शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

सव्वाशे कोटी विकासाचे सैनिक घडवायचे आहेत - मोदी

By admin | Updated: May 16, 2014 21:56 IST

या देशातील प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे केले तर देश एका एका पाऊलाने जरी पुढे गेला तरी, हा देश सव्वाशे कोटी पाऊलांनी पुढे जाईल

ऑनलाइन टीम

बडोदा, (गुजरात) - गुजरातेत २६ पैकी २६ आणि देशभरात २८५ हून अधिक जागांवर विजय मिळवल्यावर मोदींनी देशभरातील नागरिकांना उद्देशून भाषण केले. माझ्या सारख्या समान्य कुटुंबातील मुलाला देशाने आज या स्तरावर आणून ठेवले, याबद्दल मी गुजरात आणि देशभरातील जनतेचा आभारी आहे, असं म्हणत त्यांनी जनतेचे आभार मानले. तसेच आपल्यावर सडकून टीका करणा-या लोकांना उत्तर मिळालंय असंही त्यांनी म्हटलं. तसेच पॉलिटीकल पंडितांना आपले विचार बदलावे लागतील असं म्हणत त्यांनी विरोधकांवर तोफ डागली. माझ्यावर आलेली संकटंही मोठीच होती आणि मला मिळालेली फलश्रुतीही मोठीच आहे. पॉलिटीकल पंडितांची सर्व भाकितं खोटी ठरली आहेत. माझे विरोधक हे माझा विरोध करत होते. पण त्यांच्या लक्षात आले नाही, की माझा विरोध करताना त्यांना विकासावरच बोलावे लागले. दुस-या कोणत्या मुद्द्यावर नाही. मोदी हा कसा जादूगार आहे हे मी दाखवून दिलं. आज आपला भारत देश ४० वर्ष पुढे असता पण दुर्दैवाने तसं झालं नाही. या गोष्टी काढण्यात आता अर्थ नाही. असं म्हणंत त्यांनी गांधीजींच्या आंदोलनाची आठवण करून देत देशातील जनता आपलं काम करताना कसं आपण देशासाठी करत आहोत याचे उदाहरण दिले. आज देशातील कोणताही व्यापारी प्रामाणिकपणे आपला माल विकत असेल, कोणताही शिक्षक प्रामाणिकपणे काम करत असेल विद्यार्थी प्रमाणिकपणे शिक्षण घेत असेल तर तो त्याचे कर्तव्य देशासाठीच करतोय असं त्यांनी म्हटलं. या देशातील प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे केले तर देश एका एका पाऊलाने जरी पुढे गेला तरी, हा देश सव्वाशे कोटी पाऊलांनी पुढे जाईल असं त्यांनी म्हटलं. देशातील सर्व जटील समस्यांवर विकास हा एकच उपाय असल्याचे मोदींनी म्हटले.