शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

ट्रकला ओव्हरटेक करताना धानवडचा तरुण ठार

By admin | Updated: July 18, 2016 00:58 IST

जळगाव: ट्रकला ओव्हरटेक करताना दोन दुचाकी समोरासमोर आदळल्याने त्यात ट्रकच्या चाकाखाली आल्याने भास्कर जनार्दन कोळी (वय ३० ) हा तरुण ठार झाला तर सुनील ज्ञानेश्वर पाटील (वय २८) व पूनमचंद रामचंद्र जाधव (वय ३०) तिघे रा.धानवड ता.जळगाव हे दोन जण जखमी झाले. आणखी एक जण किरकोळ जखमी झाला. हा अपघात रविवारी रात्री साडे दहा वाजता चिंचोली गावापासून काही अंतरावर घडला.

जळगाव: ट्रकला ओव्हरटेक करताना दोन दुचाकी समोरासमोर आदळल्याने त्यात ट्रकच्या चाकाखाली आल्याने भास्कर जनार्दन कोळी (वय ३० ) हा तरुण ठार झाला तर सुनील ज्ञानेश्वर पाटील (वय २८) व पूनमचंद रामचंद्र जाधव (वय ३०) तिघे रा.धानवड ता.जळगाव हे दोन जण जखमी झाले. आणखी एक जण किरकोळ जखमी झाला. हा अपघात रविवारी रात्री साडे दहा वाजता चिंचोली गावापासून काही अंतरावर घडला.
भास्कर व त्याच्यासोबतचे चौघे जळगावात सेंट्रींग कामासाठी आले होते. काम आटोपल्यानंतर दोन दुचाकीवरुन चौघे जण धानवडला जात असताना चिंचोली गावाजवळ असलेल्या मंदिराजवळ ट्रकला ओव्हरटेक करताना दोन दुचाकी व ट्रक असा विचित्र अपघात झाला. त्यात भास्कर हा ट्रकच्या चाकाखाली आला, दबला जाण्याच्या आत त्याला बाहेर काढण्यात यश आले. गंभीर जखमी झाल्याने तिघांना रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतानाच भास्करचा मृत्यू झाला.
दरम्यान, भास्कर हा विवाहित असून दोन वर्षाचा त्याला मुलगा आहे. तर पत्नी गरोदर आहे. आई-वडील नसल्याने ते मामाच्या गावाला आले होते. त्याला एक लहान भाऊ आहे, तो अविवाहित आहे.

एकावर धारदार शस्त्राने वार
समता नगरात रविवारी रात्री साडे दहा वाजता किरकोळ कारणावरुन काही तरुणांमध्ये वाद झाला. त्यात भैय्या सुरवगढे (वय २२) या तरुणावर धारदार शस्त्राने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर राकेश चंद्रकांत साळुंखे (वय २२ रा.कांचन नगर) यालाही जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले.