वाद न सोडविता किरण जोशी याला मारहाण करायला सुरुवात केली.
प्रचंड गर्दी अन् पळापळ
दोन्ही गटातील ५० ते ६० जण समोरासमोर आल्याने यावेळी प्रचंड गोंधळ उडाला. मार्केटमधील ही हाणामारी थेट मुख्य रस्त्यावर आल्याने पळापळ झाली होती. यात काही जणांनी दुचाकींमधील पेट्रोल काढून बाटल्या फेकण्याचा प्रयत्न केल्याचे घटनास्थळावरील लोकांनी सांगितले. या घटनेमुळे दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती.
कारवाई शून्य..
घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनच्या तीन कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली, नंतर मारहाण करणार्‍यांची चौकशी केली, मात्र तक्रार कोणी देत नसल्याचे कारण पुढे करून या घटनेप्रकरणी कोणावरही कारवाई केली नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यावरदेखील पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. घटनेचे गांभीर्य व अशा घटनांना वचक बसावा यासाठी तरी हल्लेखोरांवर कारवाई करणे गरजेचे होते.